मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ९०१ ते १०००
हें साधुलक्षण अत्यंत थोर । ऐकतां सुगम करितां दुर्धर ।
हे अकरावें अतिपवित्र । ऐक विचित्र तें बारावें ॥१॥
हें साधूचे लक्षण फार थोर आहे. ते ऐकायला सोपे परंतु आचरावयाला कठीण आहे. हे अकरावें अति पवित्र लक्षण होय. आतां बारावें विचित्र लक्षण ऐक १.
साधूची अपरिग्रहता । परिग्रहो नातळे चित्ता ।
देहगेहें निःसंगता । अकिंचनता त्यासी नांव ॥२॥
देहगेहें निःसंगता । अकिंचनता त्यासी नांव ॥२॥
कोणत्याही वस्तूचा संग्रह किंवा स्वीकार करण्याचा विचार मनाला शिवतही नाही, अशी वृत्ति म्हणजेच साधूची 'अपरिग्रहता' होय. देहाची किंवा घरादाराचीसुद्धा संगति न धरणे याचेच नांव 'अकिंचनता' २.
स्फटिकु काजळीं दिसे काळा । आरक्तीं आरक्तकीळा ।
नीळवणीं भासे । निळा । तरी तो वेगळा शुद्धत्वें ॥३॥
नीळवणीं भासे । निळा । तरी तो वेगळा शुद्धत्वें ॥३॥
स्फटिक काजळावर ठेवला तर तो काळा दिसतो, तांबड्या रंगावर जर ठेवला तर उत्तम लाल रंगाचा दिसतो, निळ्या रंगावर जर ठेवला तर तो निळ्या वर्णाचाच असल्याचा भास होतो, पण तो शुद्धस्वरूपाने निराळाच असतो ३.
स्फटिक जपाकुसुमीं ठेविला । पाहतां दिसे तांबडा झाला ।
परी तो अलिप्तपणें संचला । नाहीं माखला तेणें रंगें ॥४॥
परी तो अलिप्तपणें संचला । नाहीं माखला तेणें रंगें ॥४॥
तोच स्फटिक जासवंदीच्या फुलावर ठेवून पाहिला असता तो तांबडा झालेला दिसतो, पण तो त्या फुलापासून अगदी अलिस राहिलेला असतो. त्या फुलाच्या रंगाने . . 'माखला असे होत नाही ४.
तैसा साधु परिग्रहामाजी वसे । परिग्रही झालाही दिसे ।
परी जागृतिस्वप्नसुषुप्तिवषें । परिग्रहो न स्पर्शे निजबोधें ॥५॥
परी जागृतिस्वप्नसुषुप्तिवषें । परिग्रहो न स्पर्शे निजबोधें ॥५॥
त्याप्रमाणे साधूही वस्तूंचा संग्रह करणाऱ्यांमध्ये राहतो, तो संग्रहकर्ता आहे असेंही वाटर. परंतु जागृति, स्वम, सुषुति, सांतील कोणत्याही अवस्थेत तो संग्रहीपणाला स्पर्शही करीत नाही ५.
परीस सर्व धातूंसी खेंव देतां । मिळणीं सोनें करी तत्त्वतां ।
तो सुवर्णावांचूनि सर्वथा । आणिका पदार्था नातळे ॥६॥
तो सुवर्णावांचूनि सर्वथा । आणिका पदार्था नातळे ॥६॥
परीस सर्व धातूंना मिठी घालूं लागला असतां तो ज्या धातूला स्पर्श करतो, त्या धातूचे खरोखर सोनेच करतो. तो सोन्यावांचून दुसऱ्या पदार्थाला मुळींच शिवत नाही ६.
तैसा साधू म्हणे जें जें माझें । तें तें त्यासी नाठवे दुजें ।
ऐक्यभावाचीं नाचवी भोजें । अधोक्षजें अंकितु ॥७॥
ऐक्यभावाचीं नाचवी भोजें । अधोक्षजें अंकितु ॥७॥
त्याप्रमाणे साधु जें जें माझें असें म्हणतो, तें तें त्याला दुसरे असे वाटतच नाही. त्याला श्रीकृष्णानेच अंकित केल्यामुळे तो ऐक्यभावाचेंच महत्व वाढवीत असतो ७.
चिन्मात्री जडलें मन । विश्व जाहलें चैतन्यघन ।
बुडालें परिग्रहाचें भान । अकिंचनपण या नांव ॥८॥
बुडालें परिग्रहाचें भान । अकिंचनपण या नांव ॥८॥
चैतन्यस्वरूपामध्येच मन जडले, सर्व विश्व चैतन्यानेच भरलेले आहे असे वाटू लागले, परिग्रहाची आठवण नाहींशी झाली, की अशा त्या स्थितीलाच आकिंचनपण असें नांव आहे ८.
सकळ सांडूनि वना गेला । वनीं वनिता चिंतू लागला ।
तो त्यागचि बाधकत्वा आला । उलथोन पडिला परिग्रहीं ॥९॥
तो त्यागचि बाधकत्वा आला । उलथोन पडिला परिग्रहीं ॥९॥
घरांतील प्रपंच सोडून अरण्यात गेला आणि अरण्यांतही स्त्रीचे चिंतन करूं लागला, तेव्हां तो त्यागच त्याला बाधक झाला व तो फिरून परिग्रहांत पडला ९.
उंडणी भिंती चढों लाहे । चढते कष्ट व्यर्थ पाहे ।
ते पूर्विल्यापरीस तळीं जाये । उलंडूनि ठाये अतिदुःखी ॥९१०॥
ते पूर्विल्यापरीस तळीं जाये । उलंडूनि ठाये अतिदुःखी ॥९१०॥
आळी भिंतीवर चढत असते पण ते तिचे चढावयाचे कष्ट व्यर्थ होत. कारण ती पूर्वीपेक्षाही अधिक खोल पडून उताणी होते आणि अत्यंत दुःख भोगते ९१०,
तैशी मुंगी नव्हे पाहें । उंडणी घेऊनि वृक्षावरी जाये ।
सत्संगती मूर्ख उद्धरों लाहे । परी ते उपाये न करिती ॥११॥
सत्संगती मूर्ख उद्धरों लाहे । परी ते उपाये न करिती ॥११॥
पण मुंगीचे मात्र तसे नाही. ती आळीला घेऊन वृक्षावर जाते. त्याप्रमाणे सत्संगतीने मूर्ख उद्धरूं शकतो, पण ते मूर्ख उपायच करीत नाहीत ". ११
मुंगी लहान उंडणी थोर । ते तिचा करूं शके उद्धार ।
तैसे अकिंचन जे नर । ते करिती उद्धार सकळांचा ॥१२॥
तैसे अकिंचन जे नर । ते करिती उद्धार सकळांचा ॥१२॥
पाहावयास गेले तर मुंगी लहान व आळी थोर असते. तरी पण मुंगी आळीचा उद्धार करूं शकते. त्याप्रमाणे जे अकिंचन पुरुष असतात तेही सर्वांचा उद्धार करतात १२.
असो मूर्खांची जे त्यागिती गती । ते अत्यंतबाधें बाधका होती ।
जंव धरिली नाहीं सत्संगती । तंव त्यागस्थिती कळेना ॥१३॥
जंव धरिली नाहीं सत्संगती । तंव त्यागस्थिती कळेना ॥१३॥
असो. मूर्खाची त्याग करण्याची जी पद्धति ती अत्यंत बाधकपणाने त्रासदायक मात्र होते. कारण, जोपर्यंत सत्संगति धरलेली नाही, तोपर्यंत त्यागाची स्थिति कळतच नाही १३.
प्रपंच सांडूनी वना गेला । तो देहप्रपंचें दृढ अडकला ।
देही देहो जेणें मिथ्या केला । तो सत्य झाला अकिंचन ॥१४॥
देही देहो जेणें मिथ्या केला । तो सत्य झाला अकिंचन ॥१४॥
मूर्ख हा प्रपंच सोडून वनाला गेला, तरी तेथेही तो देहाच्या प्रपंचानेंच पक्का अडकून राहतो. पण देहांत असून ज्याने देह मिथ्या करून सोडला, तोच खरोखर अकिंचन झाला म्हणून समजावें १४.
मूर्खासी त्याग तो झाला बाधू । परिग्रहीं असोनि मुक्त साधू ।
सबाह्य त्यागें अतिशुद्धु । शुकनारदू तिहीं लोकीं ॥१५॥
सबाह्य त्यागें अतिशुद्धु । शुकनारदू तिहीं लोकीं ॥१५॥
मूर्खाला त्याग करूनही तो बाधक झाला, आणि साधु हा परिग्रहांत असूनही मुक्त असतो. अंतर्बाह्य त्याग करूनच शुक आणि नारद हे तिन्ही लोकांत अत्यंत पवित्र झाले १५,
ते दोघेही लागती जनकाच्या पायीं । तो राज्य करितांही विदेही ।
त्यासी मीही मानीतसें पाहीं । अभिनव नवाई साधूची ॥१६॥
त्यासी मीही मानीतसें पाहीं । अभिनव नवाई साधूची ॥१६॥
पण ते दोघेही येऊन जनक राजाच्या पायीं लागले. कारण, जनक हा राज्य करीत असतांही विदेही होता. प्रत्यक्ष मीसुद्धा त्याला मान देतो. साधूची महती आश्चर्यकारक आहे पहा ! १६.
या नांव मुख्य अकिंचनता । तुज म्यां सांगीतली तत्त्वतां ।
हे बारावी लक्षणता । ऐक आतां अनीहा ॥१७॥
हे बारावी लक्षणता । ऐक आतां अनीहा ॥१७॥
ह्याचेच नांव मुख्यतः अकिंचनता हें होय. ती खरोखर मी तुला सांगितली. हें बारावे लक्षण. आता 'अनीहा' ऐक १७.
अनीहा झाली बापुडी । जेथ जाय तो दूर दवडी ।
कोणी राहों नेदी अर्धघडी । अति चरफडी निराश्रयें ॥१८॥
कोणी राहों नेदी अर्धघडी । अति चरफडी निराश्रयें ॥१८॥
अनीहा (म्हणजे निरिच्छता) दीन झाली होती. ती ज्याच्याकडे जाई तो तिला दूर घालवून देत असे. तिला कोणी अर्धी घटकासुद्धा थारा देत नसे. अशा प्रकारे ती निराश्रित झाल्यामुळे चरफडत होती १८.
अनीहा हिंडता लोकीं तिहीं । तिळभरी ठावो बसावया नाहीं ।
ईहा वैरिणी लागली पाहीं । ठायींच्या ठायीं दंडवी ॥१९॥
ईहा वैरिणी लागली पाहीं । ठायींच्या ठायीं दंडवी ॥१९॥
निरिच्छता ही तिन्ही लोकांत हिंडतां हिंडतां तिला बसावयाला तिळभरसुद्धा जागा तर मिळाली नाहींच, पण उलट 'ईहा' (म्हणजे इच्छा) ही वैरीण तिच्या पाठीस लागून ती जेथे तेथें तिला मार देववीत असे १९.
कोणी येवों नेदी दाराकडे । अतिदीन जाली बापुडें ।
धाया मोकलोनि रडे । गार्हाणें संतांपुढें देवों आली ॥९२०॥
धाया मोकलोनि रडे । गार्हाणें संतांपुढें देवों आली ॥९२०॥
त्या अनीहेला कोणी दारांतसुद्धा पाय ठेवू देत नसे. त्यामुळे ती बापढी अतिशयच दीनवाणी होऊन घाय मोकलून रडू लागली आणि आपल्या परिस्थितीचे गाहाणे सांगावयाला संतांपुढे आली ९२.
ते कृपाळू दयामेळें । निजकरें पुसोनि डोळे ।
प्रतिपाळिली स्वहितकाळें । संतबळें वाढली ॥२१॥
प्रतिपाळिली स्वहितकाळें । संतबळें वाढली ॥२१॥
ते मूळचेच कृपाळू असल्यामुळे त्यांना तिची दया येऊन त्यांनी आपल्या हातांनी तिचे डोळे पुसले आणि आपल्या हिताकरितां तिचा प्रतिपाळ केला. अशा रीतीने ती संतांच्या बळावर वाढली २१,
त्यापूर्वील वैर स्मरोनियां । ईहा वैरिणी साधावया ।
संतांसी पुसोनि उपाया । तिच्या अपाया प्रवर्तली ॥२२॥
संतांसी पुसोनि उपाया । तिच्या अपाया प्रवर्तली ॥२२॥
आणि पूर्वीचे वैर मनांत आणून त्या ईंहेचा (म्हणजे इच्छेचा) सूड उगविण्यासाठी संतांना त्याबद्दल उपाय विचारून ती तिला छळावयाला प्रवृत्त झाली २२.
ईहेसी नाना चेष्टीं चेष्टवितां । अहं आणि जाण ममता ।
कामें अंगीं घातली तत्त्वतां । कामकांता ते झाली ॥२३॥
कामें अंगीं घातली तत्त्वतां । कामकांता ते झाली ॥२३॥
अहं आणि ममता ह्या ईहेच्या (म्हणजे इच्छेच्या) मैत्रिणी. त्यांनी ईहेला अनेक प्रकारच्या खेळांनी खेळवतां खेळवतां तिला कामाने आपल्या स्वाधीन करून घेतली व ती कामाची स्त्री झाली २३.
ईहा कामबळें वाढली थोर । व्यापूनि राहिली घरोघर ।
तिसीं साधावया वैर । अनीहा सत्वर चालिली ॥२४॥
तिसीं साधावया वैर । अनीहा सत्वर चालिली ॥२४॥
कामाचा पाठिंबा मिळतांच इस्छा ही फारच प्रबळ झाली आणि ती घरोघर व्यापून राहिली. तेव्हा तिचा सूड उगविण्यासाठी निरिच्छा सपाक्याने निघाली २४.
असंगशस्त्र मागोनि संतां । ईहेच्या करावया घाता ।
आधीं मारूं धांवे अहंममता । दोघें धाकता निमालीं ॥२५॥
आधीं मारूं धांवे अहंममता । दोघें धाकता निमालीं ॥२५॥
तिनें संतांपासून असंगपणाचे शस्त्र मागून घेतले आणि इच्छेचा घात करण्यासाठी ती आधी 'अहं" आणि 'ममता' ह्या दोघांना मारावयास धावून गेली. तेव्हां ती दोघे भयानेच जेथल्या तेथेच ठार झाली २५,
अनीहा पाठीं लागल्या जाण । अहंममतेसी म्हातारपण ।
थरथरां कांपोनि प्राण । घायेंवीण सांडिला ॥२६॥
थरथरां कांपोनि प्राण । घायेंवीण सांडिला ॥२६॥
कारण निरिच्छा पाठीस लागतांच अहं-ममतेला म्हातारपण म्हणजे अंतकाळच प्राप्त झाला. ती दोघे लटलटयं कां' लागली आणि घाव न लागताही, त्यांनी तेथल्या तेथेंच प्राण टाकला २६.
अनीहा देखोनि दिठीं । काम पळे बारा वाटीं ।
संकल्पाचे शेवटिले गोटीं । उठाउठी पाडिला ॥२७॥
संकल्पाचे शेवटिले गोटीं । उठाउठी पाडिला ॥२७॥
अनीहेला (म्हणजे निरिच्छेला) डोळ्यांनी पाहतांच काम हा बारा वाटांनी पळत सुटला. त्याला संकल्पाच्या शेवटच्या गोटामध्ये हां हां म्हणता ठार केला २७.
कामू पडतां रणांगणीं । क्रोधादि शूर पडिले रणीं ।
ईहेचा कैवारी नुरेच कोणी । एकेक शोधूनी मारिले ॥२८॥
ईहेचा कैवारी नुरेच कोणी । एकेक शोधूनी मारिले ॥२८॥
'अशा प्रकारे काम हा रणांगणामध्ये पडतांच क्रोधादिक शूर वीर होते तेही धारातीर्थी पतन पावले. अखेर इच्छेचा पाठीराखा कोणीच उरला नाही. कारण, एकेकाला शोधशोधून मारून टाकले २८.
एवं अनीहेसमोर । राही ऐसा नाहीं वीर ।
मारूनि अवघ्यांचा केला चूर । क्रिया करणार कोणी नाहीं ॥२९॥
मारूनि अवघ्यांचा केला चूर । क्रिया करणार कोणी नाहीं ॥२९॥
मिळून निरिच्छेच्या समोर उभा राहील असा वीर कोणीच शिल्लक राहिला नाही, तिने सर्वांना मारून अगदी चक्काचूर करून सोडला. त्यांची क्रिया करावयालाही कोणी उरला नाही २९.
काम निमाल्या सर्वथा । ईहा रांडवली वस्तुतां ।
मुख न दावीच संतां । अधोगमनता पळाली ॥९३०॥
मुख न दावीच संतां । अधोगमनता पळाली ॥९३०॥
कामाचा निःपात होतांच इच्छा ही खरोखर विधवा झाली. ती संतांना तोंट, दाखवितांच खाली तोंड करून पळून गेली ९३०.
यालागीं ईहेसवें जो लागला । तो जाणावा अधोगती गेला ।
अनीहेचा जो अंकित झाला । तो आवडला गोविंदा ॥३१॥
अनीहेचा जो अंकित झाला । तो आवडला गोविंदा ॥३१॥
म्हणून इच्छेच्या संगतीला जो लागला, तो अधोगतीला गेला म्हणून समजावे आणि जो निरिच्छेचा अंकित झाला, तो गोविंदालाही प्रिय झाला म्हणून समजावें ३१.
म्हणसी अनीहा ते कोण । काय ते ईहेचें लक्षण ।
ऐक सांगेन संपूर्ण । जेणें बाणे खूण जिव्हारीं ॥३२॥
ऐक सांगेन संपूर्ण । जेणें बाणे खूण जिव्हारीं ॥३२॥
आता तूं म्हणशील की, 'अनीहा' (म्हणजे निरिच्छता) ती कोण ? आणि ' ईहे ' चे (म्हणजे इच्छेचे) लक्षण कोणते ? तर ज्याच्या योगाने त्यांचीही खूण अंत:करणास पटेल, असे सर्व सांगेन ३२.
काम्यकर्मादि क्रियाजाळ । तेचि ईहा जाणावी अतिचपळ ।
अंतरीं जे सुनिश्चळ । तेचि केवळ अनीहा ॥३३॥
अंतरीं जे सुनिश्चळ । तेचि केवळ अनीहा ॥३३॥
काम्यकर्मादिकांच्या क्रियेचे जे जाळे, तीच अत्यंत चपळ 'ईहा' (म्हणजे इच्छा) म्हणून समजावी आणि अंत:करणांत अढळ असणारी जी, तीच 'अनीहा' (म्हणजे निरिच्छता) होय ३३.
अंतरीं कामाची वार्ता । नुपजे कर्माची कर्मावस्था ।
अणुभरी न रिघे उद्वेगता । अनीहा तत्त्वतां ते जाण ॥३४॥
अणुभरी न रिघे उद्वेगता । अनीहा तत्त्वतां ते जाण ॥३४॥
अंतःकरणांत इच्छेचा गंधही उद्भवत नाही, किंवा कर्माची कर्मावस्थाही उत्पन्न होत नाही, अणुमात्र देखील उद्विग्नता प्राप्त होत नाही, तीच खरोखर 'अनीहा' (म्हणजे निरिच्छता) होय ३४.
ऐशी अनीहा असे ज्यासी । देवो आज्ञाधारकू त्यापाशीं ।
ते अनीहा संतांची दासी । अहर्निशीं जीवेंभावें ॥३५॥
ते अनीहा संतांची दासी । अहर्निशीं जीवेंभावें ॥३५॥
अशी निरिच्छता ज्याला प्राप्त होते, त्याच्याजवळ देवही आज्ञाधारक होऊन राहतो. तीच निरिच्छता रात्रंदिवस जिवाभावाने संतांची दासो होऊन राहते ३५.
हे अनीहा अतिगौरवें । साधुलक्षण तेरावें ।
मितभोजन तें चौदावें । लक्षण वैभवें अवधारीं ॥३६॥
मितभोजन तें चौदावें । लक्षण वैभवें अवधारीं ॥३६॥
ही 'अनीहा' (म्हणजे निरिच्छता) अत्यंत गौरवाने साधूंचें तेरावें लक्षण होऊन राहिली आहे. आतां चौदावें लक्षण 'मितभोजन', तेही त्याच्या थोरवीसहवर्तमान श्रवण कर ३६.
न कोंडे रसनेचिया चाडा । न पडे क्षुधेच्या पांगडा ।
आवडीनावडीचा उपाडा । करूनि निधडा भोजनीं ॥३७॥
आवडीनावडीचा उपाडा । करूनि निधडा भोजनीं ॥३७॥
जो जिव्हेच्या इच्छेला बांधला जात नाही, क्षुधेच्या तावडीत कधीं सांपडत नाही आणि आवडीनिवडीच्या भरीस न पडतां जो भोजनाला तयार असतो ३७;
प्राणु आकांक्षी अन्नातें । जठराग्नि भक्षी त्यातें ।
उभयसाक्षी मी येथें । जाणोनि निरुते रस सेवी ॥३८॥
उभयसाक्षी मी येथें । जाणोनि निरुते रस सेवी ॥३८॥
अन्नाची इच्छा प्राण करतो, जठराग्नि अन्नाला भक्षण करतो, त्या दोघांना मी येथे फक्त साक्षीदार मात्र आहे हे जाणून साऱ्या रसांचे सेवन करतो ३८;
जें जें आलें भोजनासी । दृष्टीनें त्याचे दोष निरसी ।
अतिपवित्र करूनि त्यासी । निजसमरसीं सेवितू ॥३९॥
अतिपवित्र करूनि त्यासी । निजसमरसीं सेवितू ॥३९॥
जे जे काय भोजनाला येईल, त्याचे दोष दृष्टीनेच नाहीसे करतो आणि त्याला अत्यंत पवित्र करून आत्मैक्यानेच त्याचे सेवन करतो ३९,
न देखे भोग्य पदार्था । नाठवे मी एक भोक्ता ।
ग्रासीं समरसीं अच्युता । भोगूनि अभोक्ता मितभोजी ॥९४०॥
ग्रासीं समरसीं अच्युता । भोगूनि अभोक्ता मितभोजी ॥९४०॥
खाण्याजोगे पदार्थ कोणते हें जो पहातच नाही, किंवा मी एक खाणारा आहे ह्याचीही ज्याला आठवण नसते; तो मितभोजी साधु प्रत्येक घास श्रीकृष्णाशी समरस झाला आहे असे मानून सारे जेवूनही न जेवलेला असा असतो ९४०.
अग्नि आधीं आपणयाऐसें करी । मग त्या आहारातें अंगीकारी ।
साधु आधीं द्वैतातें निवारी । मग स्वीकारी आहारातें ॥४१॥
साधु आधीं द्वैतातें निवारी । मग स्वीकारी आहारातें ॥४१॥
आहाराला अग्नि हा आधी आपल्यासारखा करतो आणि मग त्याचा अंगीकार करतो, त्याप्रमाणे साधु आधी द्वैताचे निवारण करून मग आहाराचा स्वीकार करतो ४१.
याचि नांव मितभोजन । साधूचे आहाराचें लक्षण ।
युक्तीवीण अल्प भोजन । तें पथ्य जाण रोगियाचें ॥४२॥
युक्तीवीण अल्प भोजन । तें पथ्य जाण रोगियाचें ॥४२॥
ह्याचंच नांव 'मितभोजन' आणि हेच साधूच्या आहाराचे लक्षण होय. युक्तीशिवाय थोडे जेवावयाचें तें रोग्याचे पथ्य म्हणून समजावे ४२.
ग्रासोग्रासीं ब्रह्मार्पण । त्या नांव परिमित भोजन ।
हें चौदावें लक्षण । साधूचें जाण उद्धवा ॥४३॥
हें चौदावें लक्षण । साधूचें जाण उद्धवा ॥४३॥
घासाघासाला जे अन्न ब्रह्मार्पण होत असेल, त्याचंच नांव 'परिमित भोजन'. उद्धवा ! हे साधूचे चौदावें लक्षण आहे हे ध्यानात ठेव ४३.
समळजळसंभारी । सरितामेळू मिळे सागरीं ।
तो डहुळेना तिळभरी । निर्विकारी निर्मळू ॥४४॥
तो डहुळेना तिळभरी । निर्विकारी निर्मळू ॥४४॥
मलिन पाण्याचे लोंढे आपल्यामध्ये मिळवून घेऊन अनेक नद्या समुद्राला मिळतात, पण तो तिळभरही गढूळ होत नाही, तो निर्मळ आणि निर्विकारच असतो ४४,
तैशा आलिया नाना ऊर्मी । ज्यांसी गजबजु नाहीं मनोधर्मी ।
शांति संतांचि पराक्रमी । उपक्रमी निजशक्ती ॥४५॥
शांति संतांचि पराक्रमी । उपक्रमी निजशक्ती ॥४५॥
त्याप्रमाणे कितीही ऊर्मि आल्या तरी ज्यांच्या मनोधर्मात चलबिचल होत नाही, अशा संतांची पराक्रमी शांति त्यांच्या आत्मशक्तीला प्रेरित करीत असते ४५.
जेवीं कां नागवेलीची वेली । आधारवीण न वचे वेंगली ।
तैसी संतबळें शांती वाढली । मंडपा चढली चिन्मात्र ॥४६॥
तैसी संतबळें शांती वाढली । मंडपा चढली चिन्मात्र ॥४६॥
ज्याप्रमाणे नागवेलीची वेल आधाराशिवाय वृक्षावर चढत नाही, त्याप्रमाणे संतबळाच्या आधारानेच शांति वाढली आणि चित्स्वरूपाच्या मंडपावर चढली ४६.
झांकळोनि दश दिशांसी । आभाळ दाटल्या आकाशीं ।
गगन अविकारी त्या दोषासी । आभाळासी नातळे ॥४७॥
गगन अविकारी त्या दोषासी । आभाळासी नातळे ॥४७॥
दशदिशांना झांकून आकाशामध्ये अने भरून आली, तरी आकाश हे त्या दोषाने विकृत होत नाही. ते त्या अभ्राला शिवतही नाही ४७.
शीत उष्ण पर्जन्यधारा । अंगीं न लगती अंबरा ।
तेवीं साधूचा उभारा । द्वंद्वसंभारा निर्द्वंद्व ॥४८॥
तेवीं साधूचा उभारा । द्वंद्वसंभारा निर्द्वंद्व ॥४८॥
थंड, ऊन किंवा पावसाच्या धारा काही आकाशाच्या आंगाला लागत नाहीत त्याप्रमाणे साधूचें स्थैर्य अनेक द्वंद्वांचा संभार प्राप्त झाला असतांही निद्वच असते ४८.
तैशा उंच नीच नाना अवस्था । निबिड दाटल्या मोहममता ।
क्षोभु नुपजे ज्याच्या चित्ता । त्या नांव तत्त्वतां निजशांती ॥४९॥
क्षोभु नुपजे ज्याच्या चित्ता । त्या नांव तत्त्वतां निजशांती ॥४९॥
त्याचप्रमाणे उच्च-नीच अशा नानाप्रकारच्या अवस्था प्राप्त झाल्या किंवा मोहममता कितीही दाटून राहिल्या, तरी ज्याच्या चित्ताला क्षोभ म्हणून उत्पन्नच होत नाही, त्याचंच नांव खरोखर आत्मशांति ४९.
संतांचेनि शांति गहन । शांतीचेनि संत पावन ।
हें अनन्य निजलक्षण । पंधरावा गुण संतांचा ॥९५०॥
हें अनन्य निजलक्षण । पंधरावा गुण संतांचा ॥९५०॥
संतांमुळेच शांति थोर झाली आहे आणि शांतीमुळेच संत पावन होतात. हे परस्परलक्षण हाच संतांचा पंधरावा गुण होय ९५०.
जैं मीपणें नव्हतें जन्मनाम । तैंच पूर्वजांचें निजधाम ।
आपुली मिरासी जे उत्तम । तेथ मनोधर्म स्थिरु ज्याचा ॥५१॥
आपुली मिरासी जे उत्तम । तेथ मनोधर्म स्थिरु ज्याचा ॥५१॥
जेथें मीपणाने आपल्या जन्माचे नांवच नसते, तेथेच आपल्या पूर्वजांचें मूळ घर होय. आपली अतिउत्तम मिरासही तीच. तेथेच ज्याचा मनोधर्म स्थिर होतो ५१;
मज जन्मचि नाहीं झालें । मरण म्यां नाहीं देखिलें ।
ऐसें मन मूळीं स्थिरावलें । स्थिरता बोलिलें या नांव ॥५२॥
ऐसें मन मूळीं स्थिरावलें । स्थिरता बोलिलें या नांव ॥५२॥
आणि माझा जन्मच झालेला नाही, मी मरण पाहिलेलेच नाही, असे मुळांतच मन स्थिरावलेले असते; त्या स्थितीला 'स्थिरता' असें नांव दिले आहे ५२.
चहूं आश्रमांहूनि उत्तम । आपुला जो निजाश्रम ।
तेथें स्थिरावोनि मनोधर्म । वर्णाश्रम चालवी ॥५३॥
तेथें स्थिरावोनि मनोधर्म । वर्णाश्रम चालवी ॥५३॥
आपला जो आश्रम असेल तोच चारही आश्रमांहून उत्तम होय असे समजून तेथेंच मनोधर्म स्थिर करून वर्णाश्रम चालवितो ५३,
चहूं वर्णांमाजीं पवित्रता । जेणें ब्राह्मणांची ब्राह्मणता ।
तेथें स्थिराविलें जेणें चित्ता । जाण स्थिरता ती नांव ॥५४॥
तेथें स्थिराविलें जेणें चित्ता । जाण स्थिरता ती नांव ॥५४॥
आणि चारही वर्णामध्ये ज्याला पवित्रता आली आहे, ज्याच्यामुळे ब्राह्मणांना ब्राह्मणपणा आला आहे अशा ब्रह्माच्या ठिकाणींच ज्याचे मन स्थिरावले, त्याच त्याच्या स्थितीला स्थिरता हे नांव देता येईल ५४.
तिहीं लोकीं स्थिरता । मरों टेंकली सर्वथा ।
कोणी नाहीं प्रतिपाळिता । हातीं धरिता न देखे ॥५५॥
कोणी नाहीं प्रतिपाळिता । हातीं धरिता न देखे ॥५५॥
त्रिभुवनांत स्थिरता ही अगदी मरावयास टेकली होती. तिला हातीं धरणारा (स्वीकारणारा) व तिचा प्रतिपाळ करणारा कोणीच दिसत नव्हता ५५.
दारीं राहों नेदी कोणी । कोण देईल पथ्यपाणी ।
अवघी टाकिली निरंजनीं । ते सज्जनीं प्रतिपाळिली ॥५६॥
अवघी टाकिली निरंजनीं । ते सज्जनीं प्रतिपाळिली ॥५६॥
तिला कोणी दाराशीं उभी राहू देईना,मग पथ्यपाणी देणार कोण ? सर्वांनी तिला उघड्यावर टाकून दिली, तेव्हां सजनांनी तिचा प्रतिपाळ केला ५६.
स्थिरता वाढली संतबळें । जिणोंनि वर्णाश्रमादि टवाळें ।
भेदोनि अकारादिवर्णपटळें । एके वेळे वाढली ॥५७॥
भेदोनि अकारादिवर्णपटळें । एके वेळे वाढली ॥५७॥
अशा रीतीने स्थिरता ही संतांच्या बळावर चांगली पुष्ट झाली, वर्णाश्रमादि नसतेच भेद नष्ट करून व अकारादि सर्व मातृकांचा भेद करून एकदम मोठी झाली ५७,
स्वस्वरूपीं सायुज्यता । पावोनि स्थिरावली स्थिरता ।
तेथ वाट मोकळी संतां । स्वभावतां त्यां केली ॥५८॥
तेथ वाट मोकळी संतां । स्वभावतां त्यां केली ॥५८॥
आणि स्वस्वरूपामध्ये सायुज्यता मिळवून ती स्थिरता तेथें स्थिर होऊन बसली. तेव्हा तिने सहजच त्या संतांना तेथे वाट मोकळी करून दिली ५८.
तेथ स्वस्वरूपें स्वकर्म । स्वस्वरूपें वर्णाश्रम ।
स्वस्वरूपें स्वधर्म । स्थिरतासंभ्रम या नांव ॥५९॥
स्वस्वरूपें स्वधर्म । स्थिरतासंभ्रम या नांव ॥५९॥
तेव्हां स्वस्वरूपानेच स्वकर्म करणे, स्वस्वरूपानेच वर्णाश्रम चालविणे व स्वस्वरूपानेच स्वधर्म पाळणे, याचेच नांव स्थिरतेचे स्वरूप ५९.
ऐसी स्वधर्मकर्मीं अवस्था । ती नांव उत्तम स्थिरता ।
हे सोळावी लक्षणता । मच्छरणता ते ऐक ॥९६०॥
हे सोळावी लक्षणता । मच्छरणता ते ऐक ॥९६०॥
अशी जी आपल्या धर्मकर्मातील वागणूक, तिचंच नांव उत्तम स्थिरता होय. आतां 'मला शरण येणे' ह ज सोळावें लक्षण ते ऐक ९६०.
सरिता सागरा शरण आली । ते समरसोनि सिंधू झाली ।
तैसी शरण जे वृत्ति मज आली । ते पावली दशा माझी ॥६१॥
तैसी शरण जे वृत्ति मज आली । ते पावली दशा माझी ॥६१॥
नदी समुद्राला शरण आली तर ती त्याच्याशी एकरूप होऊन समुद्रस्वरूपच झाली असे होते. त्याप्रमाणे जी वृत्ति मला शरण आली, ती मत्स्वरूपच झाली असे समजावें ६१.
लवण जीवना आलें शरण । तें तत्काळ जाहलें जीवन ।
तैसा अनन्य मज जो शरण । तो मीचि जाण होऊनि ठाके ॥६२॥
तैसा अनन्य मज जो शरण । तो मीचि जाण होऊनि ठाके ॥६२॥
मीठ पाण्याला शरण आले की तत्काल त्याचे पाणीच झालें असे होते, त्याप्रमाणे मला जो अनन्यभावाने शरण येतो तो मीच होऊन राहतो हे लक्षात ठेव ६२.
मज रिघोनियां शरण । जो वांछी महिमा सन्मान ।
तो गुळांतील पाषाण । केवळ जाण गुळदगडू ॥६३॥
तो गुळांतील पाषाण । केवळ जाण गुळदगडू ॥६३॥
मला शरण येऊन जो मानसन्मानाची किंवा कीर्तीची इच्छा करतो, तो गुळांतला खडा, केवळ गूळदगडच म्हणून समजावा ६३.
जो कां गुळें माखिला दगडू । तो पाहतां दिसे वरिवरी गोडू ।
शेखीं परिपाकीं निवाडू । अतिजडू कठिणत्वें ॥६४॥
शेखीं परिपाकीं निवाडू । अतिजडू कठिणत्वें ॥६४॥
गुळानें जो दगड माखलेला असतो, तो पाहिला असतां वरून वरून गोड दिसतो. पण शेवटी शिजवितांना त्याचे खरे स्वरूप असे कळते की, तो कठीण असल्यामुळे अत्यंत जड आहे ६४.
तैसें वरिवरी दावी माझें भजन । हृदयीं विषयअभिलाष ।
तो नव्हे माझा अनन्यशरण । अतिदूषण लोभाचें ॥६५॥
तो नव्हे माझा अनन्यशरण । अतिदूषण लोभाचें ॥६५॥
त्याप्रमाणे जो वरवर माझें भजन दाखवितो आणि मनांत विषयाचा अभिलाष धरतो, तो काही मला अनन्यभावाने शरण आलेला नव्हे. त्याला लोभाचा मोठा कलंक लागलेला असतो ६५.
सर्वांगीं सुंदर सुरेख । जिच्या नाकावरी पांढरें टीक ।
तिसी वरीना साधु लोक । तैसा विषयलोभु देख मद्भजनीं ॥६६॥
तिसी वरीना साधु लोक । तैसा विषयलोभु देख मद्भजनीं ॥६६॥
एखादी कन्या सर्व अंगांनी सुंदर व सुरेख आहे, परंतु तिच्या नाकावर मात्र पांढरा कोडाचा डाग असेल, तर तिला जसा कोणी सुज्ञ मनुष्य वरणार नाही, त्याप्रमाणेच माझ्या भजनांत विषयलोभ हा दोष आहे हे लक्षात ठेव ६६.
रांडवा केलें काजळकुंकूं । देखोनि जग लागे थुंकूं ।
तैसा विषयांचा अभिलाखू । जेवीं वोकिला वोकू अतिनिंद्य ॥६७॥
तैसा विषयांचा अभिलाखू । जेवीं वोकिला वोकू अतिनिंद्य ॥६७॥
किंवा विधवेनें काजकुकू लावले तर जग जसें तिला पहातांच थुंकू लागते (तिचा तिरस्कार करतें), किंवा ज्याप्रमाणे ओकलेली ओक अतिनिंद्य समजतात, त्याप्रमाणेच विषयांचा अभिलाषही अत्यंत निंद्य आहे ६७.
त्रैलोक्यसाम्राज्यवैभव जाण । जो थुंकोनि रिघाला मज शरण ।
तो समरसें मीचि जाण । मानापमान त्या कैंचा ॥६८॥
तो समरसें मीचि जाण । मानापमान त्या कैंचा ॥६८॥
त्रैलोक्याच्या साम्राज्यवैभवाचा तिरस्कार करून जो मला शरण येतो, तो ऐक्यत्वाने मीच होतो असे समज. मग त्याला मानापमान कशाचा ? ६८.
या नांव मच्छरण । हें सतरावें लक्षण ।
उद्धवा जाण संपूर्ण । मननगुण तो ऐक ॥६९॥
उद्धवा जाण संपूर्ण । मननगुण तो ऐक ॥६९॥
ह्याचें नांव मला शरण येणे. उद्धवा ! हे सर्व सतरावें लक्षण होय हे लक्षात ठेव. आतां जो 'मनन' गुण आहे तो ऐक ६९.
श्रुतिगुरुवाक्यनिरूपण । ऐकतां अद्वैतश्रवण ।
युक्तिप्रयुक्तीं पर्यालोचन । मनन गुण त्या नांव ॥९७०॥
युक्तिप्रयुक्तीं पर्यालोचन । मनन गुण त्या नांव ॥९७०॥
वेदशास्त्रांचे निरूपण व गुरुवाक्याचे निरूपण ऐकलें असतां, किंवा अद्वैताचे श्रवण केले असता, त्या सर्वांचा युक्तीने साधकबाधक प्रमाणांनी आपल्याच मनाशी वारंवार विचार करणे त्याचे नांव 'मनन' गुण ९७०.
अग्निकापुरां भेटी होतां । तो अग्नीचि होय वस्तुतां ।
तेवीं माझे स्वरूपीं मन ठेवितां । मन चित्स्वरूपता पावलें ॥७१॥
तेवीं माझे स्वरूपीं मन ठेवितां । मन चित्स्वरूपता पावलें ॥७१॥
अग्नि आणि कापूर ह्यांची भेट झाली असतां तो कापूर खरोखर अग्निरूपच होतो, त्याप्रमाणे माझ्या स्वरूपांत मन ठेवले असतां तें मनच चित्स्वरूप होऊन जाते ७१.
मन चिदंशें असे जाण । तें चिन्मात्र जाहलें करितां मनन ।
जेवीं जीवनीं जन्मलें लवण । तें होय जीवन निजमिळणीं ॥७२॥
जेवीं जीवनीं जन्मलें लवण । तें होय जीवन निजमिळणीं ॥७२॥
ज्याप्रमाणे पाण्यात उत्पन्न झालेले मीठ पाण्याशी मिळाले असतां तें पाणीरूपच होऊन जाते, त्याप्रमाणे मन हे चित्स्वरूपाचेच अंशभूत असते, तें मननाच्या योगाने चित्स्वरूपच होऊन गेलें असें होते ७२.
असो मननाचेनि लवलाहें । मन जेथवरी जावों पाहे ।
तेथवरी तया मीचि आहें । न वचतां राहें तेथही मी ॥७३॥
तेथवरी तया मीचि आहें । न वचतां राहें तेथही मी ॥७३॥
असो. मननाच्याच सामर्थ्याने मन जेथपर्यंत जाऊं पहाते, तेथपर्यंत त्याच्याबरोबर मीच असतो, किंवा ते न जातां स्थिर राहिले तरी तेथेही मी असतोच ७३.
दीप जेउता जाऊं बैसे । तेउता प्रकाशचि तया असे ।
कोठेंही न वचोनि ठायीं वसे । तेथेंही वसे प्रकाशू ॥७४॥
कोठेंही न वचोनि ठायीं वसे । तेथेंही वसे प्रकाशू ॥७४॥
दिवा जिकडे जाऊन बसेल तिकडे त्याला प्रकाश असतोच, किंवा तो कोठेही न जातां जागच्या जागी बसला तरी तेथेही प्रकाश असतोच ७४.
तैसें माझें करितां मनन । मद्रूपचि जाहलें मन ।
मग करितां गमनागमन । मद्रूपता जाण मोडेना ॥७५॥
मग करितां गमनागमन । मद्रूपता जाण मोडेना ॥७५॥
त्याप्रमाणे माझें मनन करतांना मन मपच झाले, म्हणजे मग ते कोठेही गेले किंवा गेले नाहीं तरी त्याची मद्रुपता मोडत नाही ७५.
एवं माझें स्वरूप जें केवळ । तेथें मद्रूपें मन निश्चळ ।
ध्रुवाचे परी अचंचळ । मननशीळ त्या नांव ॥७६॥
ध्रुवाचे परी अचंचळ । मननशीळ त्या नांव ॥७६॥
अशा प्रकारे माझें जें केवळ शुद्ध स्वरूप आहे, तेथें ज्याचे मन मत्स्वरूपाने स्थिर होऊन ध्रुवाप्रमाणे अढळ, राहिले, त्याला 'मननशील' असे म्हणतात ७६.
मुनि या पदाचें व्याख्यान । मननशीलता जाण ।
हें अठारावें लक्षण । तें हें निरूपण सांगितलें ॥७७॥
हें अठारावें लक्षण । तें हें निरूपण सांगितलें ॥७७॥
'मुनि' या शब्दाचा अर्थ मननशीलता असाच आहे हे लक्षात ठेव. हेच अठरावें लक्षण. त्याचे हे निरूपण तुला सांगितले ७७.
अत्यंत गोड निरूपण । पुढिले श्लोकीं दशलक्षण ।
तें ऐकावया उद्धव सावधान । सर्वांगीं कान होऊनि ठेला ॥७८॥
तें ऐकावया उद्धव सावधान । सर्वांगीं कान होऊनि ठेला ॥७८॥
पुढच्या श्लोकांत दहा लक्षणांचे अत्यंत गोड निरूपण आहे, तें ऐकण्याकरितां उद्धव हा सावधानतेने सर्वांगाचे कान करूनच बसला ७८.
अप्रमत्तो गभीरात्मा धृतिमाञ्जितषड्गुणः ।
अमानी मानदः कल्पो मैत्रः कारुणिकः कविः ॥ ३१ ॥
अमानी मानदः कल्पो मैत्रः कारुणिकः कविः ॥ ३१ ॥
[श्लोक ३१] तो सावध, निर्विकार आणि धैर्यवान असतो तहानभूक, शोकमोह आणि जरामृत्यू हे सहा विकार त्याने जिंकलेले असतात तो स्वतः मानाची इच्छा ठेवीत नाही, परंतु इतरांचा सन्मान करतो माझ्या भक्तीची महती पटवून देण्यात निष्णात असतो तो सर्वांचा मित्र असतो त्याच्या हृदयात करूणा असते माझ्या तत्त्वाचे त्याला यथार्थ ज्ञान झालेले असते. (३१)
जंववरी वृत्तिशून्य नव्हे मन । तंववरी विश्वासेना विचक्षण ।
वृत्तिरूपें सिंतरील मन । यालागीं सावधान निजबोधें ॥७९॥
वृत्तिरूपें सिंतरील मन । यालागीं सावधान निजबोधें ॥७९॥
जोपर्यंत मन वृत्तिशून्य होत नाही, तोपयत चाणाक्ष मनुष्य त्यावर विश्वास ठेवीत नाही. वृत्तीच्या रूपाने मन आपल्याला ठकवील म्हणून तो आत्मज्ञानाने सावध असतो ७९.
हां हो दुर्वासाऐसा सज्ञान । त्यासी क्षणक्षणा क्षोभवी मन ।
न विचारितां गुणागुण । शाप दारुण देवों धांवे ॥९८०॥
न विचारितां गुणागुण । शाप दारुण देवों धांवे ॥९८०॥
अहो ! दुर्वासासारखा ज्ञानी असूनही त्याला मन क्षणोक्षणी राग आणिते. त्या रागाच्या भरांत गुणावगुणांचा विचार न करितां तोही भयंकर शाप द्यावयाला धावला ! ९८०.
दुर्गंधा जन्मली मत्स्याचे पोटीं । पराशर नाडला तीसाठीं ।
नारद कौतुक पाहतां दिठी । केला गंगातटीं नारदी ॥८१॥
नारद कौतुक पाहतां दिठी । केला गंगातटीं नारदी ॥८१॥
दुर्गधा ही मत्स्याच्या पोटी जन्माला आली, पण तिच्यासाठीसुद्धा पराशर फसला. नारदाने डोळ्यांनी नुसती मौज पाहिली, पण तेवढ्याकरितां गंगातीरी त्याला 'नारदी, करून सोडले ! ८१.
आपुली कन्या देखोनि गोमटी । मनक्षोभें भोगावया उठी ।
ब्रह्मा धांवे सरस्वतीपाठीं । जो कां सृष्टिपितामहो ॥८२॥
ब्रह्मा धांवे सरस्वतीपाठीं । जो कां सृष्टिपितामहो ॥८२॥
सर्व सृष्टीचा जो आजोबा ब्रह्मदेव, तोही आपली सुंदर कन्या पाहून मन विकृत झाल्यामुळे तिचा उपभोग घेण्यास तयार झाला, आणि सरस्वतीच्या मागोमाग धावत सुटला ! ८२.
या मनाऐसें नाडक । जगामाजीं नाहीं आणिक ।
छळछद्में नाडी ज्ञाते लोक । साधु घातक मनाचे ॥८३॥
छळछद्में नाडी ज्ञाते लोक । साधु घातक मनाचे ॥८३॥
ह्या मनासारखें लबाड ह्या जगांत आणखी कोणी नाही. ते नानाप्रकारचा छळ करून वमैं काढून ज्ञाते लोकांनासुद्धा नाडते. साधु मात्र त्या मनाचे मारक (दमन करणारे) असतात ८३.
म्हणाल मनेंवीण भोग घडे । तरी वृत्तीसी क्षोभु कां पां चढे ।
हे बोल बोलती ते सज्ञान वेडे । साधूसी नावडे हे गोष्टी ॥८४॥
हे बोल बोलती ते सज्ञान वेडे । साधूसी नावडे हे गोष्टी ॥८४॥
आतां कदाचित् असें म्हणाल की, 'मनाशिवायच जर भोग घडतो, तर मग वृत्तीला तरी क्षोभ कां चढतो ?' पण असे भाषण करतात ते ज्ञानी असले तरी मूर्ख होत. साधूंना असे म्हणणे आवडत नाही ८४.
अधिष्ठूनि सत्त्वगुण । सूक्ष्मरूपें वृत्ति जाण ।
ते क्षोभवूनियां मन । मी मुक्त म्हणोन विषयी करी ॥८५॥
ते क्षोभवूनियां मन । मी मुक्त म्हणोन विषयी करी ॥८५॥
वृत्ति ही सत्त्वगुणाचा आश्रय करून सूक्ष्मरूपाने असते. ती मनाला क्षुब्ध करून 'मी मुक्त' अशी समजूत करून देऊन विषयी करून सोडते ८५.
मुक्ताभिमानें विषयासक्ती । हेचि मनक्षोभाची प्राप्ती ।
वृत्ति असोनियां मुक्ती । साधु न मानिती सर्वथा ॥८६॥
वृत्ति असोनियां मुक्ती । साधु न मानिती सर्वथा ॥८६॥
'मुक्त झालों' असा अभिमान बाळगावयाचा आणि विषयांत आसक्ति ठेवावयाची, हेच मनःक्षोभाने प्राप्त होते. म्हणून वृत्ति असेपर्यंत साधूंना मुक्ति ही मुळींच मान्य नाही ८६.
अतिनाटकी नाटक मन । मुक्तत्वें धरी अभिमान ।
त्याचें करावया निर्दळण । साधु सावधान निजबोधें ॥८७॥
त्याचें करावया निर्दळण । साधु सावधान निजबोधें ॥८७॥
मन हे मोठे नाटकी असून नाटक बनविणारे आहे. तेंच 'मुक्त झालों' अशा कल्पनेने अभिमान बाळगते. म्हणून त्याचा नाश करण्याकरितां साधु है आत्मज्ञानाने सावध असतात ८७.
मुखीं धरिल्या कृष्णसर्पासी । ढिलें करितां तो तत्काळ ग्रासी ।
मरे तंववरी आंवळावें त्यासी । तेवीं मनासी निर्दाळिती ॥८८॥
मरे तंववरी आंवळावें त्यासी । तेवीं मनासी निर्दाळिती ॥८८॥
कृष्णसर्पाचे तोंड हातांत धरले असतां हात जर ढिला सोडला, तर तो तात्काळ खाऊनच टाकतो. याकरितां तो मरेपर्यंत त्याचे तोंड आंवळलेच पाहिजे. त्याचप्रमाणे साधु मनाचे निर्दाळण करतात ८८,
मन निर्दाळावे सावधानता । बोलिली ते हे साधुलक्षणता ।
हा एकुणिसावा गुण सर्वथा । ऐक आतां विसावा ॥८९॥
हा एकुणिसावा गुण सर्वथा । ऐक आतां विसावा ॥८९॥
मनाचे निर्दाळण करावें अशाकरितां जी सावधानता सांगितली आहे, तेच हे साधूचे लक्षण होय. हा खरोखर एकुणिसावा गुण. आतां विसावा गुण ऐक ८९.
वर्षाकाळीं जळबळें सरिता । आल्या समुद्र नुचंबळे श्लाघ्यता ।
उष्णकाळीं त्या न येतां । क्षोभोनि सर्वथा आटेना ॥९९०॥
उष्णकाळीं त्या न येतां । क्षोभोनि सर्वथा आटेना ॥९९०॥
पर्जन्यकालांत पाण्याने तुडुंब भरलेल्या नद्या समुद्रात शिरल्या तरी समुद्र आब्यतेने फुगत नाही. किंवा उन्हाळ्यात त्या नद्या तशा तुडुंब भरून आल्या नाहीत तरी त्या रागाने समुद्र आटून जात नाहीं ९९०.
तैसें जाहलिया समृद्धिधन । साधूचें उल्हासेना मन ।
सकळ जाऊनि जाल्या निर्धन । दीनवदन हों नेणें ॥९१॥
सकळ जाऊनि जाल्या निर्धन । दीनवदन हों नेणें ॥९१॥
त्याप्रमाणे द्रव्याची रेलचेल झाली तरी साधूचे मन उल्हास पावत नाही, किंवा सर्वस्व जाऊन जो निर्धन झाला तरी दीनवाणे व्हावे हे जाणत नाही ९१.
दिवसराती येतांजातां । प्रकाशें पालटेना सविता ।
तेवीं आल्यागेल्या नाना अवस्था । गंभीरता अक्षोभ्य ॥९२॥
तेवीं आल्यागेल्या नाना अवस्था । गंभीरता अक्षोभ्य ॥९२॥
रात्र आणि दिवस ही आली किंवा गेली, तरी सूर्याच्या प्रकाशांत कांहीं पालट होत नाही. त्याप्रमाणे निरनिराळ्या स्थिति आल्या किंवा गेल्या तरी साधूचा गंभीरपणा क्षुब्ध होत नाही ९२.
कडकडीत विजेचे कल्लोळ । तेणें गगनासी नव्हे खळबळ ।
तैसा नाना ऊर्मींमाजीं निश्चळ । गांभीर्य केवळ त्या नांव ॥९३॥
तैसा नाना ऊर्मींमाजीं निश्चळ । गांभीर्य केवळ त्या नांव ॥९३॥
विजेचे लोळ कडकडून उठले तरी आकाश कांहीं डगमगत नाही. त्याप्रमाणे कितीही विकारांच्या उसळ्या आल्या तरी त्यांमध्ये अढळ असणे याचंच नांव गांभीर्य ९३.
हे संताची गंभीरता । विसांवा जीवशिवांसी तत्त्वतां ।
हे विसावी संताची अवस्था । धृतीची व्यवस्था अवधारीं ॥९४॥
हे विसावी संताची अवस्था । धृतीची व्यवस्था अवधारीं ॥९४॥
संताची गंभीरता म्हणतात ती ही. तीच खरोखर जीवाला आणि शिवाला विश्रांति आहे. ही संताची विसावी अवस्था होय. आतां धैर्याचे स्वरूप ऐक ९४.
मनबुद्ध्यादि इंद्रियें प्राण । निजधैर्यें धरोनि आपण ।
नित्य केलिया आत्मप्रवण । परतोनि जाण येवों नेदी ॥९५॥
नित्य केलिया आत्मप्रवण । परतोनि जाण येवों नेदी ॥९५॥
जो आपल्या धैर्याने मन-बुद्धयादि इंद्रिये व प्राण ह्यांना आपणच आवरून धरून नित्य आत्मसन्मुख करतो, आणि त्यांना तेथून परत जाऊ देत नाहीं ९५,
स्वयंवरीं जिणोनि अरिरायासी । बळें आणिलें नोवरीसी ।
तो जाऊं नेदी आणिकापाशीं । तेवीं वृत्तीसी निजधैर्य ॥९६॥
तो जाऊं नेदी आणिकापाशीं । तेवीं वृत्तीसी निजधैर्य ॥९६॥
किंवा स्वयंवरामध्ये प्रबळ शत्रूला जिंकून पराक्रमाने नवरीला आणल्यानंतर तो तिला दुसऱ्याकडे जाऊं देत नाही, त्याप्रमाणे साधूही आपल्या वृत्तीपासून धैर्य सुटू देत नाही ९६.
वागुरें बांधिल्या मृगासी । पारधी जाऊं नेदी त्या वनासी ।
तेवीं धैर्यें आकळूनि मनासी । देहापाशीं येऊं नेदी ॥९७॥
तेवीं धैर्यें आकळूनि मनासी । देहापाशीं येऊं नेदी ॥९७॥
जाळ्यांत धरलेल्या मृगाला पारधी जसा पुन्हा त्या बनाकडे जाऊ देत नाही, त्याप्रमाणे साधूही धैर्याने मनाला आवरून धरून त्याला देहाकडे येऊ देत नाहीं ९७.
देहासी नाना भोगसमृद्धी । वावूनियां गजस्कंधीं ।
ऐसें सुख होतां त्रिशुद्धी । मनासी देहबुद्धी धरूं नेदी ॥९८॥
ऐसें सुख होतां त्रिशुद्धी । मनासी देहबुद्धी धरूं नेदी ॥९८॥
देहाला अनेक प्रकारची सुखें प्राप्त झाली, किंवा त्याला हत्तीच्या मस्तकावर बसविलें, इतके जरी खरोखर सुख मिळाले, तरी तो मनाला देहाभिमान धरूं देत नाही ९८.
प्रळयकाळाच्या कडकडाटीं । महाभूतां होतां आटाटी ।
तरी मनासी देहाची भेटी । धैर्यें जगजेठी होंचि नेदी ॥९९॥
तरी मनासी देहाची भेटी । धैर्यें जगजेठी होंचि नेदी ॥९९॥
किंवा प्रळयकाळच्या कडकडाटाने पंचमहाभूतांची गडबड उडाली असताही तो जगजेठी धैर्याने मनाला देहाची भेट होऊंच देत नाही ९९.
तेथ काळाचेनि हटतटें । वृत्ति परब्रह्माचिये वाटे ।
लावूनियां नेटेंपाटें । चिन्मात्रपेठे विकिली ॥१०००॥
लावूनियां नेटेंपाटें । चिन्मात्रपेठे विकिली ॥१०००॥
तर त्या काळाच्या जबरदस्त तडाक्यांत त्याने वृत्ति परब्रह्माच्या वाटेकडे निश्चयाने लावून चित्स्वरूपाच्या पेठेत तिला विकलेले असते १०००.
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १ ते १००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १0१ ते २००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या २०१ ते ३००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ३०१ ते ४००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ४०१ ते ५००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ५०१ ते ६००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ६०१ ते ७००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ७०१ ते ८००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ८०१ ते ९००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ९०१ ते १०००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १००१ ते ११००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या ११०१ ते १२००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १२०१ ते १३००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १३०१ ते १४००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १४०१ ते १५००
एकनाथी भागवत अध्याय ११ ओव्या १५०१ ते १५८१
एकनाथी भागवत
एकनाथी भागवत अध्याय १ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ६ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ८ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ११ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १२ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १३ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १४ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १५ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय १६ अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सतरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय अठरावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकोणविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय विसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय एकविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय बाविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय तेविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय चोविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय पंचविसावा अर्थासहित
श्री एकनाथी भागवत अध्याय सव्विसावा अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २७ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २८ अर्थासहित अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय २९ अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३० अर्थासहित
एकनाथी भागवत अध्याय ३१ अर्थासहित
Loading...