मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    सार्थ ज्ञानेश्वरी

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सातवा

    ओवी १

    आइका मग तो श्रीअनंतु।
    पार्थातें असे म्हणतु।
    पैं गा तूं योगयुक्तु।
    जालासि आतां॥७-१॥

    अर्थ:
    श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, "हे पार्था, तू आता योगाच्या ज्ञानाने युक्त झाला आहेस.




    ओवी २

    मज समग्रातें जाणसी ऐसें।
    आपुलिया तळहातींचें रत्न जैसें।
    तुज ज्ञान सांगेन तैसें।
    विज्ञानेंसीं॥७-२॥

    अर्थ:
    जसे आपण आपल्या तळहातातील रत्न स्पष्टपणे पाहतो, त्याचप्रमाणे तू मला संपूर्णपणे जाणून घेशील. मी तुला ज्ञानासोबत विज्ञान देखील सांगणार आहे, ज्यामुळे तू सर्वकाही स्पष्टपणे समजून घेशील.




    ओवी ३

    एथ विज्ञानें काय करावें।
    ऐसें घेसी जरी मनोभावें।
    तरी पैं आधीं जाणावें।
    तेंचि लागे॥७-३॥

    अर्थ:
    येथे विज्ञानाचे काय उपयोग आहेत, हे जर तुझ्या मनाशी मनापासून समजले असेल, तर त्याचे आधीच ज्ञान घेणे अत्यंत आवश्यक आहे.




    ओवी ४

    मग ज्ञानाचिये वेळे।
    झांकती जाणिवेचे डोळे।
    जैसी तीरीं नाव न ढळे।
    टेकलीसांती॥७-४॥

    अर्थ:
    ज्ञानाच्या वेळी, जाणिवेचे डोळे झाकले जातात, जसे होडी नदीच्या तीराला टेकली असता ती पुढे सरकत नाही. याचा अर्थ, स्वरूपज्ञानाच्या वेळेस बुद्धीचे डोळे बंद असतात.



    ओवी ५

    तैसी जाणीव जेथ न रिघे।
    विचार मागुता पाउलीं निघे।
    तर्कु आयणी नेघे।
    आंगीं जयांच्या॥७-५॥

    अर्थ:
    ज्या ठिकाणी तशी जाणीव असते, तिथे बुद्धीचा प्रवेश होत नाही, विचार मागे फिरतो आणि तर्काचे चातुर्यही चालत नाही.



    ​​​

    ओवी ६

    अर्जुना तया नांव ज्ञान।
    येर प्रपंचु हें विज्ञान।
    तेथ सत्यबुद्धि तें अज्ञान।
    हेंही जाण॥७-६॥

    अर्थ:
    हे अर्जुना, त्याचे नाव ज्ञान आहे. जो प्रपंच आहे, तो विज्ञान आहे. प्रपंचात खरेपणाची बुद्धी नसणे हे अज्ञान मानले जाते, हे तू लक्षात ठेव.


    ओवी ७

    आतां अज्ञान अवघें हरपे।
    विज्ञान निःशेष करपे।
    आणि ज्ञान तें स्वरूपें।
    होऊनि जाइजे॥७-७॥

    अर्थ:
    आता अज्ञान संपूर्णपणे नाहीसे होईल, प्रपंच पूर्णपणे बाधित होईल, आणि ज्ञान आपण स्वत:च बनून जाऊ.

    ओवी ८

    जेणें सांगतयाचें बोलणें खुंटे।

    ऐकतयाचें व्यसन तुटे।

    हें जाणणें सानें मोठें।

    उरों नेदी॥७-८॥

    अर्थ:

    अशी जी गूढ मुद्याची गोष्ट आहे, ती शब्दात आणली जाईल आणि त्याच्या थोड्या प्रतिपादनानेच मनातील पुष्कळ इच्छा तृप्त होतील. (म्हणजे मनाचे पूर्ण समाधान होईल).



    ओवी ६

    अरे दुर्योधन, गाधीच्या योध्यांनो,
    कळते तुमच्या हेतूंचा अगाध किनारा.
    संपूर्ण देश ज्या काळा उभा राहिला,
    तुमचा अवरुद्ध झाला धैर्याचा नारा. ॥६-६॥

    अर्थ: या ओवीत दुर्योधन आणि त्याच्या योध्यांचा हेतू स्पष्ट करण्यात आला आहे. त्यांच्या नकारात्मक विचारांनी संपूर्ण देशाला धैर्याच्या भावनांपासून दूर नेले आहे.


    ओवी ११
    जैसा भरलेया त्रिभुवना-
    आंतु एकेकु चांगु अर्जुना।
    निवडूनि कीजे सेना।
    लक्षवरी ॥ ११ ॥
    अर्थ: ज्याप्रमाणे भरलेल्या त्रैलोक्यात अर्जुना, एक एक चांगला निवडून लक्षावधी सैन्य तयार करतात.



    ओवी १२
    कीं तयाही पाठीं।
    जे वेळीं लोह मांसातें घांटी।
    ते वेळीं विजयश्रियेच्या पाटीं।
    एकुची बैसे ॥ १२ ॥
    अर्थ: असे सैन्य निवडल्यानंतर ज्यावेळी लोखंडाच्या शस्त्रांचे घाव अंगावर होतात त्या वेळी विजयसिंहासनावर एखादाच बसतो.




    ओवी १३
    तैसें आस्थेच्या महापुरीं।
    रिघताती कोटिवरी।
    परी प्राप्तीच्या पैलतीरीं।
    विपाइला निगे ॥ १३ ॥
    अर्थ: त्याप्रमाणे स्वरूपज्ञानाच्या इच्छारूप पुरात कोट्यावधी लोक प्रवेश करतात, पण स्वरूपज्ञानाच्या प्राप्तीरूपी पलिकडच्या काठाला एखादाच निघतो.




    ओवी १४
    म्हणौनि सामान्य गा नोहे।
    हें सांगतां वडिल गोठी आहे।
    परी तें बोलों येईल पाहें।
    आता प्रस्तुत ऐकें ॥ १४ ॥
    अर्थ: म्हणून हे (ज्ञानाचे कथन) सामान्य नाही. सांगावयास गेले असता ही गोष्ट फार महत्वाची आहे. परंतु ती ज्ञानाची गोष्ट पुढे सांगता येईल. प्रस्तुत तुला (विज्ञानाची गोष्ट) सांगतो ती ऐक.




    ओवी १५
    तरी अवधारीं गा धनंजया।
    हे महदादिक माझी माया।
    जैसी प्रतिबिंबे छाया।
    निजांगाची ॥ १५ ॥
    अर्थ: अर्जुन, तर ऐक, हे महतत्वादिक माझी माया आहे. ज्याप्रमाणे आपल्या अंगाची पडछाया पडते त्याप्रमाणे ती माझी छाया आहे.



    ओवी १६
    आणि इयेतें प्रकृति म्हणिजे।
    जे अष्टधा भिन्न जाणिजे।
    लोकत्रय निपजे।
    इयेस्तव ॥ १६ ॥
    अर्थ: हिला प्रकृति असे म्हणतात. ही आठ प्रकारांनी वेगवेगळी आहे असे समज. हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होते.




    ओवी १७
    हे अष्टधा भिन्न कैसी।
    ऐसा ध्वनि धरिसी जरी मानसीं।
    तरी तेचि गा आतां परियेसीं।
    विवंचना ॥ १७ ॥
    अर्थ: ही आठ प्रकारांनी वेगळी कशी आहे असा अभिप्राय जर तुझ्या मनात असेल तर त्याचे विवेचन तू आता ऐक.




    ओवी १८
    आप तेज गगन।
    मही मारुत मन।
    बुद्धि अहंकारु हे भिन्न।
    आठै भाग ॥ १८ ॥
    अर्थ: पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, वारा, मन, बुद्धी आणि अहंकार हे ते आठ वेगवेगळे भाग आहेत



    ओवी १९
    या आठांची जे साम्यावस्था।
    ते माझी परम प्रकृति पार्था।
    तिये नाम व्यवस्था।
    जीवु ऐसी ॥ १९ ॥
    अर्थ: आणि जी आठांची साम्यावस्था (हे आठ ज्या ठिकाणी लीन होऊन असतात) तीच माझी श्रेष्ठ प्रकृति असून तिला जीव असे नाव आहे.




    ओवी २०
    जे जडातें जीववी।
    चेतनेतें चेतवी।
    मना करवीं मानवी।
    शोक मोहो ॥ २० ॥
    अर्थ: ती जडाला सजीव करते, जीवाला (आभासाला) सज्ञान करते व मनाकडून शोक, मोह मानावयास लावते.




    ओवी २१
    पैं बुद्धीच्या अंगीं जाणणें।
    तें जिये जवळिकेचें करणें।
    जिया अहंकाराचेनि विंदाणें।
    जगचि धरिजे ॥ २१ ॥
    अर्थ: बुद्धीमध्ये जी जाणण्याची शक्ती आहे, ती हिच्या सांनिध्यामुळे आहे व तिने अहंकाराच्या कौशल्याने जगत धारण केले आहे.




    ओवी २२
    ते सूक्ष्म प्रकृति कोडें।
    जैं स्थूळाचिया आंगा घडे।
    तैं भूतसृष्टीची पडे।
    टांकसाळ ॥ २२ ॥
    अर्थ: ती सूक्ष्म प्रकृति (जीवरूपा) कौतुकाने स्थूल प्रकृतीच्या परिणामास जेव्हा पावते, तेव्हा प्राणिवर्गरूपी नाणी पाडण्याची टांकसाळ सुरु होते.




    ओवी २३
    चतुर्विध ठसा।
    उमटों लागे आपैसा।
    मोला तरी सरसा।
    परी थरचि आनान ॥ २३ ॥
    अर्थ: चार प्रकारच्या आकृति सारख्याच (अंडज, स्वेदज, जरायुज, उद्भिज) त्या टांकसाळीतून आपोआप व्यक्तत्वाला येऊ लागतात. त्या चार आकृति सारख्याच किंमतीच्या असतात. परंतु आकार मात्र वेगवेगळे असतात.




    ओवी २४
    होती चौऱ्यांशीं लक्ष थरा।
    येरा मिती नेणिजे भांडारा।
    भरे आदिशून्याचा गाभारा।
    नाणेयांसी ॥ २४ ॥
    अर्थ: चौर्‍याऐंशी लक्ष योनींचे आकार त्या टांकसाळीच्या भांडारात जे तयार होतात त्यांची गणती नाही. त्या सर्व प्राणिमात्ररूप नाण्यांनी मायेचा गाभारा भरून जातो.




    ओवी २५
    ऐसें एकतुके पांचभौतिक।
    पडती बहुवस टांक।
    मग तिये समृद्धीचे लेख।
    प्रकृतीचि धरी ॥ २५ ॥
    अर्थ: याप्रमाणे पंचमहाभूतांची एकाच योग्यतेची अनेक नाणी तयार होतात. त्यांच्या भरण्याची गणती प्रकृतीच ठेवते.




    ओवी २६
    जे आखूनि नाणें विस्तारी।
    पाठी तयाची आटणी करी।
    माजीं कर्माकर्माचिया व्यवहारीं।
    प्रवर्तु दावी ॥ २६ ॥
    अर्थ: ती प्राणिरूप नाण्याच्या आकृतीची योजना करून त्यांचा प्रसार करते. व मग त्या आकृतीची आटणी करते. व दरम्यान (स्थितीकाळी) प्राण्यांकडून कर्माकर्मांचे व्यवहार करून दाखवते.




    ओवी २७
    हें रूपक परी असो।
    सांगों उघड जैसें परियेसों।
    तरी नामरूपाचा अतिसो।
    प्रकृतीच कीजे ॥ २७ ॥
    अर्थ: परंतु हे रूपक असो. तुला ऐकता येईल (कळेल) असे स्पष्ट सांगतो. तर नामरूपांचा विस्तार प्रकृतीच करते.




    ओवी २८
    आणि प्रकृति तंव माझ्या ठायीं।
    बिंबे येथें आन नाहीं।
    म्हणौनि आदि मध्य अवसान पाहीं।
    जगासि मी ॥ २८ ॥
    अर्थ: आणि प्रकृति तर माझ्या ठिकाणी भासते यात अन्यथा नाही, म्हणून जगाला आदि, मध्य व शेवट मीच आहे असे समज.




    ओवी २९
    हें रोहिणीचें जळ।
    तयाचें पाहतां येइजे मूळ।
    तैं रश्मि नव्हती केवळ।
    होय तें भानु ॥ २९ ॥
    अर्थ: या मृगजळाचे मूळ पाहू गेले असता, ते सूर्यकिरणे नसून केवळ तो सूर्यच आहे.




    ओवी ३०
    तयाचिपरी किरीटी।
    इया प्रकृती जालिये सृष्टी।
    जैं उपसंहरूनि कीजेल ठी।
    तैं मीचि आहें ॥ ३० ॥
    अर्थ: त्याप्रमाणे अर्जुना, ज्यावेळी या स्थूलाच्या परिणामाला पावलेल्या पराप्रकृतीपासून झालेल्या सृष्टीचा उपसंहार होऊन शेवट मुक्काम होतो त्यावेळी पाहिले असता मीच आहे.




    ओवी ३१
    ऐसें होय दिसे न दिसे।
    हें मजचि माजीं असे।
    मियां विश्व धरिजे जैसें।
    सूत्रें मणि ॥ ३१ ॥
    अर्थ: याप्रमाणे जगाची उत्पत्ति, स्थिति व लय हे माझ्यामध्येच आहेत. ज्याप्रमाणे दोरा मण्याला धारण करतो त्याप्रमाणे मी जगाला धारण करतो.




    ओवी ३२
    सुवर्णाचे मणी केले।
    ते सोनियाचे सुतीं वोविले।
    तैसें म्यां जग धरिलें।
    सबाह्याभ्यंतरीं ॥ ३२ ॥
    अर्थ: सोन्याचे मणी करूने ते सोन्याच्या सुतात ओवावेत त्याप्रमाणे आत बाहेर जग मीच धारण केलेले आहे.




    ओवी ३३
    म्हणौनि उदकीं रसु।
    कां पवनीं जो स्पर्शु।
    शशिसूर्यीं जो प्रकाशु।
    तो मीचि जाण ॥ ३३ ॥
    अर्थ: म्हणून पाण्यामध्ये ओलावा किंवा वार्‍यामधे स्पर्श अथवा चंद्र-सूर्यामधील जे तेज आहे ते मीच आहे असे समज.




    ओवी ३४
    तैसाचि नैसर्गिकु शुद्धु।
    मी पृथ्वीच्या ठायीं गंधु।
    गगनीं मी शब्दु।
    वेदीं प्रणवु ॥ ३४ ॥
    अर्थ: त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावत:च असणारा शुद्ध वास मीच आहे, आकाशाच्या ठिकाणी असणारा शब्द मी आहे व वेदातील ॐकार मी आहे.




    ओवी ३५
    नराच्या ठायीं नरत्व।
    जें अहंभाविये सत्त्व।
    तें पौरुष मी हें तत्त्व।
    बोलिजत असे ॥ ३५ ॥
    अर्थ: मनुष्याच्या ठिकाणी अहंपणाचे जे सारभूत पौरुषत्व आहे तो पराक्रम मी आहे, हे तत्व मी तुला सांगतो.




    ओवी ९
    पुण्यो गन्धः पृथिव्यां च।
    तेजश्चास्मि विभावसौ।
    जीवनं सर्वभूतेषु।
    तपश्चास्मि तपस्विषु ॥ ९ ॥
    अर्थ: पृथ्वीमधील शुद्ध गंध आणि अग्नीमधील तेज मी आहे. प्राणिमात्रांचे जीवन आणि तपस्व्यांचे तप मी आहे.




    ओवी ३६
    अग्नि ऐसें आहाच।
    तेज नामाचें आहे कवच।
    तें परतें केलिया साच।
    निजतेज तें मी ॥ ३६ ॥
    अर्थ: तेजाला अग्नी अशा नावाचे जे वरवर दिसणारे पांघरुण आहे ते दूर केल्यावर जे स्वयंद्ध तेज, ते मी आहे.




    ओवी ३७
    आणि नानाविध योनी।
    जन्मोनि भूतें त्रिभुवनीं।
    वर्तत आहाति जीवनीं।
    आपुलाल्या ॥ ३७ ॥
    अर्थ: आणि त्रैलोक्यामधे नानाप्रकारच्या योनीत प्राणी उत्पन्न होऊन आपआपला आहार सेवन करून रहातात.




    ओवी ३८
    एकें पवनेंचि पिती।
    एकें तृणास्तव जिती।
    एकें अन्नाधारें राहती।
    जळें एकें ॥ ३८ ॥
    अर्थ: कित्येक वाराच पितात, कित्येक गवतावर जगतात, कित्येक अन्नावर रहातात आणि कित्येक पाण्याने जगतात.




    ओवी ३९
    ऐसें भूतांप्रति आनान।
    जें प्रकृतिवशें दिसे जीवन।
    तें आघवाठायीं अभिन्न।
    मीचि एक ॥ ३९ ॥
    अर्थ: याप्रमाणे प्राण्यांना ज्याच्या त्याच्या प्रकृतीला अनुसरून असा जो आहार दिसतो, व त्या सर्व निरनिराळ्या आहारांच्या ठिकाणी मीच एक अभिन्नत्वाने आहे.




    ओवी ४०
    पैं आदिचेनि अवसरें।
    विरूढे गगनाचेनि अंकुरें।
    जे अंतीं गिळी अक्षरें।
    प्रणवपीठींचीं ॥ ४० ॥
    अर्थ: जे आत्मतत्व सृष्टीच्या उत्पत्तीकाली आकाशाच्या अंकुराने वाढते व जे सृष्टीच्या लयाच्या कळी ओंकाररूपी पटाच्या अक्षराचा ग्रास करते.




    ओवी ४१
    जंव हा विश्वाकारु असे।
    तंव जें विश्वाचिसारिखें दिसे।
    मग महाप्रळयदशे।
    कैसेंही नव्हे ॥ ४१ ॥
    अर्थ: जोपर्यंत हा विश्वाकार असतो तोपर्यंत जे आत्मतत्व विश्वासारखे दिसते, मग महाप्रलयकाळी जे कोणत्याच आकाराचे नसते.




    ओवी ४२
    ऐसें अनादि जें सहज।
    तें मी गा विश्वबीज।
    हें हातातळीं तुज।
    देइजत असे ॥ ४२ ॥
    अर्थ: असे जे स्वभावत: अनादि विश्वाचे बीज, ते मी आहे, हे मी तुझ्या तळहातात देतो. (स्पष्ट सांगतो).




    ओवी ४३
    मग उघड करूनि पांडवा।
    जैं हे आणिसील सांख्याचिया गांवा।
    तैं ययाचा उपेगु बरवा।
    देखशील ॥ ४३ ॥
    अर्थ: नंतर हे चांगले नीट समजून घेऊन जेव्हा हे विचाराच्या गावाकडे आणशील (म्हणजे याचा विचार करशील) तेव्हा याचा उपयोग तुला चांगला दिसून येईल.




    ओवी ४४
    परी हे अप्रासंगिक आलाप।
    आतां असतु न बोलों संक्षेप।
    जाण तपियांच्या ठायीं तप।
    तें रूप माझें ॥ ४४ ॥
    अर्थ: परंतु हे विषयाला सोडून बोलणे राहू दे. ते मी आता बोलत नही. (आता माझ्या विभूतिसंबंधाने) थोडक्यात सांगतो. तपस्वी लोकांचे ठिकाणी तप ही माझी विभूती आहे असे समज.




    ओवी ४५
    बळियांमाजीं बळ। तें मी जाणें अढळ।

    बुद्धिमंतीं केवळ। बुद्धि तें मी॥ ४५॥
    अर्थ: बलवान लोकांमध्ये जे अढळ बल आहे, ती माझीच विभूति आहे, व बुद्धिवानांच्या ठिकाणी जी बुद्धी आहे, ती माझीच विभूति आहे.




    ओवी ४६
    भूतांच्या ठायीं कामु। तो मी म्हणे आत्मारामु।

    जेणें अर्थास्तव धर्मु। थोरु होय॥ ४६॥
    अर्थ: ज्या कामाच्या निमित्ताने धर्माचा उत्कर्ष होतो, असा प्राणिमात्रांचे ठिकाणी असणारा काम मी आहे, असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाला.




    ओवी ४७
    एर्‍हवीं विकाराचेनि पैसे। करी कीर इंद्रियांचि ऐसें।

    परी धर्मासि वेखासें। जावों नेदी॥ ४७॥
    अर्थ: सहज विचार करून पाहिले तर विकारांच्या फैलावाने इंद्रियांसच अनुकूल अशी कर्मे तो काम करोखर करतो, परंतु ती कर्मे धर्मास विरुद्ध जाऊ देत नाही.




    ओवी ४८
    जो अप्रवृत्तीचा अव्हांटा। सांडूनि विधीचिया निघे वाटा।

    तेवींचि नियमाचा दिवटा। सवें चाले॥ ४८॥
    अर्थ: कारण की जो काम शास्त्रनिषिद्ध कर्माची आडवाट सोडून शास्त्रविहित कर्माच्या राजमार्गाने निघतो व विधीच्या मार्गाने जात असतांना त्याच्याबरोबर नियमरूपी मशाल चालतो.




    ओवी ४९
    कामु ऐसिया वोजा प्रवर्ते। म्हणौनि धर्मासि होय पुरतें।

    मोक्षतीर्थींचे मुक्तें। संसार भोगी॥ ४९॥
    अर्थ: अशा व्यवस्थेने काम चालतो म्हणून धर्माची पूर्णता होते. मग तो काम संसार भोगतो म्हणजे मोक्षतीर्थातील जणुकाय मोतीच भोगतो.




    ओवी ५०
    जो श्रुतिगौरवाच्या मांडवीं। काम सृष्टीचा वेलु वाढवी।

    जंव कर्मफळेंसि पालवी। अपवर्गीं टेंके॥ ५०॥
    अर्थ: जो काम वेदाच्या मोठेपणाच्या मांडवावर कर्मसृष्टीच्या वेलासारखा वाढवतो, व कर्मफळासह तो मोक्षाला जाऊन भिडेपर्यंत वाढवतो.




    ओवी ५१
    ऐसा नियुत कां कंदर्पु। जो भूतां या बीजरूपु।

    तो मी म्हणे बापु। योगियांचा॥ ५१॥
    अर्थ: असा नियमन केलेला व प्राणिमात्रांच्या उत्पत्तीस कारण जो काम आहे, तो मी आहे असे योग्यांचा बाप श्रीकृष्ण म्हणाला.




    ओवी ५२
    हें एकेक किती सांगावें। आतां वस्तुजातचि आघवें।

    मजपासूनि जाणावें। विकारलें असे॥ ५२॥
    अर्थ: हे वेगळे वेगळे किती सांगावे? आता जेवढे पदार्थ आहेत, तेवढे सर्व माझ्यापासूनच आकाराला आलेले आहेत असे समज.




    ओवी ५३
    जे सात्त्विक हन भाव। कां रजतमादि सर्व।

    तें ममरूपसंभव। वोळखें तूं॥ ५३॥
    अर्थ: जे सत्त्व गुणामुळे झालेले पदार्थ आणि रज, तम या गुणांपासून झालेले सर्व, ते माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झाले आहेत, असे समज.



    ओवी ५४
    हे जाले तरी माझ्या ठायीं। परी तयामाजीं मी नाहीं।

    जैसी स्वप्नींच्या डोहीं। जागृति न बुडे॥ ५४॥
    अर्थ: हे पदार्थ माझ्या ठिकाणी उत्पन्न झाले, परंतु या पदार्थात मी नाही. ज्याप्रमाणे जागृतिपासून स्वप्न उत्पन्न झाले असले तरी स्वप्नात जागृति बुडत नाही.




    ओवी ५५
    जैसी रसाचीच सुघट। बीजकणिका घनवट।

    परी तियेस्तव होय काष्ठ। अंकुरद्वारें॥ ५५॥
    अर्थ: ज्याप्रमाणे गोठलेला रस म्हणजे भरीव बी असतो, परंतु त्यापासून अंकुर उत्पन्न होऊन त्याचेच लाकूड बनते.




    ओवी ५६
    मग तया काष्ठाच्या ठायीं। सांग पां बीजपण असे काई?

    तैसा मी विकारीं नाहीं। जरी विकारला दिसे॥ ५६॥
    अर्थ: मग त्या लाकडाचे ठिकाणी बीपणा काही आहे का? सांग. त्याप्रमाणे मी जरी विकारलेला दिसलो तरी त्या विकारात मी नाही.



    ओवी ५७
    पैं गगनीं उपजे आभाळ। परी तेथ गगन नाहीं केवळ।

    अथवा आभाळीं होय सलिल। तेथ अभ्र नाहीं॥ ५७॥
    अर्थ: आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात, परंतु त्या ढगात केवळ आकाश नसते, किंवा ढगात पाणी असते, परंतु पाण्यात ढग नाहीत.




    ओवी ५८
    मग त्या उदकाचेनि आवेशें। प्रगटलें तेज जें लखलखीत दिसे।

    तिये विजूमाजीं असे। सलिल कायी?॥ ५८॥
    अर्थ: मग त्या पाण्याच्या जोराने उत्पन्न झालेले जे लखलखित तेज दिसते, त्या विजेमध्ये पाणी आहे का?




    ओवी ५९
    सांगें अग्नीस्तव धूम होये। तिये धूमीं काय अग्नि आहे?

    तैसा विकारु हा मी नोहें। जरी विकारला असे॥ ५९॥
    अर्थ: सांग, अग्नीपासून धूर तयार होतो, त्या धुरात अग्नी आहे का? त्याप्रमाणे जरी पदार्थ माझ्यापासून झाले तरी मी पदार्थ नाही.




    ओवी ६०
    परी उदकीं जाली बाबुळी। ते उदकातें जैसी झांकोळी।

    कां वायांचि आभाळीं। आकाश लोपे॥ ६०॥
    अर्थ: परंतु पाण्यात उत्पन्न झालेले गोंडाळ (फुलं) ज्याप्रमाणे पाण्याला झाकून टाकते किंवा ढगांच्या योगाने आकाश व्यर्थच झाकले जाते.




    ओवी ६१
    हां गा स्वप्न लटिकें म्हणों ये। परि निद्रावशें बाणलें होये।

    तंव आठवु काय देत आहे। आपणपेयां?॥ ६१॥
    अर्थ: अरे अर्जुना, स्वप्न हे खोटे आहे असे म्हणता येते, पण आपण निद्रेच्या स्वाधीन झाल्यामुळे ते जेव्हा आपल्या अनुभवाला येते, तेव्हा ते आपल्याला आठवण होऊ देते का?




    ओवी ६२
    हें असो डोळ्यांचें। डोळांचि पडळ रचे।

    तेणें देखणेंपण डोळ्यांचे। न गिळजे कायी?॥ ६२॥
    अर्थ: हे वरील दृष्टांत राहू द्या. डोळ्याचे पाणी डोळ्यात गोठून त्याचा पडदा डोळ्यावर तयार होतो, तो पडदा डोळ्यांची दृष्टि (पहाणेपणा) नाहीशी करत नाही का?




    ओवी ६३
    तैसी हे माझीच बिंबली। त्रिगुणात्मक साउली।

    कीं मजचि आड वोडवली। जवनिका जैसी॥ ६३॥
    अर्थ: त्याप्रमाणे त्रिगुणात्मक माया माझीच पडलेली छाया आहे. ती जणु काय पडद्याप्रमाणे माझ्या आड आली आहे (मला झाकले आहे).




    ओवी ६४
    म्हणौनि भूतें मातें नेणती। माझींच परी मी नव्हती।

    जैसी जळींचि जळीं न विरती। मुक्ताफळें॥ ६४॥

    अर्थ: म्हणून प्राणी मला जाणत नाहीत. ते माझेच आहेत, पण मद्रूप होत नाहीत. ज्याप्रमाणे मोती पाण्याचीच होतात, पण पाण्यात विरघळत नाहीत.




    ओवी ६५
    पैं पृथ्वीयेचा घटु कीजे। सवेंचि पृथ्वीसि मिळे तरी मेळविजे।

    एर्‍हवीं तोचि अग्निसंगें सिजे। तरी वेगळा होय॥ ६५॥
    अर्थ: जसे मातीचे मडके करावे आणि ते केल्याबरोबर (कच्च्या स्थितीत) मातीशी मिळवले तर मातीत मिळून जाते. पण ते मडके भाजले असता ते मातीशी न मिळता खापररूपाने वेगळे राहाते.




    ओवी ६६
    तैसें भूतजात सर्व। हे माझेचि कीर अवयव।

    परि मायायोगें जीव-। दशे आले॥ ६६॥
    अर्थ: त्याप्रमाणे सर्व प्राणिमात्र हे खरोखर माझेच अवयव आहेत, पण मायेच्या योगाने ते जीवदशेस आले.




    ओवी ६७
    म्हणौनि माझेचि मी नव्हती। माझेचि मज नोळखती।

    अहंममताभ्रांती। विषयांध जाले॥ ६७॥
    अर्थ: म्हणून ते प्राणी माझेच असून मी नाहीत, माझेच असून मला ओळखत नाहीत. कारण मी आणि माझेपणा या भ्रांतीने ते विषयांध झाले आहेत.




    ओवी ६८
    आतां महदादि हे माझी माया। उतरोनियां धनंजया।

    मी होईजे हें आया। कैसेनि ये?॥ ६८॥
    अर्थ: आता अर्जुना, महत्तत्त्वादि जी माझी माया, ती पार उतरून मद्रूप होणे हे साध्य कसे होईल?



    ओवी ६९
    जिये ब्रह्माचळाचा आधाडा। पहिलिया संकल्पजळाचा उभडा।

    सवेंचि महाभूतांचा बुडबुडा। साना आला॥ ६९॥
    अर्थ: जी मायानदी ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून मूळसंकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर, तिच्यात पंचमहाभूतांचा लहान बुडाबुडा आला.




    ओवी ७०
    जे सृष्टिविस्ताराचेनि वोघें। चढत काळकळनेचेनि वेगें।

    प्रवृत्तिनिवृत्तीचीं तुंगें। तटें सांडी॥ ७०॥
    अर्थ: जी सृष्टीच्या विस्ताररूपी ओघाने, कालाच्या ग्रास करण्याच्या शक्तिरूपाच्या वेगाने वाढून प्रवृत्ति व निवृत्ति या दोन्ही उंच काठांबाहेर वाहते.




    ओवी ७१
    जे गुणघनाचेनि वृष्टिभरें। भरली मोहाचेनि महापूरें।

    घेऊनि जात नगरें। यमनियमांचीं॥ ७१॥
    अर्थ: जी गुणरूपी मेघांचा जोरदार वर्षाव झाल्याने मोहरूपी महापुराने भरून यमनियमरूपी गावे वाहून आणते.




    ओवी ७२
    जे द्वेषाच्या आवर्तीं दाटत। मत्सराचे वळसे पडत।

    माजीं प्रमादादि तळपत। महामीन॥ ७२॥
    अर्थ: जी द्वेषरूपी भोवर्‍याने गच्च भरलेली आहे व मत्सररूपी वळणे जिला पडली आहेत व जिच्यामधे तरुण स्त्रिया वगैरे मोठे मासे चमकत आहेत.




    ओवी ७३
    जेथ प्रपंचाचीं वळणें। कर्माकर्मांचीं वोभाणें।

    वरी तरताती वोसाणें। सुखदुःखांचीं॥ ७३॥
    अर्थ: जिच्यामधे प्रपंचरूपी वळणे आहेत व जिला कर्माकर्मरूपी पूर येत आहेत, आणि सुखदु:खरूपी पुराड जिच्यावर तरत आहे.




    ओवी ७४
    रतीचिया बेटा। आदळती कामाचिया लाटा।

    जेथ जीवफेन संघटा। सैंघ दिसे॥ ७४॥
    अर्थ: रतीच्या बेटावर जिच्या कामरूपी लाटा आदळतात व जेथे जीवरूपी फेसाचा समुदाय एकसारखा दिसतो.




    ओवी ७५
    अहंकाराचिया चळिया। वरि मदत्रयाचिया उकळिया।

    जेथ विषयोर्मीच्या आकळिया। उल्लाळ घेती॥ ७५॥
    अर्थ: जिच्यामधे अहंकाराच्या मोठ्या धारा आहेत, त्यावर विद्यादि (विद्या, धन व कुल) तीन मदांच्या उकळ्या येतात व ज्या नदीमध्ये विषयरूपी लाटांचे प्रसार उसळतात.




    ओवी ७६
    उदयास्ताचे लोंढे। पाडीत जन्ममरणाचे चोंढे।

    जेथ पांचभौतिक बुडबुडे। होती जाती॥ ७६॥
    अर्थ: ज्या नदीमधे उदयास्तांचे लोंढे जन्ममृत्युरूप खळगे पडतात व तेथे पंचमहाभूतांपासून झालेले शरीररूपी बुडबुडे तयार होतात व जातात.




    ओवी ७७
    सम्मोह विभ्रम मासे। गिळिताती धैर्याचीं आविसें।

    तेथ देव्हडे भोंवत वळसे। अज्ञानाचे॥ ७७॥
    अर्थ: जिच्यात अविवेक व गोंधळ हेच कोणी मासे ते सात्विक धैर्यरूपी आमीष गिळतात व ज्या नदीमधे अज्ञानाचे भोवरे वक्रगतीने फिरतात.




    ओवी ७८
    भ्रांतीचेनि खडुळें। रेवले आस्थेचे अवगाळें।

    रजोगुणाचेनि खळाळें। स्वर्गु गाजे॥ ७८॥
    अर्थ: जिच्यात भ्रांतीच्या गढूळपणाने आशारूप गाळात प्राणी फसले व रजोगुणाच्या खळबळीने स्वर्ग गाजू लागला.




    ओवी ७९
    तमाचे धारसे वाड। सत्त्वाचें स्थिरपण जाड।

    किंबहुना हे दुवाड। मायानदी॥ ७९॥
    अर्थ: अशा या मायानदीत तमोगुणाची मोठी धार असते, सत्वगुणाचा स्थिरपणा गंभीर असतो. फार काय सांगावे? ही मायानदी तरून जाण्यास फार कठिण आहे.




    ओवी ८०
    पैं पुनरावृत्तीचेनि उभडें। झळंबती सत्यलोकींचे हुडे।

    घायें गडबडती धोंडे। ब्रह्मगोळकाचे॥ ८०॥
    अर्थ: तिच्या पुनर्जन्मरूपी लाटांची उसळी सत्यलोकाचे बुरुजांवर जाऊन आदळते व पुनरावृत्तीच्या आघाताने ब्रह्मांडाचे धोंडे कोसळून पडतात.




    ओवी ८१
    तया पाणियाचेनि वहिलेपणें। अझुनी न ध्रिती वोभाणें।

    ऐसा मायापूर हा कवणें। तरिजेल गा?॥ ८१॥
    अर्थ: त्या पाण्याच्या वेगाने अजूनपर्यंत वाहात असलेला जोराचा पूर थांबत नाही. असा हा मायेचा पूर कोण तरून जाईल?




    ओवी ८२
    येथ एक नवलावो। जो जो कीजे तरणोपावो।

    तो तो अपावो। होय तें एक॥ ८२॥
    अर्थ: या मायानदीसंबंधाने एकच आश्चर्य आहे, ते हे की हिच्यातून तरून जाण्याला जो जो म्हणून उपाय करावा, तो तो अपायच होतो. तो प्रकार कसा ते ऐक.




    ओवी ८३
    एक स्वयंबुद्धीच्या बाहीं। रिगाले तयांची शुद्धीचि नाहीं।

    एक जाणिवेचे डोहीं। गर्वेंचि गिळिले॥ ८३॥
    अर्थ: एक आपल्याच बुद्धिरूपी बाहूने ही नदी तरून जाण्याकरता जे या नदीत शिरले, ते कोठे गेले त्यांचा पत्ताच नाही. दुसरे कितीएक (मायानदीत) ज्ञानाच्या डोहामधे अभिमानाने गिळाले.



    ओवी ८४
    एकीं वेदत्रयाचिया सांगडी। घेतल्या अहंभावाचिया धोंडी।

    ते मदमीनाच्या तोंडीं। सगळेचि गेले॥ ८४॥
    अर्थ: किती एकांनी तीन वेदरूपी होडीचा मायानदीतून तरण्याकरता आश्रय घेतला पण त्याबरोबरच अभिमानाने मोठे धोंडे घेतले. ते मदरूपी माशांच्या तोंडात संबंध गेले.




    ओवी ८५
    एकीं वयसेचें जाड बांधले। मग मन्मथाचिये कांसे लागले।

    ते विषयमगरीं सांडिले। चघळूनियां॥ ८५॥
    अर्थ: किती एकांनी तारुण्यरूपी कासपेटा कमरेस बांधला व मग मदनाच्या कासेला लागले, ते विषयरूपी मगरांनी चघळून टाकले.





    ओवी ८६
    आतां वार्धक्याच्या तरंगा-। माजीं मतिभ्रंशाचा जरंगा।

    तेणें कवळिजताती पैं गा। चहूंकडे॥ ८६॥
    अर्थ: आता म्हातारपणरूपी लाटेमधे असणार्‍या बुद्धिभ्रंशरूपी जाळ्याने ते चोहोबाजूंनी व्यापले जातात.




    ओवी ८७
    आणि शोकाचा कडा उपडत। क्रोधाच्या आवर्तीं दाटत।

    आपदागिधीं चुंबिजत। उधवला ठायीं॥ ८७॥
    अर्थ: आणि शोकरूपी काठावर आपटून क्रोधरूपी भोवर्‍यात गुरफटून ज्या ठिकाणी वर येतील त्या ठिकाणी संकटरूपी गिधाडाकडून टोचले जातात.




    ओवी ८८
    मग दुःखाचेनि बरबटें बोंबले। पाठीं मरणाचिये रेवे रेवले।

    ऐसे कामाचे कांसे लागले। ते गेले वायां॥ ८८॥
    अर्थ: नंतर ते दु:खरूपी चिखलाने भरले व मग मरणाच्या गाळात फसले. याप्रमाणे ज्यांनी कामाचा आश्रय घेतला ते असे व्यर्थ गेले.




    ओवी ८९
    एकीं यजनक्रियेची पेटी। बांधोनि घातली पोटीं।

    ते स्वर्गसुखाच्या कपाटीं। शिरकोनि ठेले॥ ८९॥
    अर्थ: कित्येकांनी यज्ञ करणे रूपी पेटी मायानदी तरण्याकरता आपल्या पोटाशी बांधली, ते स्वर्गसुखाच्या कपारीमधे अडकून राहिले.




    ओवी ९०
    एकीं मोक्षीं लागावयाचिया आशा। केला कर्मबाह्यांचा भरंवसा।

    परी ते पडिले वळसां। विधिनिषेधांच्या॥ ९०॥
    अर्थ: कित्येकांनी मोक्षरूपी पलीकडच्या किनार्‍याला लागावे या आशेने कर्मरूपी बाहूंवर विश्वास ठेवला, परंतु ते विधिनिषेधांच्या वळणात सापडले.




    ओवी ९१
    जेथ वैराग्याची नाव न रिगे। विवेकाचा तागा न लगे।

    वरि कांहीं तरों ये योगें। तरी विपाय तो॥ ९१॥
    अर्थ: ज्या मायानदीत वैराग्याची होडी प्रवेश करू शकत नाही व त्याचप्रमाणे विवेकरूपी वेळूला ठाव लागत नाही. याउपर अष्टांग योगाने काही तरणोपाय होतो, पण तो क्वचित् होतो.




    ओवी ९२
    ऐसें तरी जीवाचिये आंगवणें। इये मायानदीचें तरणें।

    हें कासयासारिखें बोलणें। म्हणावें पां॥ ९२॥
    अर्थ: याप्रमाणे जीवाच्या सामर्थ्याने ही नदी उतरून जाणे, हे म्हणणे कशासारखे आहे म्हणून म्हणावे?




    ओवी ९३
    जरी अपथ्यशीळा व्याधी। कळे साधूसी दुर्जनाची बुद्धी।

    कीं रागी सांडी रिद्धी। आली सांती॥ ९३॥
    अर्थ: जर पथ्य न करणाराला रोग घालवता येईल, किंवा साधूला दुर्जनांची बुद्धी कळेल, अथवा एखादा लोभी मनुष्य त्यास ऐश्वर्य प्राप्त झाले असता त्याचा तो त्याग करेल.




    ओवी ९४
    जरी चोरां सभा दाटे। अथवा मीनां गळु घोटे।

    ना तरी भेडा उलटे। विवसी जरी॥ ९४॥
    अर्थ: चोरांना जर चौकशी करणारे सभासद न्यायाधीश भितील, अथवा माशाला जर गळ गिळता येईल किंवा एखाद्या भित्र्या मनुष्याला पिशाचावर हल्ला करता येईल.




    ओवी ९५
    पाडस वागुर करांडी। कां मुंगी मेरु वोलांडी।
    तरी मायेची पैलथडी। देखती जीव॥ ९५॥
    अर्थ: हरणाच्या पोराला जर जाळे कुरतडून तोडता आले तरच मायानदीच्या पलीकडच्या काठाला जीव पाहू शकतील.




    ओवी ९६
    म्हणौनि गा पंडुसुता। जैसी सकामा न जिणवेचि वनिता।

    तेवीं मायामय हे सरिता। न तरवें जीवां॥ ९६॥
    अर्थ: म्हणून हे अर्जुना, ज्याप्रमाणे विषयी पुरुषाला स्त्री जिंकता येत नाही, त्याप्रमाणे जीवांना ही मायारूप नदी स्वसामर्थ्याने तरता येणार नाही.




    ओवी ९७
    येथ एकचि लीला तरले। जे सर्वभावें मज भजले।

    तयां ऐलीच थडी सरलें। मायाजळ॥ ९७॥
    अर्थ: अशा स्थितीत जे सर्वभावाने मला भजले, ते एकच ही मायानदी सहज तरून गेले व त्यास मायानदीच्या अलिकडच्या काठावरच मायानदीचे जल संपले.




    ओवी ९८
    जयां सद्गुरुतारूं फुडें। जे अनुभवाचे कांसे गाढे।

    जयां आत्मनिवेदन तरांडे। आकळलें॥ ९८॥
    अर्थ: ज्यास सद्गुरु हा पुढे तारणारा नावाडी आहे, ज्या साधकांनी आत्मानुभावरूपी कासोटा घट्ट बांधला आहे व ज्यांना आत्मनिवेदनरूपी ताफा (होडी) हस्तगत झाला आहे.




    ओवी ९९
    जे अहंभावाचें वोझें सांडुनी। विकल्पाचिया झुळका चुकाउनी।

    अनुरागाचा निरुता होउनि। पाणिढाळु॥ ९९॥
    अर्थ: जे अहंभावाचे ओझे टाकून विकल्परूपी वार्‍याच्या झुळुका चुकवून, संसारावरील प्रेमाच्या ओहोटीचे पाणी तपासून.




    ओवी १००
    जया ऐक्याचिया उतारा। बोधाचा जोडला तारा।

    मग निवृत्तीचिया पैल तीरा। झेंपावले जे॥ १००॥
    अर्थ: व ज्यांना जीव व परमात्मा यांच्या ऐक्यरूपी उतार असलेल्या पाण्यात ज्ञानरूपी सोपी पायवाट सापडून मग जे पलिकडच्या निवृत्तिरूपी तीराकडे वळले.




    ओवी १०१
    ते उपरतीच्या वांवीं सेलत। सोऽहंभावाचेनि थावें पेलत।
    मग निघाले अनकळित। निवृत्तितटीं॥ १०१॥
    अर्थ: वैराग्यरूपी हातांनी पाणी तोडीत व "मीच परमात्मा आहे" अशी समजूत हेच कोणी एक बळ, त्याने तोल सांभाळीत अशा रीतीने कसल्याही अडचणीत न पडता, निवृत्तिरूपी काठावर ते बाहेर आले.




    ओवी १०२
    येणें उपायें मज भजले। ते हे माझी माया तरले।
    परि असे भक्त विपाइले। बहुवस नाहीं॥ १०२॥
    अर्थ: या उपायाने जे मला भजले तेही माझी माया तरून गेले. परंतु असे भक्त थोडे आहेत, फार नाहीत.




    ओवी १५
    न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः।

    माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः॥ १५॥
    अर्थ: दुष्कर्मी, मूर्ख व अधम असे मनुष्य, मायेने ज्ञान नष्ट झाल्यामुळे आसुरी मार्गाचा अवलंब करतात आणि मला शरण येत नाहीत.




    ओवी १०३
    जे बहुतां एकां अव्हांतरु। अहंकाराचा भूतसंचारु।

    जाहला म्हणौनि विसरु। आत्मबोधाचा॥ १०३॥
    अर्थ: कारण की वारील साधकांशिवाय बहुतेक इतरांना अहंकारारूपी भूताचा संचार झाल्यामुळे त्यांना आत्मज्ञानाची विस्मृति झाली असते.



    ओवी १०४
    ते वेळीं नियमाचें वस्त्र नाठवे। पुढील अधोगतीची लाज नेणवे।

    आणि करिताति जें न करावें। वेदु म्हणे॥ १०४॥
    अर्थ: त्यावेळी नियमरूप वस्त्राची आठवण त्यास रहात नाही, पुढे असलेल्या अधोगतीची लाज त्यांना भासत नाही, व वेद ज्या गोष्टी करू नये म्हणून म्हणतो त्या गोष्टी ते करतात.




    ओवी १०५
    पाहें पां शरीराचिया गांवा। जयालागीं आले पांडवा।

    तो कार्यार्थु आघवा। सांडूनियां॥ १०५॥
    अर्थ: अर्जुना, पहा, ज्या कामाकरता या शरीररूपी गावाला ते आले तो कार्यभाग सर्व सोडून देऊन.



    ओवी १०६
    इंद्रियग्रामींचे राजबिदीं। अहंममतेचिया जल्पवादीं।

    विकारांतरांचि मांदीं। मेळवूनियां॥ १०६॥
    अर्थ: इंद्रियरूपी गावाच्या राजरस्त्यावर मी माझेपणाच्या बडबडीने, नानाप्रकारच्या विकारांचे समुदाय ते गोळा करतात.




    ओवी १०७
    दुःखशोकांच्या घाईं। मारिलियाची सेचि नाहीं।

    हे सांगावया कारण काई। जे ग्रासिले माया॥ १०७॥
    अर्थ: दु:खशोकाच्या घावांनी कितीही मारले तरी त्यास त्याची आठवण राहात नाही. हे सांगायचे कारण एवढेच की असे ते मायेने ग्रासलेले असतात.




    ओवी १०८
    म्हणौनि ते मातें चुकले। ऐका चतुर्विध मज भजले।

    जिहीं आत्महित केलें। वाढतें गा॥ १०८॥
    अर्थ: म्हणून ते मला चुकले. आता ऐका, दुसरे ज्यांनी आपले आत्महित वाढते केले ते मला चार प्रकारांनी भजले.




    ओवी १०९
    तो पहिला आर्तु म्हणिजे। दुसरा जिज्ञासु बोलिजे।

    तिजा अर्थार्थी जाणिजे। ज्ञानिया चौथा॥ १०९॥
    अर्थ: त्यातील जो पहिला त्याला आर्त (दु:खपीडित) म्हणावे. दुसऱ्याला जिज्ञासु (ज्ञानाची इच्छा करणारा) या नावाने ओळखावे. आणि तिसरा अर्थार्थी (द्रव्याची) इच्छा करणारा आणि चौथा तो ज्ञानी होय असे समजावे.




    ओवी ११०
    तेथ आर्तु तो आर्तीचेनि व्याजें। जिज्ञासु तो जाणावयालागीं भजे।

    तिजेनि तेणें इच्छिजे। अर्थसिद्धि॥ ११०॥
    अर्थ: त्यात जो आर्त आहे, तो पीडेच्या निमित्ताने भक्ती करतो, व जो जिज्ञासु आहे तो जाणण्याकरताच भक्ति करतो. त्यातील तिसरा जो आहे तो अर्थप्राप्तीची इच्छा करतो.



    ओवी १११
    मग चौथियाच्या ठायीं। कांहींचि करणें नाहीं।

    म्हणौनि भक्तु एकु पाहीं। ज्ञानिया जो॥ १११॥
    अर्थ: मग राहिलेल्या चौथ्याच्या ठिकाणी काहीच कर्तव्य नसते, म्हणून अर्जुना, जो ज्ञानी आहे तोच एक भक्त आहे असे समज.




    ओवी ११२
    जे तया ज्ञानाचेनि प्रकाशें। फिटलें भेदाभेदांचें कडवसें।

    मग मीचि जाहला समरसें। आणि भक्तुही तेवींचि॥ ११२॥
    अर्थ: ज्ञानाच्या प्रकाशाने त्याच्या ठिकाणचा द्वैताद्वैतरूपी अंधार नाहीसा होतो. नंतर ब्रह्मैक्याने तो मद्रूप होतो. आणि मद्रूप होऊन सुद्धा तो माझा भक्त असतोच.




    ओवी ११३
    परि आणिकांचिये दिठी नावेक। जैसा स्फटिकुचि आभासे उदक।

    तैसा ज्ञानी नव्हे कौतुक। सांगतां तो॥ ११३॥
    अर्थ: जसा इतरांच्या दृष्टीला स्फटिकच क्षणभर पाण्यासारखा भासतो, तसा इतरांच्या दृष्टीला ज्ञानी (हा त्याच्या भजनपूजनादिक शारीरिक क्रियांवरून) माझ्याहून वेगळा दिसतो. पण ज्ञानी हा तसा (माझ्याहून वेगळा) नाही. त्याचे वर्णन करण्यास मोठे कौतुक वाटते.




    ओवी ११४
    जैसा वारा कां गगनीं विरे। मग वारेपण वेगळें नुरे।

    तेवीं भक्त हे पैज न सरे। जरी ऐक्या आला॥ ११४॥
    अर्थ: ज्याप्रमाणे आकाशात वारा विराला, म्हणजे त्याचे वारेपण वेगळे रहात नाही, त्याप्रमाणे ज्ञानी जरी माझ्याशी ऐक्याला पावला तरी त्याची भक्त ही प्रतिज्ञा जात नाही.




    ओवी ११५
    जरी पवनु हालवूनि पाहिजे। तरी गगनावेगळा देखिजे।

    एर्‍हवीं गगन तो सहजें। असे जैसें॥ ११५॥
    अर्थ: जर वारा हलवून पाहिला तर तो आकाशाहून भिन्न देखील दिसतो, एरवी तो वारा स्वभावत:च आकाशरूप असतो.




    ओवी ११६
    तैसें शरीरीं हन कर्में। तो भक्तु ऐसा गमे।

    परी अंतरप्रतीतिधर्मे। मीचि जाहला॥ ११६॥
    अर्थ: त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष जेव्हा शारीरिक क्रिया करतो (भजनपूजनादिक) त्यावेळी तो भक्त आहे असा वाटतो, पण आतील अनुभावाच्या आंगाने तो मद्रूपच झालेला असतो.




    ओवी ११७
    आणि ज्ञानाचेनि उजिडलेपणें। मी आत्मा ऐसें तो जाणें।

    म्हणौनि मीही तैसेंचि म्हणें। उचंबळला सांता॥ ११७॥
    अर्थ: आणि ज्ञानाचा उदय झाल्यामुळे तो मला आपला आत्मा समजतो. म्हणून मी आनंदयुक्त होऊन ज्ञानी हा माझा आत्मा आहे असे म्हणतो.




    ओवी ११८
    हां गा जीवापैलीकडिलीये खुणे। जो पावोनि वावरों जाणें।

    तो देहाचेनि वेगळेपणें। काय वेगळा होय?॥ ११८॥
    अर्थ: अरे अर्जुना, जीवाच्या पलीकडील वर्माच्या ठिकाणी प्राप्त होऊन, जो व्यवहारही कसा करावा हे समजतो, तो देहाच्या वेगळेपणाने खरोखर वेगळा होईल काय?




    ओवी ११९
    म्हणौनि आपुलाल्या हिताचेनि लोभें। मज आवडे तोहि भक्त झोंबे।
    परी मीचि करी वालभें। ऐसा ज्ञानिया एकु॥ ११९॥
    अर्थ: त्यामुळे आपापल्या हिताच्या इच्छेने जो भक्त मला चिकटतो, त्याला मी देखील आवडतो; परंतु तो भक्त असला पाहिजे जो प्रेमाने, अनन्य भावाने माझ्यावर विश्वास ठेवतो.




    ओवी १२०
    पाहें पां दुभतयाचिया आशा। जगचि धेनूसि करीतसे फांसा।

    परि दोरेंवीण कैसा। वत्साचा बळी॥ १२०॥
    अर्थ: अर्जुना, असे पहा की दुभत्या गाईच्या आशेने लोक गाईला भाला घालतात, परंतु दोरावाचून वासराचा पाश कसा बळकट आहे! म्हणजेच, वासराला कसे सहज त्याचे भाग मिळतात, दोराची आवश्यकता नसते.




    ओवी १२१
    कां जे तनुमनुप्राणें। तें आणिक कांहींचि नेणें।

    देखे तयातें म्हणे। हे माय माझी॥ १२१॥
    अर्थ: याचे कारण म्हणजे ते वासरू शरीराने, मनाने आणि प्राणाने दुसऱ्या कोणासही जाणत नाही. जे काही त्याला दिसेल, ते त्याला "ही माझी आईच आहे" असे म्हणते.




    ओवी १२२
    तें येणें मानें अनन्यगती। म्हणौनि धेनुही तैसीचि प्रीति।

    यालागीं लक्ष्मीपती। बोलिले साचें॥ १२२॥
    अर्थ: ते वासरू गाईच्या ठिकाणी इतके अनन्यगती आहे, की गाईचीही त्याच्यावर तशीच प्रीती असते. त्यामुळे श्रीकृष्णाने जे वर म्हणाले ते खरे आहे.




    ओवी १२३
    हें असो मग म्हणितलें। जे कां तुज सांगितलें।

    तेही भक्त भले। पढियंते आम्हां॥ १२३॥
    अर्थ: मग हे असो, भगवंतांनी सांगितले की इतर तीन भक्त जे तुला सांगितले, ते देखील आम्हाला चांगले आवडतात.




    ओवी १२४
    परि जाणोनियां मातें। जे पाहों विसरले मागौतें।

    जैसें सागरा येऊनि सरितें। मुरडावें ठेलें॥ १२४॥
    अर्थ: परंतु जो ज्ञानी भक्त मी जाणून न पाहता मागे पहावयास विसरला, तो तसेच समुद्राला मिळाल्यावर नदी कधीही मागे वळत नाही.




    ओवी १२५
    तैसी अंतःकरणकुहरीं जन्मली। जयाची प्रतीतिगंगा मज मीनली।

    तो मी हे काय बोली। फार करूं?॥ १२५॥
    अर्थ: अंतःकरणाच्या गुहेत जन्मलेली, ज्याची अनुभवरूपी गंगा मला मिळाली आहे, ते मी आहे. आता हे शब्दांनी काय सांगू? काही विशेष सांगण्यासाठी काहीही नाही.




    ओवी १२६
    एर्‍हवीं ज्ञानिया जो म्हणिजे। तो चैतन्यचि केवळ माझें।

    हें न म्हणावें परि काय कीजे। न बोलणें बोलों॥ १२६॥
    अर्थ: वास्तवात, जो ज्ञानी आहे, तो केवळ माझा आत्मा आहे, हे सांगणं शक्य नाही. परंतु, काय करावे? ही एक न बोलण्यासारखी गोष्ट आहे, तरीही तुम्हाला सांगतो.




    ओवी १२७
    जे तो विषयांची दाट झाडी-। माजीं कामक्रोधांचीं सांकडीं।

    चुकावूनि आला पाडीं। सद्वासनेचिया॥ १२७॥
    अर्थ: कारण तो विषयांच्या दाट झाडीतून काम आणि क्रोधाच्या संकटांना टाळून, चांगल्या वासनांच्या डोंगरावर पोहोचला.




    ओवी १२८
    मग साधुसंगें सुभटा। उजू सत्कर्माचिया वाटा।

    अप्रवृत्तीचा अव्हांटा। डावलूनि॥ १२८॥
    अर्थ: मग संतांच्या संगतीत वर्तन करून, योग्य कर्मांच्या सरळ मार्गावर चालत, निषिद्ध आचरणाच्या आडमार्गाकडे दुर्लक्ष करून.




    ओवी १२९
    आणि जन्मशतांचा वाहतवणा। तेविंची आशेचिया न लेचि वाहणा।

    तेथ फलहेतूचा उगाणा। कवणु चाळी॥ १२९॥
    अर्थ: आणि शेकडो जन्मांच्या प्रवासात, जो फलाशेच्या मार्गाने प्रवास करत आहे, त्याने अंत:करणाला आशेच्या पायाला प्रवेश दिला नाही. अशा स्थितीत स्वर्गादि फलांच्या साधनांचा हिशेब कोणी करावा?




    ओवी १३१
    ऐसा शरीरसंयोगाचिये राती-। माजीं धांवतां सडिया आयती।
    तंव कर्मक्षयाची पाहाती। पाहांट जाली॥ १३०॥
    अर्थ: या प्रकारे, देहसंयोगात असताना, धावत असताना कर्माच्या नाशाची उजाडते पहाट झाली.




    ओवी १३२
    तैसीच गुरुकृपा उखा उजळली। ज्ञानाची वोतपली पडली।
    तेथ साम्याची ऋद्धि उघडली। तयाचिये दिठी॥ १३१॥
    अर्थ: त्याचप्रमाणे गुरुकृपेने उष:काल झाला, ज्ञानाच्या प्रकाशात साम्याची ऐश्वर्ये दिसू लागली.




    ओवी १३३
    ते वेळीं जयाकडे वास पाहे। तेउता मीचि तया एकु आहे।
    अथवा निवांत जरी राहे। तर्‍ही मीचि तया॥ १३२॥
    अर्थ: त्या वेळी जिकडे पाहील तिकडे तिकडे, त्याला मीच एक आहे. जरी तो निवांत राहिला तरीही मीच त्याच्यात आहे.




    ओवी १३४
    हें असो आणिक कांहीं। तया सर्वत्र मीवांचूनि नाहीं।
    जैसें सबाह्य जळ डोहीं। बुडालिया घटा॥ १३३॥
    अर्थ: हे असो, अन्य काही नाही. जसे डोहात घट बुडताना, आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी पाणीच असते.




    ओवी १३५
    तैसा तो मजभीतरीं। मी तया आंतुबाहेरी।
    हें सांगिजेल बोलवरी। तैसें नव्हे॥ १३४॥
    अर्थ: त्याचप्रमाणे तो माझ्या आत असतो आणि मी त्याच्या आत-बाहेर असतो. हे सांगता येण्यासारखे नाही.




    ओवी १३६
    म्हणौनि असो हें इयापरी। तो देखे ज्ञानाची वाखारी।
    तेणें संसरलेनि करी। आपु विश्व॥ १३५॥
    अर्थ: म्हणून त्याला राहू दे, तो ज्ञानाचे भांडार पाहतो आणि त्या योगाने संपूर्ण विश्व आत्मरूपात पहातो.




    ओवी १३७
    हें समस्तही श्रीवासुदेवो। असा प्रतीतिरसाचा वोतला भावो।
    म्हणौनि भक्तांमाजीं रावो। आणि ज्ञानिया तोचि॥ १३६॥
    अर्थ: हे संपूर्ण विश्व श्रीवासुदेव आहे, अशा अनुभवरूपी रसाची समजूत त्याला आहे, म्हणून सर्व भक्तांमध्ये तो राजा आहे आणि ज्ञानीही तोच आहे.




    ओवी १३८
    जयाचिये प्रतीतीचा वाखारां। पवाडु होय चराचरा।
    तो महात्मा धनुर्धरा। दुर्लभु आथी॥ १३७॥
    अर्थ: ज्याच्या अनुभवरूपी भांडारात स्थावर-जंगम विश्वाचा समावेश होतो, तो महात्मा दुर्लभ आहे.




    ओवी १३९
    येर बहुत जोडती किरीटी। जयांचीं भजनें भोगासाठीं।
    जे आशातिमिरें दृष्टी। विषयांध जाले॥ १३८॥
    अर्थ: अर्जुना, ज्यांची भजने भोगासाठी असतात आणि ज्याची दृष्टि आशारूपी अंधाराने मंदावलेली असते, असे इतर भक्त खूप आहेत.




    ओवी १३९
    आणि फळाचिया हांवा। हृदयीं कामा जाला रिगावा।
    कीं तयाचिये घसणी दिवा। ज्ञानाचा गेला॥ १३९॥
    अर्थ: आणि फलाविषयीच्या तीव्र इच्छेमुळे अंत:करणात कामाने प्रवेश केला, ज्यामुळे ज्ञानाचा प्रकाश गेला.




    ओवी १४०
    ऐसे उभयतां आंधारीं पडले। म्हणौनि पासींचि मातें चुकले।
    मग सर्वभावें अनुसरले। देवतांतरां॥ १४०॥
    अर्थ: (बाहेर आशारूपी नेत्ररोगाने आणि आत अविवेकाने) अशा दोन्ही प्रकारांनी (अज्ञानात) अंधारात पडले. म्हणून ते मला चुकले आणि नंतर सर्व भावनेने इतर देवतांना भजायला लागले.




    ओवी १४१
    आधींच प्रकृतीचे पाइक। वरी भोगालागीं तंव रंक।
    मग तेणें लोलुपत्वें कौतुक। कैसेनि भजती॥ १४१॥
    अर्थ: मूळचेच देहात्मबुद्धीचे दास असलेले, भोगासाठी दीन झालेले लोक, विषयसुखाच्या लालसेने इतर देवांचे कौतुक करून भजन करतात, हे पहा.




    ओवी १४२
    कवणीं तिया नियमबुद्धि। कैसिया हन उपचारसमृद्धि।
    कां अर्पण यथाविधि। विहित करणें॥ १४२॥
    अर्थ: त्या देवतेच्या आराधनेविषयी जो नियम प्रसिद्ध आहे, त्यावर आधारीत उपचार कसे करावेत, शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणे अर्पण कसे करावे हे समजून घेऊन ते उपचार करतात.




    ओवी १४३
    पैं जो जिये देवतांतरीं। भजावयाची चाड करी।
    तयाची ते चाड पुरी। पुरविता मी॥ १४३॥
    अर्थ: परंतु जो त्या अन्य देवतांना भजावयाची इच्छा करतो, त्याची ती इच्छा पूर्णपणे पुरवणारा मीच आहे.




    ओवी १४४

    देवोदेवीं मीचि पाहीं। हाही निश्चयो त्यासि नाहीं।
    भावो ते ते ठायीं। वेगळा धरिती॥ १४४॥
    अर्थ: देवतांतरातून मीच आहे, हा निश्चय देखील त्यास नसतो. त्या त्या देवतांविषयी त्याची भिन्न भिन्न समजूत असते.



    ओवी १४५
    मग तिया श्रद्धायुक्त। तेथिंचें आराधन जें उचित।
    तें सिद्धिवरी समस्त। वर्तो लागे॥ १४५॥
    अर्थ: मग त्या देवतेचे जे योग्य आराधन असेल, ते श्रद्धेने आपली कार्यसिद्धी पूर्ण होईपर्यंत संपूर्ण आचरतो.




    ओवी १४६
    ऐसें जेणें जें भाविजे। तें फळ तेणें पाविजे।
    परी तेंही सकळ निपजे। मजचिस्तव॥ १४६॥
    अर्थ: याप्रमाणे ज्याने ज्याची इच्छा करावी, त्याला ते फळ मिळते. पण ते देखील सर्व माझ्यामुळेच होते.




    ओवी १४७
    परी ते भक्त मातें नेणती। जे कल्पनेबाहेरी न निघती।
    म्हणौनि कल्पित फळ पावती। अंतवंत॥ १४७॥
    अर्थ: परंतु ते भक्त मला जाणत नाहीत, कारण ते कल्पनेच्या बाहेर पडत नाहीत, म्हणून त्यास नाशवंत असे इच्छिलेले फळ प्राप्त होते.




    ओवी १४८
    किंबहुना ऐसें जें भजन। तें संसाराचेंचि साधन।
    येर फळभोग तो स्वप्न। नावभरी दिसे॥ १४८॥
    अर्थ: फार काय सांगावे? असे जे भजन ते जन्म-मरणाला देणारे आहे आणि त्या भजनाने मिळणारा हा ऐहिक पारत्रिक फलभोग क्षणभर दिसणारे स्वप्नच आहे.




    ओवी १४९
    हें असो परौंते। मग हो कां आवडे तें।
    परी यजी जो देवतांतें। तो देवत्वासीचि ये॥ १४९॥
    अर्थ: हे फलभोगाची गोष्ट एका बाजूला राहू दे. मग वाटेल ते दैवत का असेना, परंतु जो ज्या देवतांना भजतो तो त्या त्या देवत्वास प्राप्त होतो.




    ओवी १५०
    येर तनुमनुप्राणी। जे अनुसरले माझेयाचि वाहणीं।
    ते देहाच्या निर्वाणीं। मीचि होती॥ १५०॥
    अर्थ: दुसरे जे शरीराने व प्राणाने अखंड माझ्या भजनाच्या ओघात आहेत ते देहाचे अंती मीच होतात.




    ओवी १५१
    परी तैसें न करिती प्राणिये। वायां आपुलिया हितीं वाणिये।
    जें पोहताती पाणियें। तळहातींचेनि॥ १५१॥
    अर्थ: पण प्राणी तसे करत नाहीत. व्यर्थ आपल्या हिताचा तोटा करतात. ते त्यांचे करणे तळहातातील पाण्यात पोहल्याप्रमाणे आहे.




    ओवी १५२
    नाना अमृताच्या सागरीं बुडिजे। मग तोंडा कां वज्रमिठी पाडिजे?
    आणि मनीं तरी आठविजे। थिल्लरोदकातें?॥ १५२॥
    अर्थ: किंव्हा अमृताच्या समुद्रामधे बुडी द्यावी आणि मग तोंड का घट्ट मिटून धरावे? आणि मनात तर डबक्यातील पाण्याची आठवण का करावी?




    ओवी १५३
    हें ऐसें कासया करावें। जे अमृतींही रिगोनि मरावें।
    तें सुखें अमृत होऊनि कां नसावें। अमृतामाजीं?॥ १५३॥
    अर्थ: अमृतात शिरून तोंडात अमृत जाऊ न देता मरावे असे हे कशाला करावे? तर अमृतामधे सुखाने अमर होऊन का राहू नये?




    ओवी १५४
    तैसा फळहेतूचा पांजरा। सांडूनियां धनुर्धरा।
    कां प्रतीतिपाखीं चिदंबरा। गोसाविया नोहावें?॥ १५४॥
    अर्थ: अर्जुना त्याप्रमाणे फलाशेचा पिंजरा टाकून आत्मानुभवरूप पंखाने चिदाकाशात हवा तसा संचार करण्यास का समर्थ होऊ नये?




    ओवी १५५
    जेथ उंचावलेनि पवाडें। सुखाचा पैसारु जोडे।
    आपुलेनि सुरवाडें। उडों ये असा॥ १५५॥
    अर्थ: त्या चिदाकाशात जितके जितके आपण उंच जाऊ त्या मानाने आपणाला सुखाने संचार करण्याला हवा तसा विस्तार मिळतो.




    ओवी १५६
    तया उमपा माप कां सुवावें। मज अव्यक्ता व्यक्त कां मानावें।
    सिद्ध असतां कां निमावें। साधनवरी?॥ १५६॥
    अर्थ: त्या अमर्याद स्वरूपाला माप का घालावे? मला निराकाराला साकार का समजावे? मी स्वत:सिद्ध असता माझ्या प्राप्तीकरता साधने करून का मरावे?




    ओवी १५७
    परी हा बोल आघवा। जरी विचारीजतसे पांडवा।
    तरी विशेषें या जीवां। न चोजवे गा॥ १५७॥
    अर्थ: अर्जुना, पण ह्या सर्व बोलण्याचा विचार केला तर बहुत करून ह्या जीवांना ही गोष्ट समजत नाही.




    ओवी १५८
    कां जे योगमायापडळें। हे जाले आहाति आंधळे।
    म्हणौनि प्रकाशाचेनि देहबळें। न देखती मातें॥ १५८॥
    अर्थ: कारण की योगमायेच्या पडद्याने हे आंधळे झाले आहेत, म्हणून स्वरूप प्रकाशाने भरलेल्या दिवसाच्या बळाने देखील ते मला पहात नाहीत.




    ओवी १५९
    एर्‍हवीं मी नसें ऐसें। काय वस्तुजात असे?।
    पाहें पां कणव जळ रसें-। रहित आहे?॥ १५९॥
    अर्थ: सहज विचार करून पाहिले तर ज्यामधे मी नाही असा काही पदार्थ आहे काय? असे पहा की रसाशिवाय पाणी कोठे आहे काय?




    ओवी १६०
    पवनु कवणातें न शिवेचि। आकाश कें न समायेचि।
    हें असो एकु मीचि। विश्वीं आहें॥ १६०॥
    अर्थ: वारा कोणाला शिवत नाही? आकाश कोठे व्यापीत नाही? हे बोलणे राहू दे, मीच एक सगळ्या विश्वास व्यापून आहे.




    ओवी १६१
    येथें भूतें जियें अतीतलीं। तियें मीचि होऊनि ठेलीं।
    आणि वर्तत आहाति जेतुलीं। तींही मीचि॥ १६१॥
    अर्थ: ह्या जगात जितके प्राणी होऊन गेले तितके ते मीच होऊन राहिले आहेत. आणि हल्ली जितके प्राणी हयात आहेत तेही मीच आहेत.




    ओवी १६२
    कां भविष्यमाणें जियें हीं। तींही मजवेगळीं नाहीं।
    हा बोलचि एर्‍हवीं कांहीं। होय ना जाय॥ १६२॥
    अर्थ: पुढे जे प्राणी होणार आहेत तेही माझ्याहून निराळे नाहीत. हे सर्व फक्त म्हणावयाचेच. वास्तवात काही होत नाही व जात नाही.




    ओवी १६३
    दोराचिया सापासी। डोंबा बडिया ना गव्हाळा अशी।
    संख्या न करवे कोण्हासी। तेवीं भूतांसि मिथ्यत्वें॥ १६३॥
    अर्थ: दोरीवर भासणार्‍या सापाचा तो कोणत्या जातीचा आहे, म्हणजे डोंबा (काळा) आहे की बडी (कवड्या) आहे, का गव्हाळा (गव्हासारख्या ठिपक्यांचा) असा कोणासही निश्चय करता येत नाही. त्याप्रमाणे प्राण्यासंबंधी निश्चय करता येत नाही, कारण प्राणी मिथ्या आहेत.




    ओवी १६४
    मी ऐसा पंडुसुता। अनुस्यूतु सदा असतां।
    या संसार जो भूतां। तो आनें बोलें॥ १६४॥
    अर्थ: अर्जुना याप्रमाणे मी सदा अखंडित असतांना या प्राण्यांना जन्ममरणरूपी संसार लागला आहे तो वेगळ्या प्रकाराने.




    ओवी १६५
    तरी तेचि आतां थोडीसी। गोठी सांगिजेल परियेसीं।
    जै अहंकारा तनूंसीं। वालभ पडिलें॥ १६५॥
    अर्थ: आता थोडीशी गोष्ट सांगतो ऐक. जेव्हा अहंकार आणि देह यांचे एकमेकांवर प्रेम जुळले.




    ओवी १६६
    तेथ इच्छा हे कुमारी जाली। मग ते कामाचिया तारुण्या आली।
    तेथ द्वेषेंसीं मांडिली। वर्‍हाडिक॥ १६६॥
    अर्थ: तेव्हा त्यांना इच्छा ही मुलगी झाली, नंतर ती इच्छा कामरूपी तारुण्याला आली, त्य़ावेळी तिचे द्वेषाशी लग्न लावले.




    ओवी १६७
    तया दोघांस्तव जन्मला। असा द्वंद्वमोहो जाला।
    मग तो आजेयानें वाढविला। अहंकारें॥ १६७॥
    अर्थ: त्या दोघांपासून द्वंद्वमोह जन्मला, मग त्याचा आजा जो अहंकार त्याने त्याला वाढवला.



    ओवी १६८
    जो धृतीसी सदां प्रतिकूळु। नियमाही नागवे सळु।
    आशारसें दोंदिलु। जाला सांता॥ १६८॥
    अर्थ: तो द्वंद्वमोह सात्विक धैर्याला नेहेमी प्रतिकूल असतो आणि आशारूपी रसाने पुष्ट झाला असता तो छळणारा द्वंद्वमोह नियमात सापडत नाही.




    ओवी १६९
    असंतुष्टीचिया मदिरा। मत्त होऊनि धनुर्धरा।
    विषयांचे वोवरां। विकृतीशीं॥ १६९॥
    अर्थ: अर्जुना, असंतोषरूप दारूने उन्मत्त होऊन तो पंचविषयरूप खोलीमधे विकाररूपी स्त्रीसह रहातो.




    ओवी १७०
    तेणें भावशुद्धीचिये वाटे। विखुरले विकल्पाचे कांटे।
    मग चिरिलें आव्हांटे। अप्रवृत्तीचे॥ १७०॥
    अर्थ: त्या द्वंद्वमोहाने अंत:करणशुद्धीच्या वाटेवर विकल्परूपी काटे पसरले आणि नंतर निषिद्ध कर्माचे आडमार्ग खुले केले.




    ओवी १७१
    तेणें भूतें भांबावलीं। म्हणौनि संसाराचिया आडवामाजीं पडिलीं।
    मग महादुःखाच्या घेतलीं। दांडे वरी॥ १७१॥
    अर्थ: त्यायोगे प्राणी भांबावले व म्हणून संसाररूपी अरण्यात पडले व मग मोठमोठ्या दु:खाच्या दांडक्याने बडवले गेले.




    ओवी १७२
    ऐसे विकल्पाचे वांयाणे। कांटे देखोनि सणाणे।
    जे मतिभ्रमाचे पासवणें। घेतीचिना॥ १७२॥
    अर्थ: असे विकल्पाचे पोकळ अणकुचिदार काटे पाहून, जे बुद्धिभ्रंशरूपी माघार घेतच नाहीत (म्हणजे बुद्धीला भ्रंश पडू देत नाहीत).




    ओवी १७३
    उजू एकनिष्ठेच्या पाउलीं।
    रगडूनि विकल्पाचिया भालीं।
    महापातकाची सांडिली।
    अटवीं जिहीं ॥ १७३ ॥
    ज्यांनी सरळ एकनिष्ठेच्या पावलांनी विकल्परूपी काट्यांची टोके चेंगरून मोठमोठ्या पातकांचे अरण्य टाकले आहे. ॥७-१७३॥
    अर्थ: एकनिष्ठ पायांनी विकल्पांवर चढून, महापातकांचा नाश करणारे लोक.




    ओवी १७४
    मग पुण्याचे धांवा घेतले।
    आणि माझी जवळीक पातले।
    किंबहुना चुकले।
    वाटवधेयां ॥ १७४ ॥
    जरा, मरण यापासून मुक्त होण्याकरता माझा आश्रय करून जे यत्न करतात ते त्या ब्रह्माला संपूर्ण अध्यात्माला व संपूर्ण कर्माला जाणतात. ॥७-२९॥
    अर्थ: मुक्तीच्या प्रयत्नात असलेले लोक ब्रह्मा आणि कर्माची पूर्णता जाणतात.




    ओवी २९
    जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये।
    ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ॥ २९ ॥
    अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ज्या प्रयत्नाने जन्ममरणाची कथा संपते, अशा प्रयत्नांस ज्यांची इच्छा उत्पन्न करते. ॥७-१७५॥
    अर्थ: जन्म-मरणाच्या कथेवर विजय मिळविण्यासाठी जे प्रयत्न करतात, ते त्या प्रयत्नात कृतज्ञता ठेवतात.




    ओवी १७५
    एर्‍हवीं तरी पार्था।
    जन्ममरणाची निमे कथा।
    ऐसिया प्रयत्नातें आस्था।
    विये जयांची ॥ १७५ ॥
    मग त्यांना तो प्रयत्नच एकदम संपूर्ण परब्रह्मरूप फळाने फलद्रूप होतो. ते परब्रह्मरूपी फळ पिकले असता त्यातून पूर्णतेचा रस गळतो. ॥७-१७६॥
    अर्थ: या प्रयत्नामुळे त्यांना परब्रह्माची पूर्णता मिळते, ज्यामुळे पूर्णतेचा रस गळतो.




    ओवी १७६
    तयां तो प्रयत्नुचि एके वेळे।
    मग समग्र परब्रह्में फळे।
    जया पिकलेया रसु गळे।
    पूर्णतेचा ॥ १७६ ॥
    त्यावेळी कृतकृत्यतेने जग भरून जाते व ब्रह्माच्या सहजस्थितीची अनोळख फिटते. कर्मांचे प्रयोजन संपते व मन नाहीसे होते. ॥७-१७७॥
    अर्थ: त्या वेळेस कृतकृत्यता जगात पसरते आणि कर्माचे प्रयोजन संपते, मन शांती प्राप्त करते.




    ओवी १७७
    ते वेळीं कृतकृत्यता जग भरे।
    तेथ अध्यात्माचें नवलपण पुरे।
    कर्माचें काम सरे।
    विरमे मन ॥ १७७ ॥
    अर्जुना, ज्याच्या व्यापाराला भांडवल मी असतो, त्याला ब्रह्माच्या सहजस्थितीचा असा लाभ होतो. ॥७-१७८॥
    अर्थ: जो ब्रह्माची स्थिती साधतो, त्याला महान लाभ मिळतो.




    ओवी १७८
    ऐसा अध्यात्मलाभु तया।
    होय गा धनंजया।
    भांडवल जया।
    उद्यमीं मी ॥ १७८ ॥
    त्याला साम्याच्या वाढीमुळे ऐक्याचा व्यापार साधतो. त्या ऐक्याच्या ठिकाणी तो भेदाचे दारिद्र्य जाणतच नाही. ॥७-१७९॥
    अर्थ: तो साम्याच्या वाढीमुळे ऐक्य साधतो, जिथे भेदाचे दारिद्र्य त्याला समजत नाही.




    ओवी १७९
    तयातें साम्याचिये वाढी।
    ऐक्याची सांदे कुळवाडी।
    तेथ भेदाचिया दुबळवाडी।
    नेणिजे तया ॥ १७९ ॥
    अर्थ: साम्याच्या ठिकाणी ऐक्य साधणारे लोक भेदाचे दुबळपण जाणत नाहीत.




    ओवी १८०
    जिहीं साधिभूता मातें।
    प्रतीतीचेनि हातें।
    धरूनि अधिदैवातें।
    शिवतले गा ॥ १८० ॥
    ज्यास वरील ज्ञानाच्या जोराने अधियज्ञ जो मी, तो अनुभवास येतो, ते पुरुष शरीराच्या वियोगाच्या वेळेला दु:खी होत नाहीत. ॥७-१८१॥
    अर्थ: ज्ञानाच्या आधारे अधियज्ञ अनुभवणारे लोक शरीराच्या वियोगात दु:खी होत नाहीत.





    ओवी १८१
    जया जाणिवेचेनि वेगें।
    मी अधियज्ञुही दृष्टी रिगें।
    ते तनूचेनि वियोगें।
    विर्‍हये नव्हती ॥ १८१ ॥
    सहज विचार करून पाहिले तर आयुष्याची दोरी तुटली की (मरणार्‍या) प्राण्यांची खळबळ उडते. (ती पाहून) न मरणार्‍याच्याही चित्ताला प्रलयकाल ओढवल असे वाटत नाही काय? ॥७-१८२॥
    अर्थ: आयुष्य संपताना, मृत्यूची खळबळ चालू असताना, न मरणार्‍याचं मन देखील प्रलयात ओढलेले वाटते.




    ओवी १८२
    एर्‍हवीं आयुष्याचें सूत्र विघडतां।
    भूतांची उमटे खडाडता।
    काय न मरतयाचियाहि चित्ता।
    युगांतु नोहे? ॥ १८२ ॥
    परंतु ज्ञान्यांच्या बाबतीत कोण जाणे कसे होते ते. ते माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन गेले आहेत, ते अंतकालाच्या धांदलीत मला विसरतच नाहीत. ॥७-१८३॥
    अर्थ: ज्ञान्यांच्या बाबतीत, त्यांना अंतकालाच्या गोंधळात विसरले जात नाही.





    ओवी १८३
    परी नेणों कैसे पैं गा।
    जे जडोनि गेले माझिया आंगा।
    ते प्रयाणींचिया लगबगा।
    न सांडितीच मातें ॥ १८३ ॥
    सहज विचार करून पाहिले तर असे जे निष्णात आहेत तेच (माझ्या ठिकाणी) स्थिर अंत:करण झालेले योगी आहेत, असे समज. ॥७-१८४॥
    अर्थ: निष्णात व्यक्तींचे अंत:करण स्थिर होते, ते योगी आहेत.




    ओवी १८४
    एर्‍हवी तरीं जाण।
    असे जे निपुण।
    तेचि अंतःकरण-।
    युक्त योगी ॥ १८४ ॥
    ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) त्यावेळी श्रीकृष्णाने सांगितलेल्या शब्दरूपी कुपीच्या खाली अर्जुनाची लक्षरूपी ओंजळ प्राप्त झाली नाही. कारण अर्जुन त्यावेळी क्षणभर मागे होता. (देवाच्या सांगण्याकडे त्याचे लक्ष नव्हते.) ॥७-१८५॥
    अर्थ: अर्जुनाला त्या क्षणी श्रीकृष्णाचे ज्ञान मिळाले नाही कारण त्याचे लक्ष मागे होते.




    ओवी १८५
    तंव इये शब्दकुपिकेतळीं।
    नोडवेचि अवधानाची अंजुळी।
    जे नावेक अर्जुन तये वेळीं।
    मागांचि होता ॥ १८५ ॥
    त्या ठिकाणी ते ब्रह्म सांगणारी हीच कोणी फळे नाना प्रकारच्या अर्थरूपी रसाने रसभरीत होती व ती अभिप्रायांच्या सुगंधाने दरवळली होती. ॥७-१८६॥
    अर्थ: त्या ठिकाणी ब्रह्माची फळे विविध अर्थांनी भरलेली होती आणि ती सुगंधाने दरवळत होती.




    ओवी १८६
    जेथ तद्ब्रह्मवाक्यफळें।
    जिये नानार्थरसें रसाळें।
    बहकताती परिमळें।
    भावाचेनि ॥ १८६ ॥
    अशी ही श्रीकृष्णरूप वृक्षाची वचनरूप फले, सहज कृपारूपी मंद वार्‍याने, अर्जुनाच्या कानरूपी ओटीत अकस्मात पडली. ॥७-१८७॥
    अर्थ: श्रीकृष्णाचे वचनरूपी फळे अर्जुनाच्या कानात सहजपणे पडली.




    ओवी १८७
    सहज कृपामंदानिळें।
    कृष्णद्रुमाची वचनफळें।
    अर्जुन श्रवणाचिये खोळे।
    अवचित पडिलीं ॥ १८७ ॥
    ती वाक्यरूपी फळे तत्वज्ञानाच्या सिद्धांताचीच जणु काय बनवलेली असून ब्रह्मरसाच्या समुद्रात बुडवून मग तशीच ती जणु काय परमानंदाने घोळलेली होती. ॥७-१८८॥
    अर्थ: ती वाक्यरूपी फळे ज्ञानाच्या समुद्रात बुडवलेली आणि परमानंदाने घोळलेली होती.




    ओवी १८८
    तियें प्रमेयाची हो कां वळलीं।
    कीं ब्रह्मरसाच्या सागरीं चुबुकळिलीं।
    मग तैसीचि कां घोळिलीं।
    परमानंदें ॥ १८८ ॥
    त्या फळांच्या शुद्ध चांगलेपणाने अर्जुनाला ज्ञानाचे डोहाळे लागले. ते डोहाळे आश्चर्यरूपी अमृताचे घुटके घेऊ लागले. ॥७-१८९॥
    अर्थ: त्या फळांच्या चांगल्या गुणामुळे अर्जुनाला ज्ञानाचे डोहाळे लागले.





    ओवी १८९
    तेणें बरवेपणें निर्मळें।
    अर्जुना उन्मेषाचे डोहळे।
    घेताति गळाळे।
    विस्मयामृताचे ॥ १८९ ॥
    त्या सुखसंपत्तीचा लाभ झाल्यामुळे मग अर्जुन स्वर्गाला वेडावून दाखवू लागला व त्याच्या जीवात गुदगुल्या होऊ लागल्या. ॥७-१९०॥
    अर्थ: सुखसंपत्तीचा अनुभव घेतल्यावर अर्जुन स्वर्गाच्या आनंदात वेडावून गुदगुल्या अनुभवू लागला.




    ओवी १९०
    तिया सुखसंपत्ती जोडलिया।
    मग स्वर्गा वाती वांकुलिया।
    हृदयाच्या जीवीं गुतकुलिया।
    होत आहाती ॥ १९० ॥
    याप्रमाणे त्या फळांच्या बाह्य सौंदर्याचे अर्जुनास सुख अनुभवाला येऊ लागले. तो इतक्यात त्या फळाच्या रसाची रुचि घेण्याच्या तीव्र इच्छेने त्वरा केली. ॥७-१९१॥
    अर्थ: त्या फळांच्या सौंदर्यामुळे अर्जुनाला सुख अनुभवायला लागले आणि त्याला रस घेण्याची तीव्र इच्छा झाली.




    ओवी १९१
    ऐसें वरचिलीचि बरवा।
    सुख जावों लागलें फावा।
    तंव रसस्वादाचिया हांवा।
    लाहो केला ॥ १९१ ॥
    ताबडतोप अनुमानानाच्या तळहातात ती वाक्यफळे घेऊन, अनुभवरूपी मुखात ती एकदम घालायला अर्जुन पाहू लागला. ॥७-१९२॥
    अर्थ: अर्जुन त्या वाक्यफळा ताबडतोप आपल्या तळहातात घेऊन त्याला आपल्या मुखात घालण्यासाठी उत्सुक झाला.




    ओवी १९२
    झडकरी अनुमानाचेनि करतळें।
    घेऊनि तियें वाक्यफळें।
    प्रतीतिमुखीं एके वेळे।
    घालूं पाहे ॥ १९२ ॥
    तेव्हा विचाराच्या तोंडात ती फळे मावेनात (म्हणजे भगवंताचा हेतु काय आहे ते त्याचला कळेना). असे जाणून अर्जुन ती वाक्यरूपी फळे तोंडाला लावीना. ॥१९३॥
    अर्थ: अर्जुन विचार करीत असताना त्याला भगवंताचा हेतू समजत नसल्यामुळे ती वाक्यफळे तोंडात लावू शकला नाही.




    ओवी १९३
    तंव विचाराचिया रसना न दाटती।
    परी हेतूच्या दशनीं न फुटती।
    ऐसें जाणौनि सुभद्रापती।
    चुंबिचिना ॥ १९३ ॥
    मग चमत्कार वाटून अर्जुन म्हणतो, ही वाक्ये म्हणजे पाण्यात पडलेल्या तार्‍यांचे प्रतिबिंब होय, मी अक्षराच्या सुलभपणामुळे कसा फसलो? ॥७-१९४॥
    अर्थ: अर्जुन विचारात पडला आणि म्हणाला की ही वाक्ये तर पाण्यातील तार्‍यांचे प्रतिबिंब आहेत; मी अक्षराच्या सुलभतेमुळे चुकलो.




    ओवी १९४
    मग चमत्कारला म्हणे।
    इयें जळींचीं मा तारांगणें।
    कैसा झकविलों असलगपणें।
    अक्षरांचेनि ॥ १९४ ॥
    ही खरोखर वाक्ये नाहीत, तर आकाशाच्या घड्याच आहेत. तेथे आमची बुद्धी किती जरी धडपड केली तरी तिला थांग लागत नाही. ॥७-१९५॥
    अर्थ: या वाक्ये आकाशातील घड्यांचेच प्रतिबिंब आहेत, त्यामुळे आमची बुद्धी त्यांना समजून घेऊ शकत नाही.




    ओवी १९५
    इयें पदें नव्हती फुडिया।
    गगनाचिया घडिया।
    येथ आमुची मति बुडालिया।
    थावो न निघे ॥ १९५ ॥
    असे जर आहे तर मग ती वाक्ये कळावयाची गोष्टच कशाला? असा अर्जुनाने मनात विचार करून त्याने पुन्हा भगवंताकडे दृष्टी केली. ॥७-१९६॥
    अर्थ: जर हे खरे आहे तर मग त्या वाक्यांचा अर्थ कळायला काय गरज आहे? असा विचार करून अर्जुन भगवंताकडे पाहू लागला.




    ओवी १९६
    वांचूनि जाणावयाची कें गोठी।
    ऐसें जीवीं कल्पूनि किरीटी।
    तिया पुनरपि केली दृष्टी।
    यादवेंद्रा ॥ १९६ ॥
    मग अर्जुनाने विनंती केली की अहो, देवा ही सातही पदे एकसारखी कधी न ऐकलेली अशी आश्चर्यकारक आहेत. ॥७-१९७॥
    अर्थ: अर्जुनाने भगवंताकडे विनंती केली की हे सातही पदे अनोखी आहेत, जी त्याने कधी ऐकली नाहीत.




    ओवी १९७
    मग विनविलें सुभटें।
    हां हो जी ये एकवाटे।
    सातही पदें अनुच्छिष्टें।
    नवलें आहाती ॥ १९७ ॥
    सहज विचार करून पाहिले तर या सात वाक्यातील निरनिराळ्या प्रमेयांचा उलगडा, वेगाने अवधान देऊन श्रवण केले असता त्या श्रवणाच्या बलाने काही बोलता येईल (असे मला वाटले होते). ॥७-१९८॥
    अर्थ: अर्जुनाने सहज विचार करून म्हटले की या सात वाक्यांमध्ये विविध प्रमेयांचा उलगडा करणे शक्य आहे.




    ओवी १९८
    एर्‍हवीं अवधानाचेनि वहिलेपणें।
    नाना प्रमेयांचें उगाणें।
    काय श्रवणाचेनि आंगवणें।
    बोंलों लाहाती? ॥ १९८ ॥
    पण देवा, हे तसे नव्हे. मी अक्षराचा समुदाय पाहिला आणि माझ्या आश्चर्याच्या जीवाला आश्चर्य झाले. ॥७-१९९॥
    अर्थ: अर्जुन म्हणतो की हे तसे नाही, कारण त्याला अक्षरांचा समूह पाहून आश्चर्याचा अनुभव झाला.




    ओवी १९९
    परी तैसें हें नोहेचि देवा।
    देखिला अक्षरांचा मेळावा।
    आणि विस्मयाचिया जीवा।
    विस्मयो जाला ॥ १९९ ॥
    कानाच्या झरोक्याच्या वाटे शब्दाचे किरण आत प्रवेश करतात न करतात तोच माझे लक्ष चमत्काराने चकित झाले. ॥७-२००॥
    अर्थ: शब्दाचे किरण कानातून आत येत असताना अर्जुन चमत्काराने आश्चर्यचकित झाला.




    ओवी २००
    कानाचेनि गवाक्षद्वारें।
    बोलाचे रश्मी अभ्यंतरें।
    पाहेना तंव चमत्कारें।
    अवधान ठकलें ॥ २०० ॥
    अर्थ: कानातून शब्दाचे किरण आत प्रवेश करत असताना अर्जुन चमत्काराने गडबडले.




    ओवी २०१
    तेवींचि अर्थाची चाड मज आहे।
    तें सांगतांही वेळु न साहे।
    म्हणौनि निरूपण लवलाहें।
    कीजो देवा ॥ २०१ ॥
    अशा रीतीने देवाने मागे काय सांगितले याचा विचार करून व पुढे देव काय सांगतील, त्या अभिप्रायावर दृष्टी ठेऊन त्याचप्रमाणे आपली इच्छाही मध्ये शिरकावून ॥७-२०२॥
    अर्थ: अर्जुन याचा अर्थ स्पष्ट करण्याची इच्छा व्यक्त करतो, देवाने मागे सांगितलेल्या गोष्टींचा विचार करून पुढील अभिप्रायात आपली इच्छाही समाविष्ट करतो.


    ओवी २०२

    ऐसा मागील पडताळा घेउनी।
    पुढां अभिप्राय दृष्टी सूनी।
    तेवींचि माजीं शिरौनी।
    आर्ती आपुली ॥ २०२ ॥
    अर्जुनाची प्रश्न विचारण्याची चतुराई क्शी आहे पहा. तो भिडेची मर्यादा तर उल्लंघत करीत नाही. परंतु सहज विचार करून पाहिले तर तो श्रीकृष्णाच्या अंत:करणाला आलिंगन देण्यास प्रवृत्त झाला. ॥७-२०३॥
    अर्थ: अर्जुनाच्या प्रश्न विचारण्याची कला लक्षात घेऊन तो श्रीकृष्णाला आलिंगन देण्यास प्रवृत्त झाला आहे.




    ओवी २०३


    कैसी पुसती पाहें पां जाणिव।

    भिडेचि तरी लंघों नेदीं शिंव।
    एर्‍हवीं श्रीकृष्ण हृदयासि खेंव।
    देवों सरला ॥ २०३ ॥
    अहो श्रीगुरूला जेव्हा विचारायचे असेल त्यावेळी त्या मानाने हुशार व्हावे, हे सर्व एक अर्जुनच जाणतो. ॥७-२०४॥
    अर्थ: अर्जुन शिरसावध असतो, त्यावेळी श्रीगुरुंकडे प्रश्न विचारताना तो खूप हुशार असावा लागतो.




    ओवी २०४

    अहो श्रीगुरूतें जैं पुसावें।
    तैं येणें मानें सावध होआवें।
    हें एकचि जाणें आघवें।
    सव्यसाची ॥ २०४ ॥
    आता त्या अर्जुनाचे खुबीदार प्रश्न करणे व त्यावर सर्वज्ञ श्रीकृष्ण परमात्म्याचे बोलणे हे संजयास आवडल्यामुळे तो ते बोलणे प्रेमाने सांगेल. ॥७-२०५॥
    अर्थ: अर्जुनाच्या प्रश्नांची चतुराई आणि श्रीकृष्णाचे ज्ञान संजयाला आवडते, त्यामुळे तो ते प्रेमाने सांगतो.




    ओवी २०५
    आतां तयाचें तें प्रश्न करणें।

    वरी सर्वज्ञ श्रीहरीचें बोलणें।
    संजयो आवडलेपणें।
    सांगैल कैसें ॥ २०५ ॥
    ते सरळ मराठी भाषेत सांगितले जाईल. त्या निरूपणाकडे लक्ष द्यावे. जसे कानाच्या आधी दृष्टीचा उपयोग होतो ॥७-२०६॥
    अर्थ: संजय हे ज्ञान सरळ मराठी भाषेत सांगेल आणि निरूपणावर लक्ष देईल.




    ओवी २०६
    तिये अवधान द्यावें गोठी।

    बोलिजेल नीट मर्‍हाटी।
    जैसी कानाचे आधीं दिठी।
    उपेगा जाये ॥ २०६ ॥
    त्याप्रमाणे बुद्धीच्या जिव्हेने शब्दाचा मतलब न चाखता, केवळ अक्षरांच्या शोभेने इंद्रिये जगतील. (इंद्रियांचे समाधान होईल). ॥७-२०७॥
    अर्थ: बुद्धीच्या जिव्हेने शब्दांचा अर्थ न विचारता, फक्त अक्षरांची शोभा पाहून इंद्रियांचे समाधान होईल.




    ओवी २०७
    बुद्धीचिया जिभा।

    बोलाचा न चाखतां गाभा।
    अक्षरांचिया भांबा।
    इंद्रियें जिती ॥ २०७ ॥
    अहो असे पहा की मालतीच्या कळ्या नाकाला खरोखर सुगंधाने बर्‍या वाटल्या. पण त्यांच्या वरच्या शोभेने डोळे सुखी होत नाहीत काय? ॥७-२०८॥
    अर्थ: मालतीच्या कळ्यांचा सुगंध नाकाला छान वाटतो, पण त्यांच्या शोभेने डोळ्यांचे समाधान होत नाही.




    ओवी २०८
    पहा पां मालतीचे कळे।

    घ्राणासि कीर वाटले परिमळें।
    परि वरचिला बरवा काइ डोळे।
    सुखिये नव्हती? ॥ २०८ ॥
    त्याप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रिये राज्य करतील व मग प्रमेयाच्या (सिद्धांताच्या) गावाला त्यास चांगल्या तयारीने जाता येईल. ॥७-२०९॥
    अर्थ: मराठी भाषेच्या सौंदर्यामुळे इंद्रियांचे समाधान होईल, त्यामुळे सिद्धांताच्या गावी चांगल्या तयारीने जाता येईल.




    ओवी २०९
    तैसें देशियेचिया हवावा।

    इंद्रियें करिती राणिवा।
    मग प्रमेयाचिया गांवा।
    लेसां जाइजे ॥ २०९ ॥
    जेथे शब्द नाहीसा होतो ते बोलणे अशा सुंदर रीतीने मी सांगेन, ते तुम्ही ऐका असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. ॥७-२१०॥
    अर्थ: ज्ञानदेव सांगतात की शब्द नसलेल्या बोलण्याचे सुंदर रूप तुम्ही ऐका.




    ओवी २१०
    ऐसेनि नागरपणें।
    बोलु निमे तें बोलणें।
    ऐका ज्ञानदेवो म्हणे।
    निवृत्तीचा ॥ २१० ॥
    जेथे शब्द नाहीसा होतो ते बोलणे अशा सुंदर रीतीने मी सांगेन, ते तुम्ही ऐका असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. ॥७-२१०॥
    अर्थ: ज्ञानदेव बोलण्यात शब्द नसताना सुंदरता कशी आहे हे तुम्हाला सांगतील.



    सार्थ ज्ञानेश्वरी

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा:(Sarth Dnyaneshwari...

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चवथा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सहावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सातवा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय आठवा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...