मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.

    सार्थ ज्ञानेश्वरी

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा

    ​ओवी १

    संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि।
    यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्।
    अर्थ: अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, कर्माचा त्याग करावा असे तू सांगतोस आणि पुन्हा कर्मांचे अनुष्ठान करावे असेही तू सांगतोस. या दोहोंपैकी खरोखर तुझ्या मताने जे श्रेयस्कर असेल ते सांग.


    मग पार्थु श्रीकृष्णातें म्हणे। हां हो हें कैसें तुमचें बोलणें।
    एक होय तरी अंतःकरणें। विचारूं ये।
    अर्थ: मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, अहो हे असे कसे तुमचे बोलणे? यात एकवाक्यता असेल तर त्यासंबंधाने काही विचार करता येईल.




    ओवी २

    मागां सकळ कर्माचा सन्यासु। तुम्हींचि निरोपिला होता बहुवसु।
    तरी कर्मयोगीं केवीं अतिरसु। पोखीतसां पुढती?
    अर्थ: सर्व कर्मांचा त्याग करावा असे तुम्हीच मागे पुष्कळ रीतीने सांगितले होते. तर आता कर्मयोगाविषयीच्या भराला जास्त उत्तेजन का देता?




    ओवी ३

    ऐसें द्व्यर्थ हें बोलतां। आम्हां नेणतयांच्या चित्ता।
    आपुलिये चाडें श्रीअनंता। उमजु नोहे।
    अर्थ: श्रीअनंता (कृष्णा), असे हे दुटप्पी बोलले असता आमच्यासारख्या अल्पसमजुतीच्या लोकांच्या मनाला पाहिजे तसा उलगडा होत नाही.




    ओवी ४

    ऐकें एकसारातें बोधिजे। तरी एकनिष्ठचि बोलिजे।
    हें आणिकीं काय सांगिजे। तुम्हांप्रति।
    अर्थ: ऐक. एक तत्व जर सांगावयाचे असेल तर एकच निश्चित सांगितले पाहिजे, हे तुम्हाला दुसर्‍यांनी सांगवयास पाहिजे काय?




    ओवी ५

    तरी याचिलागीं तुमतें। म्यां राउळासि विनविलें होतें।
    जे हा परमार्थु ध्वनितें। न बोलावा।
    अर्थ: एवढ्यासाठी मी आपल्यासारख्या श्रेष्ठांना विनंती केली होती की हे तत्वज्ञान संदिग्ध भाषेत सांगू नये.




    ओवी ६

    परी मागील असो देवा। आतां प्रस्तुतीं उकलु देखावा।
    सांगें दोहींमाजि बरवा। मार्गु कवण।
    अर्थ: परंतु देवा, मागे झाले ते राहू द्या. आता ह्यावेळी उलगडा करा आणि या दोन मार्गांपैकी चांगला कोणता ते सांगा.




    ओवी ७

    जो परिणामींचा निर्वाळा। अचुंबितु ये फळा।
    आणि अनुष्ठितां प्रांजळा। सावियाचि।
    अर्थ: ज्याचा शेवट शुद्ध असून ज्याचे फळ अचूक प्राप्त होते व ज्याचे अनुष्ठान सहजच सरळ आहे.




    ओवी ८

    जैसें निद्रेचें सुख न मोडे। आणि मार्गु तरी बहुसाल सांडे।
    तैसें सोहोकासन सांगडें। सोहपें होय।
    अर्थ: ज्याप्रमाणे झोपेच्या सुखात व्यत्यय न येता रस्ता तर पुष्कळ काटत जातो अशा सुखकारक वाहना सारखा जो सोईचा मार्ग असेल तो सांगा.




    ओवी ९

    येणें अर्जुनाचेनि बोलें। देवो मनीं रिझले।
    मग होईल ऐकें म्हणितलें। संतोषोनियां।
    अर्थ: ह्या अर्जुनाच्या बोलण्याने देव मनात खूष झाले. मग संतुष्ट होऊन म्हणाले, ऐक तसेही होईल.




    ओवी १०

    देखा कामधेनु अशी माये। सदैवा जया होये।
    तो चंद्रुही परी लाहे। खेळावया।
    अर्थ: पाहा ज्या दैववानाला कामधेनुसारखी आई मिळते त्याला चंद्र पण तो सुद्धा खेळावयास मिळतो.




    ओवी ११

    पाहे पां श्रीशंभूची प्रसन्नता। तया उपमन्यूचिया आर्ता।
    काय क्षीराब्धि दूधभाता। देइजेचिना?
    अर्थ: हे पहा, शंकरांनी प्रसन्न होऊन त्या उपमन्यूच्या इच्छेप्रमाणे त्याला दूधभाताकरता क्षीरसमुद्र दिला नाही का?




    ओवी १२

    तैसा औदार्याचा कुरुठा। श्रीकृष्णु आपु जाहलिया सुभटा।
    कां सर्व सुखांचा वसौटा। तोचि नोहावा।
    अर्थ: त्याप्रमाणे उदारपणाचे घर जो श्रीकृष्ण, तो अर्जुनाच्या स्वाधीन झाल्यावर मग तो अर्जुन सर्व सुखांचे वसतीस्थान का होऊ नये?




    ओवी १३

    एथ चमत्कारु कायसा। गोसावी श्रीलक्ष्मीकांतासा।
    आतां आपुलिया सवेसा। मागावा कीं।
    अर्थ: यात आश्चर्य कसले? लक्ष्मीकांतासारखा मालक मिळाला असतांना आता आपल्याला हवे तसे त्याने का मागून घेऊ नये?




    ओवी १४

    म्हणौनि अर्जुनें म्हणितलें। तें हांसोनि येरें दिधलें।
    तेंचि सांगेन बोलिलें। काय कृष्णें।
    अर्थ: म्हणून अर्जुनाने जे मागितले ते श्रीकृष्णांनी प्रसन्न होऊन दिले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रीकृष्ण जे काय म्हणाले ते मी सांगेन.



    ओवी १५
    तो म्हणे गा कुंतीसुता । हे संन्यासयोगु विचारितां ।
    मोक्षकरु तत्त्वता । दोनीही होती ॥ १५ ॥

    अर्थ
    श्रीकृष्ण म्हणाले – अर्जुना, हे संन्यास व कर्मयोग विचार करून पाहिले तर तात्विक दृष्ट्या दोन्ही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. ॥ १५ ॥


    ओवी १६

    तरी जाणानेणा सकळां। हा कर्मयोगु कीर प्रांजळा।
    जैसी नाव स्त्रियां बाळां। तोयतरणीं।
    अर्थ: तरी पण जाणते व नेणते या सगळ्यांना हा निष्काम कर्मयोग आचरण्याला सरळ आहे. ज्याप्रमाणे पाण्यातून तरून जाण्याला स्त्रियांना व बालकांना होडी हे सुलभ साधन आहे त्याप्रमाणे भवसागरातून तरून जाण्यास हा कर्मयोग साधन आहे.




    ओवी १७

    तैसें सारासार पाहिजे। तरी सोहपा हाचि देखिजे।
    येणें संन्यासफळ लाहिजे। अनायासें।
    अर्थ: त्याचप्रमाणे सारासाराचा विचार केला तर हाच सोपा दिसतो. याने कर्माच्या संन्यासापासून मिळणार्‍या फलाची प्राप्ती कष्टावाचून होते.




    ओवी १८

    आतां याचिलागीं सांगेन। तुज संन्यासियाचें चिन्ह।
    मग सहजें हें अभिन्न। जाणसी तूं।
    अर्थ: आता एवढ्याकरता मी तुला कर्मसंन्यास करणाराचे लक्षण सांगेन, मग हे दोन्ही मार्ग सहजच एक आहेत असे तू जाणशील.





    ओवी १९

    तरी गेलियाची से न करी। न पवतां चाड न धरी।
    जो सुनिश्चळु अंतरीं। मेरु जैसा।
    अर्थ: तरी गत गोष्टींची जो आठवण धरत नाही, काही मिळाले तर त्याची इच्छा करत नाही, जो मेरु पर्वताप्रमाणे अंत:करणात अगदी अचळ असतो.




    ओवी २०

    आणि मी माझें ऐसी आठवण। विसरलें जयाचें अंतःकरण।
    पार्था तो संन्यासी जाण। निरंतर।
    अर्थ: आणि ज्याच्या अंत:करणात मी व माझे यांचे स्मरण राहिलेले नाही. अर्जुना तो सदोदित संन्यासीच आहे हे जाणावे.




    ओवी २१

    जो मनें असा जाहला। संगीं तोचि सांडिला।
    म्हणौनि सुखें सुख पावला। अखंडित।
    अर्थ: ज्याच्या मनाची अशी तयारी झाली, त्याला संगच सोडून जातात, म्हणून त्याला शाश्वत सुखाची अनायासे प्राप्ती होते.




    ओवी २२

    आतां गृहादिक आघवें। तें कांहीं नलगे त्यजावें।
    जे घेतें जाहलें स्वभावें। निःसंगु म्हण‍ऊनि।
    अर्थ: अशा स्थितीत घर वगैरे सर्वांचा त्याग करण्याची काही जरुरी नाही. कारण त्यांची आसक्ती घेणारे मन तेच स्वभावत: नि:संग झाले आहे म्हणून.




    ओवी २३

    देखें अग्नि विझोनि जाये। मग जे राखोंडी केवळु होये।
    तैं ते कापुसें गिंवसूंये। जियापरी।
    अर्थ: पाहा अग्नी विझून गेल्यावर मग जो राखेचा ढेपसा शिल्लक रहातो तेव्हा त्याला कापसामधे सुद्धा ज्याप्रमाणे गुंडाळून ठेवता येते.




    ओवी २४

    तैसा असतेनि उपाधी। नाकळिजे तो कर्मबंधीं।
    जयाचिये बुद्धी। संकल्पु नाहीं।
    अर्थ: त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत संकल्प नाहीत तो परिवारात असून सुद्धा कर्मबंधात पडत नाही.



    ओवी २५

    म्हणोनि कल्पना जैं सांडे। तैंचि गा संन्यासु घडे।
    इयें कारणें दोनी सांगडे। संन्यासयोगु।
    अर्थ: म्हणून ज्यावेळेला कल्पना सुटते त्याच वेळेला संन्यास घडतो. या कारणाने कर्मसंन्यास व कर्मयोग दोन्ही सारखेच आहेत.




    ओवी २६

    एर्‍हवीं तरी पार्था। जे मूर्ख होती सर्वथा।
    ते सांख्ययोगुसंस्था। जाणती केवीं?
    अर्थ: एरव्ही अर्जुना, जे पूर्णपणे अज्ञानी आहेत ते सांख्ययोग व कर्मयोग यातील भेद कसे जाणतील?



    ओवी २७
    सहजें ते अज्ञान । म्हणोनि म्हणती ते भिन्न ।
    एर्‍हवीं दीपाप्रति काई आनान । प्रकाशु आहाती ?
    अर्थ: ते स्वभावत:च मूर्ख असतात. म्हणून या दोन मार्गांना भिन्न समजतात. नाही तर प्रत्येक दिव्याचा प्रकाश काय वेगवेगळा आहे काय?




    ओवी २८

    सहजें ते अज्ञान। म्हणोनि म्हणती ते भिन्न।
    एर्‍हवीं दीपाप्रति काई आनान। प्रकाशु आहाती?
    अर्थ: ते स्वभावत:च मूर्ख असतात. म्हणून या दोन मार्गांना भिन्न समजतात. नाही तर प्रत्येक दिव्याचा प्रकाश काय वेगवेगळे आहेत काय?



    ओवी २९

    पैं सम्यक् येणें अनुभवें। जिहीं देखिलें तत्त्व आघवें।
    तें दोहींतेंही ऐक्यभावें। मानिती गा।
    अर्थ: एकाचेच चांगले आचरण करून ज्यांनी संपूर्ण तत्व समजावून घेतले ते दोघांनाही एकच रूपाने समजतात.




    ओवी ३०

    यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते।
    एकं साख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति।
    अर्थ: सांख्य मार्गाने जाणार्‍यांना जे मोक्षरूपी स्थान प्राप्त होते तेच निष्काम कर्मयोगाचे अनुष्ठान करणारांनाही प्राप्त होते. सांख्य व कर्मयोग हे एक आहेत असे जाणणारा खरा ज्ञाता होय.




    ओवी ३१

    आणि सांख्यीं जें पाविजे। तेंचि योगीं गमिजे।
    म्हणोनि ऐक्य दोहींतें सहजें। इयापरी।
    अर्थ: आणि सांख्य मार्गाने जे मिळते तेच योगाने प्राप्त होते. अशा रीतीने या दोन मार्गात सहजच एकता आहे.




    ओवी ३०

    देखें आकाशा आणि अवकाशा। भेदु नाहीं जैसा।
    तैसें ऐक्य योगसंन्यासा। वोळखे जो।
    अर्थ: पाहा आकाश आणि पोकळी यांच्यामधे ज्याप्रमाणे भिन्नता नाही त्याप्रमाणे कर्मयोग व आणि सांख्ययोग यांची एकता ज्याला पटलेली असते.




    ओवी ३१
    तयासींचि जगीं पाहलें । आपणपें तेणेंचि देखिलें ।
    जया सांख्ययोग जाणवले । भेदेंविण ॥
    ज्याला सांख्य व कर्मयोग अभिन्नतेने पटले त्यालाच जगात उजाडले, ज्ञानप्राप्ती झाली व त्यानेच आत्मस्वरूप पाहिले.




    ओवी ३२
    जो युक्तिपंथें पार्था । चढे मोक्षपर्वता ।
    तो महासुखाचा निमथा । वहिला पावे ॥
    अर्जुना, जो निष्काम कर्म करण्याची हातवटीरूपी रस्त्याने मोक्षरूप पर्वतावर चढतो, तो परमानंदरूप शिखर त्वरेने गाठतो.




    ओवी ३३
    येरा योगस्थिति जया सांडे । तो वायांचि गा हव्यासीं पडे ।
    परि प्राप्ति कहीं न घडे । संन्यासाची ॥
    त्याहून दुसरा, ज्याचे हातून कर्मयोगाचे अनुष्ठान होत नाही, तो व्यर्थच (संन्यासाच्या) छंदात पडतो. परंतु त्याला संन्यासाची प्राप्ती कधीच होत नाही.




    ओवी ३४
    जेणें भ्रांतीपासूनि हिरतलें । गुरुवाक्यें मन धुतलें ।
    मग आत्मस्वरूपीं घातलें । हरौनियां ॥
    ज्याने भ्रमापासून हिरावून घेतलेले आपले मन गुरूपदेशाने स्वच्छ करून आत्मस्वरूपात मुरवून ठेवले.





    ओवी ३५
    जैसें समुद्रीं लवण न पडे । तंव वेगळें अल्प आवडे ।
    मग होय सिंधूचि एवढें । मिळे तेव्हां ॥
    ज्याप्रमाणे समुद्रात मीठ पडले नाही तोपर्यंत ते मर्यादित असे दिसते, मग ज्यावेळी समुद्राशी त्याचा योग होतो, त्यावेळी ते समुद्राएवढे होते.





    ओवी ३६
    तैसें संकल्पोनि काढिलें । जयाचें मनचि चैतन्य जाहलें ।
    तेणें एकदेशियें परी व्यापिलें । लोकत्रय ॥
    त्याप्रमाणे संकल्पापासून दूर गेल्यामुळे ज्याचे चित्त चिद्रूप झाले तो मर्यादित दिसत असला तरी त्याने तिन्ही लोक व्यापले आहेत. असे समज.




    ओवी ३७
    आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटलें तया स्वभावें ।
    आणि करी जर्‍ही आघवें । तर्‍ही अकर्ता तो ॥
    आता कर्ता-कर्म-कार्य हा त्रिपुटीचा व्यवहार स्वभावत:च बंद पडतो, आणि यावर त्याने सर्व जरी केले तरी तो तत्वत: त्याचा कर्ता होत नाही.




    ओवी ३८जे पार्था तया देहीं । मी ऐसा आठऊ नाहीं ।
    तरी कर्तृत्व कैचैं काई । उरे सांगें ?
    कारण अर्जुना त्याच्या ठिकाणी ‘मी देह’ अशी आठवणच नसते. तर मग कर्तेपणा कोठचा ? तो कर्तेपणा तेथे राहील काय ? सांग.



    ओवी ३९
    ऐसें तनुत्यागेंवीण । अमूर्ताचे गुण ।
    दिसती संपूर्ण । योगयुक्तां ॥
    याप्रमाणे शरीराचा त्याग केल्याशिवाय अव्यक्त परमात्म्याचे सर्व स्वभाव त्या कर्मयोग्याच्या ठिकाणी स्पष्टपणे अनुभवास येतात.




    ओवी ४०
    एर्‍हवीं आणिकांचिये परी । तोही एक शरीरी ।
    अशेषाही व्यापारीं । वर्ततु दिसे ॥
    एरवी तोही इतर लोकांप्रमाणे शरीरात असून, सर्व व्यवहार करीत असतांना दिसतो.




    ओवी ४१
    तोही नेत्रीं पाहे । श्रवणीं ऐकतु आहे ।
    परि तेथींचा सर्वथा नोहे । नवल देखें ॥
    तो देखील इतर लोकांसारखा डोळ्यांनी पहातो, कानांनी ऐकतो, परंतु आश्चर्य पहा की तो त्या व्यवहारात मुळीच लिप्त होत नाही.



    ओवी ४२
    स्पर्शासि तरी जाणे । परिमळु सेवी घ्राणें ।
    अवसरोचित बोलणें । तयाहि आथी ॥
    तो इतरांसारखा स्पर्शासही समजतो, नाकाने गंधाचा अनुभव घेतो व समयोचित बोलण्याचा व्यवहारही त्याच्याकडून घडतो.




    ओवी ४३
    आहारातें स्वीकारी । त्यजावें तें परिहरी ।
    निद्रेचिया अवसरीं । निदिजे सुखें ॥
    आहाराचे सेवन करतो, टाकायचे ते टाकतो व झोपेच्या वेळेला समाधानाने झोप घेतो.




    ओवी ४४
    आपुलेनि इच्छावशें । तोही गा चालतु दिसे ।
    पैं सकळ कर्म ऐसें । रहाटे कीर ॥
    तो आपल्या इच्छेनुरूप चालतांना दिसतो. असे तो सर्व कर्मांचे खरोखर आचरण करतो.




    ओवी ४५
    हें सांगों काई एकैक । देखें श्वासोच्छ्वासादिक ।
    आणि निमिषोन्निमिष । आदिकरूनि ॥
    हे एकेक काय सांगावे ? पहा, श्वास घेणे व सोडणे, आणि पापण्यांची उघडझाप करणे इत्यादी कर्मे.




    ओवी ४६पार्था तयाचे ठायीं । हें आघवेंचि आथि पाहीं ।
    परी तो कर्ता नव्हे कांहीं । प्रतीतिबळें ॥ ४६ ॥
    अर्थ: अर्जुन त्याच्या ठिकाणी सर्वच असतात असे समजतो. परंतु तो आपल्या अनुभवाच्या सामर्थ्यावर ह्यांचा कर्ता मुळीच होत नाही.




    ओवी ४७
    जैं भ्रांतिसेजे सुतला । तैं स्वप्नसुखें भुतला ।
    मग तो ज्ञानोदयीं चेइला । म्हणौनियां ॥ ४७ ॥
    अर्थ: ज्यावेळी भ्रांतिरूप अंथरुणावर झोपला होता त्यावेळी तो स्वप्नाच्या सुखाने घेरला होता, मग ज्ञानाचा उदय झाला असतांना जागा झाला म्हणून तो आपल्याला कर्ता समजत नाही.




    ओवी ४८
    आतां अधिष्ठानसंगती । अशेषाही इंद्रियवृत्ती ।
    आपुलालिया अर्थीं । वर्तत आहाती ॥ ४८ ॥
    अर्थ: आता चैतन्याच्या आश्रयाने सर्वेंद्रियांच्या वृत्ती आपापल्या विषयाकडे धाव घेत असतात.




    ओवी ४९
    दीपाचेनि प्रकाशें । गृहींचे व्यापार जैसे ।
    देहीं कर्मजात तैसे । योगयुक्ता ॥ ४९ ॥
    अर्थ: दिव्याच्या उजेडावर घरातील सर्व व्यवहार चालतात, त्याप्रमाणे ज्ञानाच्या आश्रयाने योगयुक्तांची सर्व कर्मे देहात चालतात.




    ओवी ५०
    तो कर्में करी सकळें । परी कर्मबंधा नाकळे ।
    जैसें न सिंपे जळीं जळें । पद्मपत्र ॥ ५० ॥
    अर्थ: ज्याप्रमाणे कमलाचे पान पाण्यात असून पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो सर्व कर्मे करतो, परंतु धर्माधर्मरूप कर्मबंधाने आकळला जात नाही.




    ओवी ५१
    देखैं बुद्धीची भाष नेणिजे । मनाचा अंकुर नुदैजे ।
    ऐसा व्यापारु तो बोलिजे । शारीरु गा ॥ ५१ ॥
    अर्थ: पहा जे कर्म बुद्धीला समजण्याचे पूर्वी व मनात विचार उद्भवण्याच्या अगोदर होते त्या व्यवहाराला कायिक व्यवहार म्हणतात.




    ओवी ५२
    हेंच मराठे परियेशीं । तरी बाळकाची चेष्टा जैशी ।
    योगिये कर्में करिती तैशीं । केवळा तनु ॥ ५२ ॥
    अर्थ: हेच स्पष्ट पाहिजे असेल तर ऐक. ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाची हालचाल असते त्याप्रमाणे योगी केवळ शरीरानेच कर्म करतात.




    ओवी ५३
    मग पांचभौतिक संचलें । जेव्हां शरीर असे निदेलें ।
    तेथ मनचि रहाटें एकलें । स्वप्नीं जेवीं ॥ ५३ ॥
    अर्थ: शरीर हे पाच भूतांचे बनलेले असते, त्यावेळेला ज्याप्रमाणे एकटे मनच स्वप्नात व्यवहार करते.




    ओवी ५४
    नवल ऐकें धनुर्धरा । कैसा वासनेचा पसारा ।
    देहा होऊं नेदी उजगरा । परी सुखदुःखें भोगी ॥ ५४ ॥
    अर्थ: अर्जुना, एक आश्चर्य पहा. या वासनेचा विस्तार केवढा आहे ! ती देहाला जागे होऊ देत नाही पण सुखदु:खाचा भोग भोगवते.




    ओवी ५५
    इंद्रियांच्या गांवीं नेणिजे । ऐसा व्यापारु जो निपजे ।
    तो केवळु गा म्हणिजे । मानसाचा ॥ ५५ ॥
    अर्थ: इंद्रियांना ज्यांचा पत्ता नसतो, असे जे कर्म उत्पन्न होते त्याला केवळ मानसिक कर्म म्हणतात.




    ओवी ५६
    योगिये तोही करिती । परी कर्में तें न बंधिजती ।
    जे सांडिली आहे संगती । अहंभावाची ॥ ५६ ॥
    अर्थ: योगी तेही कर्म करतात, पण त्या कर्माने बांधले जात नाहीत. कारण त्यांनी अहंकाराची संगती टाकलेली असते.




    ओवी ५७
    आतां जाहालिया भ्रमहत । जैसें पिशाचाचें चित्त ।
    मग इंद्रियांचें चेष्टित । विकळु दिसे ॥ ५७ ॥
    अर्थ: आता ज्याप्रमाणे भूतांचा संचार झाल्यामुळे चित्त भ्रमाच्या स्वाधीन झाल्यावर मग संचार झालेल्या माणसाच्या इंद्रियांच्या क्रिया अमेळ दिसतात.




    ओवी ५८
    स्वरूप तरी देखे । आळविलें आइके ।
    शब्दु बोले मुखें । परी ज्ञान नाहीं ॥ ५८ ॥
    अर्थ: त्यास रूप तर दिसते, हाका मारलेले ऐकू येते, तो तोंडाने शब्दाचा उच्चारही करतो परंतु हे सर्व केल्याची त्यास जाणीव नसते.




    ओवी ५९
    हें असो काजेंविण । जें जें कांहीं करण ।
    तें केवळ कर्म जाण । इंद्रियांचें ॥ ५९ ॥
    अर्थ: हे राहू दे, तो प्रयोजनावाचूनच जे काही करतो ते सर्व केवळ इंद्रियाचे कर्म आहे असे समज.




    ओवी ६०
    मग सर्वत्र जें जाणतें । ते बुद्धीचें कर्म निरुतें ।
    ओळख अर्जुनातें । म्हणे हरी ॥ ६० ॥
    अर्थ: मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, सर्व ठिकाणी जाणण्याचे जे काम आहे, ते खरोखर बुद्धीचे आहे असे ओळख.



    ओवी ६१

    ते बुद्धी धुरे करुनी। कर्म करिती चित्त देऊनी।
    परी ते नैष्कर्म्यापासुनी। मुक्त दिसती।
    अर्थ: ते बुद्धीच्या प्रामुख्याने मन:पूर्वक कर्मे करतात, पण ते कर्मयोगी नैष्कर्म्य स्थितीस प्राप्त झालेल्या पुरुषापेक्षाही मुक्त दिसतात.




    ओवी ६२

    जें बुद्धीचिये ठावूनि देही। तयां अहंकाराची सेचि नाहीं।
    म्हणौनि कर्म करितां पाहीं। चोखाळले।
    अर्थ: कारण त्यांच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत कोठेही अहंकाराचे स्मरणच नसते. म्हणून अशा कर्माचे आचरण करीत असताही ते शुद्धच असतात असे समज.




    ओवी ६३

    अगा करितेनवीण कर्म। तेंचि तें नैष्कर्म्य।
    हें जाणती सुवर्म। गुरुगम्य जें।
    अर्थ: अर्जुना, कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेले जे कर्म तेच निष्कर्म होय. ही गुरूकडून कळणारी मर्माची गोष्ट प्राप्तपुरुष समजतात.



    ओवी ६४

    आतां शांतरसाचें भरितें। सांडीत आहे पात्रातें।
    जें बोलणें बोलापरौतें। बोलवलें।
    अर्थ: आता शांतरसाचा पूर मर्यादा सोडून उचंबळत आहे. कारण बोलण्याच्या पलीकडील गोष्टींचे व्याख्यान करता आले.




    ओवी ६५

    एथ इंद्रियांचा पांगु। जया फिटला आहे चांगु।
    तयासीचि आथि लागु। परिसावया।
    अर्थ: ज्यांचा इंद्रियांविषयींचा पराधीनपणा चांगल्या तर्‍हेने नाहीसा झाला आहे, त्यांनाच हे ऐकण्याची योग्यता आहे.




    ओवी ६६

    हा असो अतिप्रसंगु। न संडी पां कथालागु।
    होईल श्लोकसंगति भंगु। म्हणौनियां।
    अर्थ: (या ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्यावर संत श्रोते म्हणतात) हे विषयांतर करणे पुरे. कथेचा संबंध सोडू नकोस. कारण तसे करण्याने श्लोकसंगतीचा बिघाड होईल.




    ओवी ६७

    जें मना आकळितां कुवाडें। घाघुसितां बुद्धी नातुडे।
    तें दैवाचेनि सुरवाडें। सांगवलें तुज।
    अर्थ: जे मनाने आकलन करणे कठिण आहे, घासाघीस केली तरी बुद्धीला जे प्राप्त होत नाही, ते दैवाच्या अनुकूलतेने तुला सहज सांगता आले.




    ओवी ६८

    जें शब्दातीत स्वभावें। तें बोलींचि जरी फावे।
    तरी आणिकें काय करावें। कथा सांगैं।
    अर्थ: जे स्वभावत: शब्दाच्या पलीकडचे आहे, ते बोलण्यात सापडले तर इतरांचे काय प्रयोजन? तेव्हा तू श्रीकृष्ण संवादाची चाललेली कथा सांग




    ओवी ६९

    हा आर्तिविशेषु श्रोतयांचा। जाणोनि दास निवृत्तीचा।
    म्हणे संवादु दोघांचा। परिसोनि परिसा।
    अर्थ: श्रोत्यांची अशी ही अतिशय उत्कंठा जाणून निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, कृष्ण व अर्जुन या दोघात चाललेले हे संभाषण एवढा वेळ ऐकले ते लक्षात देऊन यापुढे ऐका.




    ओवी ७०

    मग श्रीकृष्ण म्हणे पार्थातें। आतां प्राप्ताचें चिन्ह पुरतें।
    सांगेन तुज निरुतें। चित्त देईं।
    अर्थ: मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आता तुला कृतकृत्य झालेल्या पुरषाचे चिन्ह संपूर्ण सांगेन. तू चांगले लक्ष दे.



    ओवी ७१:तरी आत्मयोगें आथिला। जो कर्मफळाशीं विटला।
    तो घर रिघोनि वरिला। शांति जगी॥
    अर्थ: तरी ज्ञानयोगाने जो संपन्न झाला आहे आणि ज्याला कर्मफलाचा वीट आलेला आहे त्याला या जगात शांती घरात घुसून वरते.




    ओवी ७२:
    येरु कर्मबंधें किरीटी। अभिलाषाचिया गांठीं।
    कळासला खुंटी। फळभोगाच्या॥
    अर्थ: अर्जुना त्याहून दुसरा प्रपंची कर्माच्या बंधामुळे अभिलाषेच्या दाव्याने फलभोगाच्या खुंट्याला बांधला जातो.




    ओवी ७३:
    जैसा फळाचिये हांवें। तैसें कर्म करी आघवें।
    मग न कीजेचि येणें भावें। उपेक्षी जो॥
    अर्थ: फलाची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणे तो सर्व कर्मे करतो आणि नंतर आपल्या हातून ती गोष्ट घडलीच नाही अशा अकर्तेपणाच्या समजुतीने त्याविषयी उदासीन रहातो.



    ओवी ७४:
    तो जयाकडे वासु पाहे। तेउती सुखाची सृष्टि होये।
    तो म्हणे तेथ राहे। महाबोधु॥
    अर्थ: तो जिकडे पाहतो तिकडे सुखमय सृष्टी होते आणि तो जेथे सांगेल तेथे महाबोध नांदतो.



    ओवी ७५:
    नवद्वारे देहीं। तो असतुचि परि नाहीं।
    करितुचि न करी कांहीं। फलत्यागी॥
    अर्थ: नव छिद्रांच्या देहामध्ये वागत असूनही त्याचे देहाशी तादात्म्य नसते. तो फलांचा त्याग करणारा कर्मे करीत असताही (परिणामाच्या दृष्टीने पाहिले असता) काहीच करत नाही.





    ओवी ७६:
    जैसा कां सर्वेश्वरू। पाहिजे तंव निर्व्यापारु।
    परि तोचि रची विस्तारु। त्रिभुवनाचा॥
    अर्थ: ज्याप्रमाणे सर्वेश्वर जर पाहिला तर तो वस्तुत: क्रियाशून्य असतो, परंतु तोच तिन्ही लोकांच्या विस्ताराची रचना करतो.




    ओवी ७७:
    आणि कर्ता ऐसें म्हणिपे। तरी कवणें कर्मीं न शिंपें।
    जे हातुपावो न लिंपे। उदासवृत्तीचा॥
    अर्थ: आणि त्यास कर्ता असे म्हणावे, तर तो कोणत्याही कर्मात लिप्त होत नाही. कारण त्याच्या ठिकाणी असणार्‍या उदासीनतेचा कोणताही अवयव अशुद्ध होत नाही.




    ओवी ७८:
    योगनिद्रा तरी न मोडे। अकर्तेपणा सळु न पडे।
    परी महाभूतांचें दळवाडें। उभारी भले॥
    अर्थ: त्याच्या सहज स्थितीचा तर भंग होत नाही व त्याचा अकर्तेपणा चोळवटत नाही असे असूनही तो महाभूतांचे समुदाय चांगल्या तर्‍हेने उत्पन्न करतो.




    ओवी ७९:
    जगाच्या जीवीं आहे। परी कवणाचा कहीं नोहे।
    जगचि हें होय जाये। तो शुद्धीहि नेणे॥
    अर्थ: तो जगातील सर्व प्राण्यांना व्यापून असतो. परंतु केव्हाही कोणाचीही आसक्ती धरत नाही. हे जग उत्पन्न होते व नाहीसे होते ह्याची त्य़ास खबरही नसते.




    ओवी ८०:
    पापपुण्यें अशेषें। पासींचि असतु न देखें।
    आणि साक्षीही होऊं न ठके। येरी गोठी कायसी?॥
    अर्थ: प्राणिमात्राकडून होणारी संपूर्ण पापपुण्ये ही त्याच्या अगदी जवळ असतात, तरी तो त्यांना जणत नाही फार काय तो त्यांचा साक्षीही होऊन रहात नाही.




    ओवी ८१:
    पैं मूर्तीचेनि मेळें। तो मूर्तचि होऊनि खेळे।
    परि अमूर्तपण न मैळे। दादुलयाचें॥
    अर्थ: सगुण स्वरूपाच्या संगतीने तो सगुण होऊन क्रीडा करतो, परंतु त्या समर्थाच्या निर्गुणपणाला भ्रष्टता येत नाही.




    ओवी ८२:
    तो सृजी पाळी संहारी। ऐसें बोलती जे चराचरीं।
    तें अज्ञान गा अवधारीं। पंडुकुमरा॥
    अर्थ: तो उत्पन्न करतो, पालन करतो, असे त्याच्या कर्तृत्वाविषयी सर्व लोकात वर्णन होते. अर्जुना ऐक. ते केवळ अज्ञान आहे.




    ओवी ८३:

    तें अज्ञान जैं समूळ तुटे। तै भ्रांतीचें मसैरें फिटे।
    मग अकर्तृत्व प्रगटे। मज ईश्वराचें॥
    अर्थ: ते अज्ञान ज्या वेळेला संपूर्ण नाहीसे होते, त्यावेळेला भ्रांतिरूप काजळी दूर होते आणि मग ईश्वराचे अकर्तृत्व प्रतीतीला येते.




    ओवी ८४:
    एथ ईश्वरु एकु अकर्ता। ऐसें मानलें जरी चित्ता।
    तरी तोचि मी हें स्वभावता। आदीचि आहे॥
    अर्थ: आणि ईश्वर एक अकर्ता आहे, असे जर चित्ताला पटले आणि मुळापासून स्वभावत: तोच (ईश्वरच) मी आहे. (तर मीही उघडच अकर्ता आहे)




    ओवी ८५:
    ऐसेनि विवेकें उदो चित्तीं। तयासी भेदु कैंचा त्रिजगतीं।
    देखें आपुलिया प्रतीति। जगचि मुक्त॥
    अर्थ: अशा विचाराने चित्तात उदय केला असता, त्याला तिन्ही लोकात भेद कशाचा? तो आपल्या अनुभवाने सर्व जगच मुक्त आहे असे पहातो.



    ओवी ८६:जैशी पूर्वजांची थांबली देखील। तैशी माझ्या जरी दृष्टी हती।
    तो सर्वांचा जरा ही न ठरती। जनश्रुतीं॥
    अर्थ: पूर्वजांची (गुंतागुंतीची) एकत्रित ज्ञान मिळाल्यावर देखील जरी माझी दृष्टि असेल, तरी हे सर्व ज्ञान थांबले की याचा ठराव न करता प्रवृत्त होते.




    ओवी ८७:
    संपत्तींचा नांदा श्रोता। भूषण, पाना, चौर्य, भंडार।
    मातीला जरी विरुद्ध चारा। हाती जरी नाहीं॥
    अर्थ: संपत्ति मिळवणारा प्रवृत्त होईल, थांबवून टाकले तरी आपली बुद्धी (श्रोत्) थांबेल; मातीच्या विरुद्ध चाऱ्याच्या हातात धरण्यात येणार नाही.




    ओवी ८८:
    कर्मत्यागी सुखराशी। तो बरेच काळ थांबता।
    मग फळा खाण्यास थांबता। अनीतिपणि॥
    अर्थ: कर्मांचा त्याग करणारा सुखराशीत साधलेला आहे, तो बरेच काळ थांबतो; नंतर फलभोग थांबतो, ते अनीतिपणाच्या गोष्टी आहे.




    ओवी ८९:
    पायांचें मुख्या खरे लोकां। असें येईल असे देखील।
    तिसरे ठिकाण तें साकेत। ओळखा।
    अर्थ: पायांची मूळ मानले जातात. ते पाहता, अगदी खरे लोक असले तरी तिसरे ठिकाण असले तरी साकेत जाणारा ओळखावा लागेल.




     

    ओवी ९०:
    परी दैव जैसें कवतिकें। कहींचि दैन्य न देखे।
    कां विवेकु हा नोळखे। भ्रांतीतें जेवीं॥
    अर्थ: परंतु ज्याप्रमाणे दैव हे लीलेने देखील केव्हाच दरिद्रतेला पहात नाही, त्याचप्रमाणे विचारही ओळखत नाही, तो भ्रांतीत असतो.

     



    ओवी ९१:नातरी अंधकाराची वानी। जैसा सूर्यो न देखे स्वप्नीं।
    अमृत नायके कानीं। मृत्युकथा॥
    अर्थ: ज्याप्रमाणे अंधकाराचा मासला सूर्याला स्वप्नातही दिसत नाही, त्याचप्रमाणे अमृताच्या कानावर मृत्यूची वार्ता येत नाही.




    ओवी ९२:
    हें असो संतापु कैसा। चंद्रु न स्मरे जैसा।
    भूतीं भेदु नेणती तैसा। ज्ञानिये ते॥
    अर्थ: हे राहू दे, उष्णता कशी असते हे ज्याप्रमाणे चंद्राला आठवूनही लक्षात येणार नाही, त्याचप्रमाणे ते ज्ञानी लोक प्राण्यांच्या ठिकाणी भेदाला जाणत नाही.




    ओवी ९३:
    मग हा मशकु हा गजु। कीं हा श्वपचु हा द्विजु।
    पैल इतरु हा आत्मजु। हें उरेल कें?॥
    अर्थ: मग त्यांचे ठिकाणी हे चिलट, आणि हा हत्ती, किंवा हा चांडाळ आणि हा ब्राह्मण, किंवा हा आपला मुलगा आणि हा पलिकडे असलेला परका, हा भेद कोठून उरणार?




    ओवी ९४:
    ना तरी हे धेनु हें श्वान। एक गुरु एक हीन।
    हें असो कैचें स्वप्न। जागतया॥
    अर्थ: अथवा ही गाय आणि हे कुत्रे अथवा एक थोर आणि एक नीच हे कोठले? हे राहू दे, जागा असलेल्याला स्वप्न कोठून पडणार?




    ओवी ९५:
    एथ भेदु तरी कीं देखावा। जरी अहंभाव उरला होआवा।
    तो आधींचि नाहीं आघवा। आतां विषमु काई॥
    अर्थ: जर अहंकार उरलेला असेल तरच भेदाची प्रतीती येईल. तो अहंकार तर अगोदरच सर्व नाहीसा झाला, आता भेदभाव कोठला?




    ओवी ९६:
    म्हणौनि सर्वत्र सदा सम। तें आपणचि अद्वय ब्रह्म।
    हें संपूर्ण जाणें वर्म। समदृष्टीचें॥
    अर्थ: म्हणून सर्व ठिकाणी सर्व काळ सारखे असणारे जे अद्वय ब्रह्म, तेच आपण आहोत हे समदृष्टीचे तत्व तो संपूर्णपणे जाणतो.




    ओवी ९७:
    जिहीं विषयसंगु न सांडितां। इंद्रियांतें न दंडितां।
    परी भोगिली निसंगता। कामनेविण॥
    अर्थ: ज्यांनी विषयांचा संबंध टाकला नाही आणि इंद्रियांना शासन केले नाही, परंतु एक आपले ठिकाणी इच्छा नसल्यामुळे ज्यांनी अलिप्तता भोगली.




    ओवी ९८:
    जिहीं लोकांचेनि आधारें। लौकिकेंचि व्यापारें।
    परि सांडिलें निदसुरें। लौकिकु हें॥
    अर्थ: जे लोकांना अनुसरून, लोक करतात त्याप्रमाणे व्यवहार करतात, परंतु ज्यांनी लोकांचे ठिकाणी असणार्‍या अज्ञानाचा त्याग केला आहे.




    ओवी ९९:
    जैसा जनामाजि खेचरु। असतुचि जना नोहे गोचरु।
    तैसा शरीरीं परी संसारु। नोळखे तयांतें॥
    अर्थ: ज्याप्रमाणे पिशाच जगात असून जगाला दिसत नाही, त्याप्रमाणे तो देहधारी असूनही संसारी लोक त्याला ओळखत नाहीत.




    ओवी १००:
    हें असो पवनाचेनि मेळें। जैसें जळींचि जळ लोळे।
    तें आणिकें म्हणती वेगळें। कल्लोळ हे॥
    अर्थ: हे राहू दे, वार्‍याच्या संगतीने ज्याप्रमाणे पाण्यावरच पाणी (लाटारूपाने) खेळते, (पण) लोक त्य़ास, ह्या लाटा पाण्याहून वेगळ्या आहेत असे म्हणतात.



    ओवी ९१नातरी अंधकाराची वानी । जैसा सूर्यो न देखे स्वप्नीं ।
    अमृत नायके कानीं । मृत्युकथा ॥
    अर्थ:किंवा अंधकाराचा मासला ज्याप्रमाणे सूर्याला स्वप्नातही दिसत नाही किंवा अमृताच्या कानावर मृत्यूची वार्ताही येत नाही.




    ओवी ९२
    हें असो संतापु कैसा । चंद्रु न स्मरे जैसा ।
    भूतीं भेदु नेणती तैसा । ज्ञानिये ते ॥
    अर्थ:हे राहू दे, उष्णता कशी असते हे ज्याप्रमाणे चंद्राला आठवूनही लक्षात येणार नाही, त्याप्रमाणे ते ज्ञानी लोक प्राण्यांच्या ठिकाणी भेदाला जाणत नाही.




    ओवी १८
    विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
    शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥
    अर्थ:विद्या व विनय यांनी युक्त असा ब्राह्मण, गाय, हत्ती, तसेच कुत्रा आणि चांडाल या सर्वांचे ठिकाणी त्या ज्ञानी पुरुषांची दृष्टी सारखीच असते.




    ओवी ९३
    मग हा मशकु हा गजु । कीं हा श्वपचु हा द्विजु ।
    पैल इतरु हा आत्मजु । हें उरेल कें ?
    अर्थ:मग त्यांचे ठिकाणी हे चिलट, आणि हा हत्ती, किंवा हा चांडाळ आणि हा ब्राह्मण, किंवा हा आपला मुलगा आणि हा पलिकडे असलेला परका, हा भेद कोठून उरणार?




    ओवी ९४
    ना तरी हे धेनु हें श्वान । एक गुरु एक हीन ।
    हें असो कैचें स्वप्न । जागतया ॥
    अर्थ:अथवा ही गाय आणि हे कुत्रे अथवा एक थोर आणि एक नीच हे कोठले ? हे राहू दे, जागा असलेल्याला स्वप्न कोठून पडणार?




    ओवी ९५
    एथ भेदु तरी कीं देखावा । जरी अहंभाव उरला होआवा ।
    तो आधींचि नाहीं आघवा । आतां विषमु काई ॥
    अर्थ:जर अहंकार उरलेला असेल तरच भेदाची प्रतीती येईल. तो अहंकार तर अगोदरच सर्व नाहीसा झाला आता भेदभाव कोठला?




    ओवी १९
    इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः ।
    निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः ॥
    अर्थ:अशा समदृष्टीने ज्यांचे मन स्थिर झाले आहे त्यांनी या लोकीच संसाराला जिंकले. कारण ब्रह्म (सर्व भूतांचे ठिकाणी) सम आहे व दोषरहित आहे व यासाठी ते ज्ञानी पुरुष ब्रह्माचे ठिकाणी निश्चल झालेले असतात.




    ओवी ९६
    म्हणौनि सर्वत्र सदा सम । तें आपणचि अद्वय ब्रह्म ।
    हें संपूर्ण जाणें वर्म । समदृष्टीचें ॥
    अर्थ:म्हणून सर्व ठिकाणी सर्व काळ सारखे असणारे जे अद्वय ब्रह्म तेच आपण आहोत हे जे समदृष्टीचे तत्व ते तो संपूर्णपणे जाणतो.




    ओवी ९७
    जिहीं विषयसंगु न सांडितां । इंद्रियांतें न दंडितां ।
    परी भोगिली निसंगता । कामनेविण ॥
    अर्थ:ज्यांनी विषयांचा संबंध टाकला नाही आणि इंद्रियांना शासन केले नाही, परंतु एक आपले ठिकाणी इच्छा नसल्यामुळे ज्यांनी अलिप्तता भोगली.




    ओवी ९८
    जिहीं लोकांचेनि आधारें । लौकिकेंचि व्यापारें ।
    परि सांडिलें निदसुरें । लौकिकु हें ॥
    अर्थ:जे लोकांना अनुसरून, लोक करतात त्याप्रमाणे व्यवहार करतात, परंतु ज्यांनी लोकांचे ठिकाणी असणार्‍या अज्ञानाचा त्याग केला आहे.




    ओवी ९९
    जैसा जनामाजि खेचरु । असतुचि जना नोहे गोचरु ।
    तैसा शरीरीं परी संसारु । नोळखे तयांतें ॥
    अर्थ:ज्याप्रमाणे पिशाच जगात असून जगाला दिसत नाही, त्याप्रमाणे तो देहधारी असूनही संसारी लोक त्याला ओळखत नाहीत.




    ओवी १००
    हें असो पवनाचेनि मेळें । जैसें जळींचि जळ लोळे ।
    तें आणिकें म्हणती वेगळें । कल्लोळ हे ॥
    अर्थ:हे राहू दे, वार्‍याच्या संगतीने ज्याप्रमाणे पाण्यावरच पाणी (लाटारूपाने) खेळते (पण) लोक त्य़ास, ह्या लाटा पाण्याहून वेगळ्या आहेत असे म्हणतात.




    ओवी १०१
    तैसें नाम रूप तयाचें । एर्‍हवीं ब्रह्मचि तो साचें ।
    मन साम्या आलें जयाचें । सर्वत्र गा ॥
    अर्थ:त्याप्रमाणे त्याचे नामरूपाची गोष्ट आहे. एरवी ज्याचे मन सर्व ठिकाणी साम्याला आलेले आहे, तो खरोखर ब्रह्मच आहे.




    ओवी १०२
    ऐसेनि समदृष्टी जो होये । तया पुरुषा लक्षणही आहे ।
    अर्जुना संक्षेपें सांगेन पाहें । अच्युत म्हणे ॥
    अर्थ:अशा तर्‍हेने जो समदृष्टीने असतो. त्या पुरुषाला लक्षण देखील आहे. अच्युत म्हणाले, अर्जुना, मी तुला ते थोडक्यात सांगतो, त्याचा तू विचार कर.




    ओवी १०३
    तरी मृगजळाचेनि पूरें । जैसें न लोटिजे कां गिरिवरें ।
    तैसा शुभाशुभीं न विकरे । पातलिया जो ॥
    अर्थ:मृगजलाच्या लोंढ्याने ज्याप्रमाणे मोठा पर्वत किंचितही ढकलला जात नाही, त्याप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असता ज्याच्यामधे विकार उत्पन्न होत नाहीत.




    ओवी १०४
    तोचि तो निरुता । समदृष्टी तत्त्वतां ।
    हरि म्हणे पंडुसुता । तोचि ब्रह्म ॥
    अर्थ:तोच खरोखर तात्विकदृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होय. कृष्ण म्हणाले अर्जुना, ब्रह्म ते तोच समज.




    ओवी १०५
    जया आपणपें सांडूनि कहीं । इंद्रियग्रामावरी येणेंचि नाहीं ।
    तो विषय न सेवी हें काई । विचित्र येथ ॥
    अर्थ: जो आत्मस्वरूपाला सोडून केव्हाही इंद्रियरूपी गावात येत नाही, (म्हणजे तो इंद्रियांशी तादात्म्य पावत नाही) तो विषयसेवन करत नाही, यात काय आश्चर्य आहे?




    ओवी १०६सहजें स्वसुखाचेनि अपारें । सुरवाडलेनि अंतरें ।
    रचिला म्हणौनि बाहिरें । पाउल न घाली ॥
    अर्थ: अपरिमित अशा स्वाभाविक असलेल्या आत्मसुखाच्या विपुलतेने अंत:करणातच स्थिर झाल्यामुळे तो बाहेर पाऊल टाकत नाही. (विषयांकडे प्रवृत्त होत नाही.)



    ओवी १०७
    सांगैं कुमुददळाचेनि ताटें । जो जेविला चंद्रकिरणें चोखटें ।
    तो चकोरु काई वाळुवंटें । चुंबितु असे ?
    अर्थ:सांग कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो शुद्ध चंद्रकिरणांचे भोजन करतो, तो चकोर पक्षी वाळवंटातील दगड चाटत आहे का?




    ओवी १०८
    हेतु त्या भेदाच्या जो गेला । तुज कळलां ते थें गेला ।
    वह्यशुभाद्यका फंदा । आभास तया ॥
    अर्थ:ज्याने त्याच्या भेदांच्या ठिकाणी गेला, त्याने त्या ठिकाणी तुम्हाला ज्ञान दिला. ज्याला बाह्य शुभ अशुभाचे भास होते, तो फंदा फेल करतो.




    ओवी १०९
    खरेतर तो खरोखर हचि येईल जो । अभास उष्णतासारखा विद्या जो ।
    कशाची अडवणूक तुमच्या ठिकाणी असेल कसे हें थोर हें अनुकूल ॥
    अर्थ:तथापि तो खरोखरच याच ठिकाणी येतो जो ज्ञान म्हणजे उष्णतेसमान आहे, तुमच्या ठिकाणी त्याची शुद्धी हवे.




    ओवी ११०
    जणाव्या जणिचा बाहेर जाई । संतसंगी साम्य जेळे येई ।
    सुखप्रिया वा दु:खवेदना । थोडक्यात अल्पसे ॥
    ज्याने या सृष्टीतील बाहेर आणणारा चांगला समाज मिळविला, त्या सणाच्या वर्तुळात सुख किंवा दु:खाच्या वेदना त्यांच्या ठिकाणी अल्प होत जातात.




    ओवी १११:नातरी मृगें तृषापीडितें। संभ्रमें विसरोनि जळांतें।
    मग तोयबुद्धी बरडीतें। ठाकूनि येती॥
    अर्थ: अथवा तहानेने त्रस्त झालेली हरणे भ्रमाने खर्‍या पाण्याला विसरून (मृगजळाला) पाणी आहे असे समजून माळरानावरच येऊन पोहोचतात.




    ओवी ११२:
    तैसें आपणपें नाहीं दिठे। जयातें स्वसुखाचे सदा खरांटे।
    तयासीचि विषय हे गोमटे। आवडती॥
    अर्थ: तसेच ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नाही (अर्थात) ज्यांचे ठिकाणी स्वरूपानंदाचा नेहेमी पूर्ण अभाव असतो, त्यालाच हे विषय सुखरूप वाटतात.




    ओवी ११३:
    एर्‍हवीं विषयीं सुख आहे। हे बोलणेंचि सारिखें नोहे।
    तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे। जगामाजीं॥
    अर्थ: एरवी विषयांमधे काही सुख आहे, हे म्हणणे बोलण्यात जमा होणारे नाही. नाहीतर विजेच्या चमकण्याने जगामधे का उजाडत नाही?





    ओवी ११४:
    सांगैं वात वर्ष आतपु धरे। असे अभ्रच्छायाचि जरी सरे।
    तरी त्रिमाळिकें धवळारें। करावीं कां॥
    अर्थ: सांग, वारा, पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्याचे काम जर ढगांच्या सावलीनेच होईल, तर तीन मजल्यांची चुनेगच्ची घरे बांधण्याचा खटाटोप कशाला?




    ओवी ११५:
    म्हणौनि विषयसुख जें बोलिजे। तें नेणतां गा वायां जल्पिजे।
    जैसें महूर कां म्हणिजे। विषकंदातें॥
    अर्थ: म्हणून ज्याप्रमाणे विषाच्या कांद्याला (बचनागाला) मधुर म्हणावे, त्याप्रमाणे विषयात सुख आहे असे जे म्हणतात ती (विषयांचे खरे स्वरूप न जाणताच) व्यर्थ केलेली बडबड आहे असे समज.




    ओवी ११६:
    नातरी भौमा नाम मंगळु। रोहिणीतें म्हणती जळु।
    तैसा सुखप्रवादु बरळु। विषयिकु हा॥
    अर्थ: किंवा पृथ्वीचा पुत्र असलेल्या ग्रहाला मंगळ असे म्हणतात, (पण त्याचा परिणाम पीडाकारक दिसून येतो) किंवा मृगजळालाच जल असे म्हणतात, त्याप्रमाणे विषयांपासून येणार्‍या अनुभवाला सुख म्हणणे व्यर्थ आहे.




    ओवी ११७:
    हे असो आघवी बोली। सांग पां सर्पफणीचा साउली।
    ते शीतल होईल केतुली। मूषकासी?॥
    अर्थ: हे सर्व प्रतिपादन राहू दे, तूच सांग, सर्पाच्या फडेची सावली आहे ती उंदराला कितपत शांत करणारी होईल बरे?




    ओवी ११८:
    जैसा आमिषकवळु पांडवा। मीनु न सेवी तंवचि बरवा।
    तैसा विषयसंगु आघवा। निभ्रांत जाणें॥
    अर्थ: अर्जुना, ज्याप्रमाणे गळाला लावलेल्या आमीषाचा पिंड जोपर्यंत मासा गिळत नाही तोपर्यंतच ठीक. त्याप्रमाणे विषयांचा सर्व संग आहे, हे तू नि:संशय समज.




    ओवी ११९:
    हे विरक्तांचिये दिठी। जैं न्याहाळिजे किरीटी।
    तैं पांडुरोगाचिये पुष्टी-। सारिखें दिसे॥
    अर्थ: विरक्तांच्या नजरेने पाहिले तर हे विषय, अर्जुना, पंडुरोगामधे आलेल्या लठ्ठपणाप्रमाणे घातक आहेत असे समज.




    ओवी १२०:
    म्हणौनि विषयभोगीं जें सुख। तें साद्यंतचि जाण दुःख।
    परि काय कीजे मूर्ख। न सेवितां न सरे॥
    अर्थ: म्हणून विषयांच्या उपभोगामधे जे सुख असते ते प्रारंभापासून शेवटपर्यंत दु:खच आहे हे समज. परंतु काय करतील वेडे? विषयांचे सेवन केल्याशिवाय त्यांचे चालतच नाही.




    ओवी १२१:तें अंतर नेणती बापुडे। म्हणौनि अगत्य सेवणें घडे।
    सांगैं पूयपंकींचे किडे। काय चिळसी घेती॥
    अर्थ: ते बिचारे वेडे लोक आतले स्वरूप जाणत नाहीत. म्हणून त्यांच्याकडून विषयांचे सेवन होते. तूच सांग, पुवाच्या चिखलातील किडे पुवाची किळस घेतात काय?




    ओवी १२२:
    तयां दुःखियां दुःखचि जिव्हार। ते विषयकर्दमींचे दर्दुर।
    ते भोगजळींचे जळचर। सांडिती केवीं॥
    अर्थ: त्या दु:खी लोकांना दु:खच जीवन होऊन राहिलेले असते. ते विषयरूपी चिखलातील बेडूकच बनतात. ते विषयासक्त लोकरूपी मासे विषयभोगरूपी पाण्याला कसे टाकतील?




    ओवी १२३:
    आणि दुःखयोनि जिया आहाती। तिया निरर्थका तरी नव्हती।
    जरी विषयांवरी विरक्ती। धरिती जीव॥
    अर्थ: शिवाय जर हे जीव विषयांवर अनासक्त होतील तर दु:खदायक योनी ज्या आहेत, त्या निरर्थक होणार नाहीत काय?




    ओवी १२४:
    नातरी गर्भवासादि संकट। कां जन्ममरणींचे कष्ट।
    हे विसांवेवीण वाट। वाहावी कवणें॥
    अर्थ: अथवा गर्भात रहाणे वगैरे संकट किंवा जन्म आणि मरण यापासून होणारे कष्ट हा मार्ग अविश्रांतपणे कोणी चालावा?




    ओवी १२५:
    जरी विषयीं विषयो सांडिजेल। तरी महादोषीं कें वसिजेल।
    आणि संसारु हा शब्दु नव्हेल। लटिका जगीं?॥
    अर्थ: जर विषयासक्त लोक विषय सोडून देतील तर मोठमोठ्या दोषांना रहायला जागा कशी मिळणार? आणि या जगामधे संसार हा शब्दच खोटा ठरणार नाही का?




    ओवी १२६:
    म्हणौनि अविद्याजात नाथिलें। तें तिहींचि साच दाविलें।
    जिहीं सुखबुद्धी घेतलें। विषयदुःख॥
    अर्थ: म्हणून ज्यांनी विषयांपासून होणारे दु:खच सुख या समजुतीने स्वीकारले त्यांनीच मिथ्या असलेले सर्व अविद्यादिक खरे करून दाखवले.




    ओवी १२७:
    या कारणें गा सुभटा। हा विचारितां विषय वोखटा।
    तूं झणें कहीं या वाटा। विसरोनि जाशी॥
    अर्थ: अर्जुना, यामुळेच विचार करून पाहिले तर हे विषय वाईट आहेत. तू विस्मरणाने कदाचित चुकून जरी कधी त्या मार्गाला लागशील तर जाऊ नकोस.




    ओवी १२८:
    पैं यातें विरक्त पुरुष। त्यजिती कां जैसें विष।
    निराशा तयां दुःख। दाविलें नावडे॥
    अर्थ: हे जे विरक्त पुरुष आहेत ते या विषयांना जसे काही विषच आहेत असे मानून त्यांचा त्याग करतात. कारण ते निरीच्छ असल्या कारणाने विषयांनी दाखवलेले दु:खरूपी सुख त्यांना आवडत नाही.




    ओवी १२९:
    ज्ञानियांच्या हन ठायीं। याची मातुही कीर नाहीं।
    देहीं देहभावो जिहीं। स्ववश केले॥
    अर्थ: आत्मज्ञान्यांच्या ठिकाणी तर या दु:खरूपी विषयांची गोष्टसुद्धा नाही. कारण त्यांनी देहात असतानाच काम-क्रोधादी वृत्ती आपल्या स्वाधीन ठेवल्या आहेत.




    ओवी १३:
    जयांतें बाह्याची भाष। नेणिजेचि निःशेष।
    अंतरीं सुख। एक आथि॥
    अर्थ: त्यांना अंत:करणात एक ब्रह्मसुखच अनुभावाला आलेले असते, म्हणून ते बाह्य विषयांची गोष्ट मुळीच जाणत नाहीत.




    ओवी १२१

    तें अंतर नेणती बापुडे, म्हणौनि अगत्य सेवणें घडे।
    सांगैं पूयपंकींचे किडे, काय चिळसी घेती॥ १२१॥

    अर्थ:

    दु:खी लोकांतला वेडपण जाणवत नाही. म्हणून त्यांच्याकडून विषयांचे सेवन होत आहे. तूच विचार कर, पुवाच्या चिखलातील किडे पुवाची किळस घेतात का?



    ओवी १२२

    तयां दुःखियां दुःखचि जिव्हार, ते विषयकर्दमींचे दर्दुर।
    ते भोगजळींचे जळचर, सांडिती केवीं॥ १२२॥

    अर्थ:

    दु:खी लोकांना दु:खच जीवन बनले आहे. ते विषयासक्त लोक कसे विषयभोगरूपी पाण्याला टाकतील?




    ओवी १२३

    आणि दुःखयोनि जिया आहाती, तिया निरर्थका तरी नव्हती।
    जरी विषयांवरी विरक्ती, धरिती जीव॥ १२३॥

    अर्थ:

    जर जीव विषयांवर अनासक्त झाले तर दु:खदायक योनी निरर्थक होणार नाही का?



    ओवी १२४

    नातरी गर्भवासादि संकट, कां जन्ममरणींचे कष्ट।
    हे विसांवेवीण वाट, वाहावी कवणें॥ १२४॥

    अर्थ:

    गर्भात रहाणे किंवा जन्म आणि मरण यापासून होणारे कष्ट हा मार्ग अविश्रांतपणे कोणी चालावा का?




    ओवी १२५

    जरी विषयीं विषयो सांडिजेल, तरी महादोषीं कें वसिजेल।
    आणि संसारु हा शब्दु नव्हेल, लटिका जगीं?॥ १२५॥

    अर्थ:

    जर विषयासक्त लोक विषय सोडून देतील तर मोठमोठ्या दोषांना रहायला जागा कशी मिळणार? या जगात संसार हा शब्दच खोटा ठरू शकत नाही का?




    ओवी १२६

    म्हणौनि अविद्याजात नाथिलें, तें तिहींचि साच दाविलें।
    जिहीं सुखबुद्धी घेतलें, विषयदुःख॥ १२६॥

    अर्थ:

    ज्यांनी विषयांपासून होणारे दु:खच सुख म्हणून स्वीकारले, त्यांनीच मिथ्या असलेले सर्व अविद्यादिक खरे करून दाखवले.




    ओवी १२७

    या कारणें गा सुभटा, हा विचारितां विषय वोखटा।
    तूं झणें कहीं या वाटा, विसरोनि जाशी॥ १२७॥

    अर्थ:

    अर्जुना, यामुळेच विचार करून पाहिले तर हे विषय वाईट आहेत. तू विस्मरणाने कदाचित चुकून जरी कधी त्या मार्गाला लागशील तर जाऊ नकोस.




    ओवी १२८

    पैं यातें विरक्त पुरुष, त्यजिती कां जैसें विष।
    निराशा तयां दुःख, दाविलें नावडे॥ १२८॥

    अर्थ:

    हे विरक्त पुरुष विषयांना जसे विष मानून त्यांचा त्याग करतात. कारण त्यांना विषयांनी दाखवलेले दु:खरूपी सुख आवडत नाही.




    ओवी १३१

    परि तें वेगळेपणें भोगिजे, जैसें पक्षियें फळ चुंबिजे।
    तैसें नव्हे तेथ विसरिजे, भोगितेपणही॥ १३१॥

    अर्थ:

    पक्षी जसे फळ खातो, तसे ते ब्रह्मसुख वेगळेपणाने भोगण्यासारखे नाही. तिथे भोक्तेपणही विसरले पाहिजे.




    ओवी १३२

    भोगीं अवस्था एकी उठी, ते अहंकाराचा अंचळु लोटी।
    मग सुखेंसि घे आंटी, गाढेपणें॥ १३२॥

    अर्थ:

    त्या भोगामध्ये एक स्थिती उत्पन्न होते की ती स्थिती अहंकाराचा पडदा दूर करते, आणि मग जीव सुखाला गाढ आलिंगन देतो.




    ओवी १३३

    तिये आलिंगनमेळीं, होय आपेंआप कवळी।
    तेथ जळ जैसें जळीं, वेगळें न दिसे॥ १३३॥

    अर्थ:

    पाण्यात पाणी मिळाले असता जसे वेगळे दिसत नाही, त्याप्रमाणे त्या आलिंगनाच्या संबंधात आपणच आपल्याला मिठी मारतो.




    ओवी १३४

    कां आकाशीं वायु हारपे, तेथ दोन्ही हे भाष लोपे।
    तैसे सुखचि उरे स्वरूपें, सुरतीं तिये॥ १३४॥

    अर्थ:

    आकाशामध्ये वायूचा लय झाला की तेथे आकाश व वायु असे दोन आहेत असे म्हणता येत नाही, तसे या भोगामध्ये केवळ एक ब्रह्मसुखच स्वरूपाने रहाते.



    ओवी १३५

    ऐसी द्वैताची भाष जाय, मग म्हणों जरी एक होय।
    तरी तेथ साक्षी कवणु आहे, जाणते जें॥ १३५॥

    अर्थ:

    अशा द्वैताची गोष्ट गेली की ऐक्य होते, असे जर म्हणावे तर तेथे साक्षी कोण उरला आहे?



    ओवी १३५
    ऐसी द्वैताची भाष जाय । मग म्हणों जरी एक होय ।
    तरी तेथ साक्षी कवणु आहे । जाणते जें ॥
    अर्थ: अशी द्वैताची गोष्टच गेली म्हणजे ऐक्य होते, असे जर म्हणावे, तर तसे ऐक्य जाणून 'ऐक्य आहे' असे म्हणणारा तेथे साक्षी तरी कोण उरला आहे?




    ओवी १३६म्हणौनि असो हें आघवें । एथ न बोलणें काय बोलावें ।
    ते खुणाचि पावले स्वभावें । आत्माराम ॥
    अर्थ: म्हणून हे मागील सगळे असू दे. जे न बोलण्यासारखे आहे ते काय बोलावे? जे ब्रह्मनिष्ठ आहेत तेच हे मर्म सहज जाणतील.




    ओवी १३७
    जे ऐसेनि सुखें मातले । आपणपांचि आपण गुंतले ।
    ते मी जाणें निखिळ वोतले । सामरस्याचे ॥
    अर्थ: जे अशा सुखाने मस्त अथवा धुंद झाले आहेत, ते पूर्णपणे सामरस्याचे (ब्रह्मैक्य भावाचे) ओतलेले पुतळेच आहेत, असे मी समजतो.




    ओवी १३८
    ते आनंदाचे अनुकार । सुखाचे अंकुर ।
    कीं महाबोधें विहार । केले जैसे ॥
    अर्थ: ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुखाचे ओतलेले कोंब आहेत, जणु काही महाबोधाने आपल्याला रहाण्याला मंदिर केले आहेत.




    ओवी १३९
    ते विवेकाचें गांव । कीं परब्रह्मींचे स्वभाव ।
    नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ॥
    अर्थ: ते शुद्ध सत्वाचे सात्विक आहेत अथवा चैतन्याचे अवयव आहेत. ते विवेकाचे मूळ वसतिस्थान आहेत किंवा परब्रह्माच्या ठिकाणचे स्वभाव किंवा जणु काय मूर्तिमंत ब्रह्मविद्येचे सजवलेले अवयवच आहेत.





    ओवी १४०
    ते सत्त्वाचे सात्त्विक । कीं चैतन्याचे आंगिक ।
    हें बहु असो एकैक । वानिसी काई ॥
    अर्थ: यावर श्रीगुरु निवृत्तिनाथ म्हणाले, हा बोलण्याचा विस्तार पुरे कर. तू एक एक कोठवर वर्णन करणार?




    ओवी १४१
    तूं संतस्तवनीं रतसी । तरी कथेची से न करिसी ।
    कीं निराळीं बोल देखसी । सनागर ॥
    अर्थ: तू जेव्हा संतांच्या स्तुतीत तन्मय होतोस तेव्हा चालू विषयाचे स्मरण तुला रहात नाही आणि विषयाला सोडून पण चांगले बोल तू बोलतोस.




    ओवी १४२
    परि तो रसातिशयो मुकुळीं । मग ग्रंथार्थदीपु उजळीं ।
    करी साधुहृदयराउळीं । मंगळ‌उखा ॥
    अर्थ: परंतु हा रसाचा अधिकपणा आवरता घे आणि आता ग्रंथाचा अर्थरूपी दिवा प्रज्वलित कर. तू सज्जनांच्या अंत:करणरूपी मंदिरात मंगलकारक दिवसाचा प्रात:काल कर.




    ओवी १४३
    ऐसा श्रीगुरूचा उवायिला । निवृत्तिदासासी पातला ।
    मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला । तेंचि आइका ॥
    अर्थ: याप्रमाणे श्रीगुरूंचा इशारा निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव यांना मिळाला. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, श्रीकृष्ण जे म्हणाले तेच ऐका.




    ओवी १४४
    अर्जुना अनंत सुखाच्या डोहीं । एकसरा तळुचि घेतला जिहीं ।
    मग स्थिराऊनि तेही । तेंचि जाहले ॥
    अर्थ: अर्जुना, अमर्याद सुखाच्या डोहात जे एकदम तळाशी जाऊन पोहोचले आहेत ते मग त्याच ठिकाणी स्थिर होऊन तद्रूपतेला प्राप्त झाले.



    ओवी १४५अथवा आत्मप्रकाशें चोखें । जो आपणपेंचि विश्व देखे ।
    तो देहेंचि परब्रह्म सुखें । मानूं येईल ॥
    अर्थ: अथवा शुद्ध आत्मज्ञानाने जो, आपणच आहोत असे जाणतो, तो देहामधेच परब्रह्म आहे असे खुशाल म्हणता येईल.




    ओवी १४६
    जें साचोकारें परम । ना तें अक्षर निःसीम ।
    जिये गांवींचे निष्काम । अधिकारिये ॥
    अर्थ: जे खरोखर अतिशय श्रेष्ठ आहे अथवा जे क्षयरहित व अमर्याद आहे व कामनाशून्य लोक ज्या ठिकाणची प्राप्ती करून घेण्यास अधिकारी आहेत.




    ओवी १४७
    जे महर्षीं वाढले । विरक्तां भागा फिटलें ।
    जे निःसंशया पिकलें । निरंतर ॥
    अर्थ: ते थोर ऋषींकरताच काढून ठेवले आहे किंवा वैराग्यावानांच्या वाट्याला आलेले आहे व जे नेहेमी संशयरहितास फालद्रूप होते.




    ओवी १४८जिहीं विषयांपासोनि हिरतलें । चित्त आपुलें आपण जिंतिलें ।
    ते निश्चित जेथ सुतले । चेतीचिना ॥
    अर्थ: ज्यांनी आपण आपले चित्त विषयांपासून हिरावून घेऊन आपले स्वाधीन करून ठेवले आहे, असे पुरुष निश्चयाने ज्या स्वरूपात लीन झाले असता पुन: जागे होत नाहीत (वृत्तीवर येत नाहीत).





    ओवी १४९
    तें परब्रह्म निर्वाण । जें आत्मविदांचें कारण ।
    तेंचि ते पुरुष जाण । पंडुकुमरा ॥
    अर्थ: आत्मज्ञान्यांचे साध्य, जे मोक्षरूप ब्रह्म तेच ते पुरुष आहेत. असे अर्जुना, तू समज.




    ओवी १५०
    ते ऐसे कैसेंनि जहाले । जे देहींचि ब्रह्मत्वा आले ।
    हें पुससी तरी भलें । संक्षेपें सांगों ॥
    अर्थ: (वर सांगितलेले) जे देहधारी असतांनाच ब्रह्मभावास आले ते असे कशाने झाले हेही विचारशील तर ते आम्ही चांगले पण थोडक्यात सांगतो.




    ओवी १५१तरी वैराग्याचेनि आधारें । जिहीं विषय दवडूनि बाहिरें ।
    शरीरीं एकंदरें । केलें मन ॥
    अर्थ: तरी वैराग्याच्या आश्रयाने अंत:करणातील विषयवासना बाहेर काढून देऊन त्यांनी मनाच्या वृत्ती शरीरामधे अंतर्मुखतेने एकाग्र केल्या.




    ओवी १५२
    सहजें तिहीं संधी भेटी । जेथ भ्रूपल्लवां पडे गांठी ।
    तेथ पाठिमोरी दिठी । पारखोनियां ॥
    अर्थ: इडा, पिंगळा व सुषुम्ना या तिघींच्या संधीत जेथे भुवयांच्या टोकांचा मिलाफ होतो तेथे दृष्टि स्थिर करून मागे फिरवतात.




    ओवी १५३
    सांडूनि दक्षिण वाम । प्राणापानसम ।
    चित्तेंसीं व्योम- । गामिये करिती ॥
    अर्थ: उजव्या (पिंगळा) व डाव्या (इडा) नाकपुडीतून जात येत असलेल्या वायूची गति (रेचक व पूरक) बंद करून (म्हणजे कुंभक करून) प्राण (हृदयस्थ वायु) व अपान (गुदस्थ वायु) यांची समगति म्हणजे ऐक्य करून त्यासह चित्तास ते व्योमगामी (म्हणजे मूर्ध्नी आकाशाकडे जाणारे) करतात.




    ओवी १५४तेथ जैसीं रथ्योदकें सकळें । घेऊनि गंगा समुद्रीं मिळे ।
    मग एकेकु वेगळें । निवडूं नये ॥
    अर्थ: तेथे ज्याप्रमाणे रस्त्यावरून वहाणारे पाणी आपल्या पोटात घेऊन गंगा समुद्राला मिळते, त्यावेळेला (एक हे गटारातील पाणी एक हे गंगेचे पाणी अशी वेगवेगळी निवड करता येत नाही.)




    ओवी १५५
    तैसी वासनांतराची विवंचना । मग आपैसी पारुखे अर्जुना ।
    जे वेळीं गगनीं लयो मना । पवनें कीजे ॥
    अर्थ: त्याप्रमाणे अर्जुना, ज्यावेळी प्राणापानांच्या निरोधाने मूर्ध्न्याकाशात मनाचा लय केला जातो, त्यावेळी नाना प्रकारच्या वासनांची निवड सहजच थांबते.




    ओवी १५६
    जेथ हें संसारचित्र उमटे । तो मनोरूपु पटु फाटे ।
    जैसें सरोवर आटे । मग प्रतिभा नाहीं ॥
    अर्थ: त्यावेळी ज्या ठिकाणी हे संसाररूप चित्र उमटते तो मनोरूपी पडदा (वस्त्र) फाटून जातो. ज्याप्रमाणे सरोवर आटले म्हणजे प्रतिबिंब नाहीसे होते.




    ओवी १५७
    तैसें मन एथ मुद्दल जाय । मग अहंभावादिक कें आहे ।
    म्हणौनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ॥
    अर्थ: त्याप्रमाणे मनाचे मनपण मुळीच नाहीसे झाल्यावर मग ‘मी देह’ वगैरे अहंकारादी विकार कोठे राहिले? (देहाहंकारादी विकार नाहीसे झाले) म्हणून तो ब्रह्मानुभवी पुरुष देहधारी असतानाच ब्रह्म बनतो.




    ओवी १५८आम्हीं मागां हन सांगितलें । जे देहींचि ब्रह्मत्व पावले ।
    ते येणें मार्गें आले । म्हणौनियां ॥
    अर्थ: देहधारी असतांनाच ब्रह्मभावाला पावले, असे जे आम्ही मागे सांगितले, ते या मार्गाने आले म्हणून.




    ओवी १५९
    आणि यमनियमांचे डोंगर । अभ्यासाचे सागर ।
    क्रमोनि हे पार । पातले ते ॥
    अर्थ: आणि यमनियमांचे डोंगर व अभ्यासाचे समुद्र ओलांडून ते ह्या पलीकडच्या तीराला ब्रह्मत्वाला पोचले.




    ओवी १६०
    तिहीं आपणपें करूनि निर्लेप । प्रपंचाचें घेतलें माप ।
    मग साचाचेंचि रूप । होऊनि ठेले ॥
    अर्थ: त्यांनी आपणा स्वत:ला शुद्ध करून प्रपंचाची योग्य किंमत केली आणि मग सत्य पदार्थ जे ब्रह्म, ते तद्रूप होऊन ते राहिले.




    ओवी १६१
    ऐसा योगयुक्तीचा उद्देशु । जेथ बोलिला हृषीकेशु ।
    तेथ अर्जुनु सुदंशु । म्हणौनि चमत्कारला॥
    अर्थ: जेव्हा श्रीकृष्णांनी योगमार्गाचा अभिप्राय अशा रीतीने थोडक्यात सांगितला, तेव्हा अर्जुन मर्मज्ञ असल्याकारणाने आश्चर्यचकित झाला. (कारण त्याने कधी ऐकला नाही असा योगाचा हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला.)




    ओवी १६२
    तें देखिलिया कृष्णें जाणितलें । मग हांसोनि पार्थातें म्हणितलें ।
    काई पां चित्त उवाइलें । इये बोलीं तुझें ? ॥
    अर्थ: श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनाची ही स्थिती जाणली व मग ते हसून अर्जुनाला म्हणाले, ‘आमच्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का?’




    ओवी १६३
    तंव अर्जुन म्हणे देवो । परचित्तलक्षणांचा रावो ।
    भला जाणितला जी भावो । मानसु माझा ॥
    अर्थ: यावर अर्जुन म्हणाला श्रीकृष्णा, आपण मनकवड्यांचे राजे आहात. आपण माझ्या चित्तातला अभिप्राय चांगलाच ओळखलात.




    ओवी १६४
    म्यां जें कांहीं विवरोनि पुसावें । तें आधींचि जाणितलें देवें ।
    तरी बोलिलें तेंचि सांगावें । विवळ करूनि ॥
    अर्थ: मी जे काही विचार करून तुम्हास विचारावे, ते देवा, आपण आधीच जाणलेत. तरी आपण जे बोललात तेच स्पष्ट करून सांगा.




    ओवी १६५
    एर्‍हवीं तरी अवधारा । जो दाविला तुम्हीं अनुसारा ।
    तो पव्हण्याहूनि पाय‌उतारा । सोहपा जैसा ॥
    अर्थ: सहज विचार करून पाहिले तर देवा, ऐका, तुम्ही जो मार्ग दाखवला, तो पोहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाणे जसे सोपे.




    ओवी १६६
    तैसा सांख्याहूनि प्रांजळा । परी आम्हांसारिखियां अभोळां ।
    एथ आहाति परि कांहीं काळा । तो साहों ये वर ॥
    अर्थ: तसा हा योगमार्ग सांख्यमार्गाहून सोपा आहे. परंतु आमच्यासारख्या दुर्बळांना येथे काही विलंब लागेल, पण तो सहन करता येईल.




    ओवी १६७
    म्हणौनि एक वेळ देवा । तोचि पडताळा घेयावा ।
    विस्तरेल तरी सांगावा । साद्यंतुचि॥
    अर्थ: म्हणून देवा, एक वेळ त्याचाच अनुवाद करावा, जरी विस्तार झाला तरी हरकत नाही. पण तो योगमार्ग आरंभापासून अखेरपर्यंत सांगाच.




    ओवी १६८
    तंव श्रीकृष्ण म्हणती हो कां । तुज हा मार्गु गमला निका ।
    तरी काय जाहलें आईकीजो कां । सुखें बोलों॥
    अर्थ: तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे का? तुला हा मार्ग चांगला वाटतो, तर सांगायला आमची काय हरकत आहे? ऐक, आम्ही तो आनंदाने सांगतो.




    ओवी १६९
    अर्जुना तूं परिससी । परिसोनि अनुष्ठिसी ।
    तरी आम्हांसीचि वानी कायसी । सांगावयाची ? ॥
    अर्थ: अर्जुना तू ऐकतोस व ऐकून त्याप्रमाणे आचरण करतोस असे जर आहे, तर आम्हीच सांगावयास का कमी करू?




    ओवी १७०
    आधींचि चित्त मायेचें । वरी मिष जाहले पढियंतयाचें ।
    आतां तें अद्‍भुतपण स्नेहाचें । कवण जाणे ॥
    अर्थ: (ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की) अगोदरच आईचे अंत:करण, त्यात आवडतेपणाचे निमित्त झाले, मग त्या ममतेच्या अद्भुततेची कल्पना कोणाला येईल?




    ओवी १७१
    तें म्हणो कारुण्यरसाची वृष्टि । कीं नवया स्नेहाची सृष्टि ।
    हें असो नेणिजे दृष्टी । हरीची वानूं ॥
    अर्थ: ती हरीची कृपादृष्टि करुणरसाचा वर्षाव आहे असे म्हणू! अथवा नव्या स्नेहाची सृष्टि आहे असे म्हणू? हे राहू द्या. कृष्णाच्या दृष्टीचे वर्णन कसे करावे हे आम्हाला कळत नाही.




    ओवी १७२
    जे अमृताची वोतली । कीं प्रेमचि पिऊनि मातली ।
    म्हणौनि अर्जुनमोहें गुंतली । निघों नेणें ॥
    अर्थ: ही हरीची दृष्टी (जणू काय) अमृताचीच ओतलेली होती अथवा अर्जुनाविषयीचे प्रेम पिऊन मस्त झाली होती. म्हणून अर्जुनाच्या मोहात अडकलेल्या त्या हरीच्या दृष्टीस बाहेर निघण्याचे कळेना.




    ओवी १७३
    हें बहु जें जें जल्पिजेल । तेथें कथेसि फांकु होईल ।
    परि तें स्नेहरूपा न येल । बोलवरी॥
    अर्थ: या हरीच्या दृष्टांता संबंधाने जितकी जास्त जास्त बडबड करावी तितकी तितकी कथेची संगती सुटून या वर्णनाचा विस्तार वाढेल. परंतु शेवटी हरीच्या अर्जुनाविषयीच्या प्रेमाचे यथार्थ वर्णन शब्दांनी करता येणार नाही.




    ओवी १७४
    म्हणौनि विसुरा काय येणें । तो ईश्वरु कवळावा कवणें ।
    जो आपुलें मान नेणें । आपणचि॥
    अर्थ: यात आश्चर्य ते काय? कारण जो आपले मोजमाप आपणच जाणत नाही तो ईश्वर कोणी आकलन करावा?




    ओवी १७५
    तरी मागीला ध्वनीआंतु । मज गमला सावियाचि मोहितु ।
    जे बलात्कारें असे म्हणतु । परिस बापा ॥
    अर्थ: तर मागील बोलण्याच्या अभिप्रायावरून मला सहज असे वाटते की देव अर्जुनाच्या प्रेमरूपी मोहात गुंतले आहेत कारण ते अर्जुनाला बलात्काराने अरे बाबा, ऐक, असे म्हणत होते.



    ओवी १५८आम्हीं मागां हन सांगितलें। जे देहींचि ब्रह्मत्व पावले।
    ते येणें मार्गें आले। म्हणौनियां।
    अर्थ: देहधारी असतांनाच ब्रह्मभावाला पावले, असे जे आम्ही मागे सांगितले, ते या मार्गाने आले म्हणून।




    ओवी १५९
    आणि यमनियमांचे डोंगर। अभ्यासाचे सागर।
    क्रमोनि हे पार। पातले ते।
    अर्थ: आणि यमनियमांचे डोंगर व अभ्यासाचे समुद्र ओलांडून ते ह्या पलीकडच्या तीराला ब्रह्मत्वाला पोचले।




    ओवी १६०
    तिहीं आपणपें करूनि निर्लेप। प्रपंचाचें घेतलें माप।
    मग साचाचेंचि रूप। होऊनि ठेले।
    अर्थ: त्यांनी आपणा स्वत:ला शुद्ध करून प्रपंचाची योग्य किंमत केली आणि मग सत्य पदार्थ जे ब्रह्म, ते तद्रूप होऊन ते राहिले।




    ओवी १६१
    ऐसा योगयुक्तीचा उद्देशु। जेथ बोलिला हृषीकेशु।
    तेथ अर्जुनु सुदंशु। म्हणौनि चमत्कारला।
    अर्थ: जेव्हा श्रीकृष्णांनी योगमार्गाचा अभिप्राय अशा रीतीने थोडक्यात सांगितला, तेव्हा अर्जुन मर्मज्ञ असल्याकारणाने आश्चर्यचकित झाला।




    ओवी १६२
    तें देखिलिया कृष्णें जाणितलें। मग हांसोनि पार्थातें म्हणितलें।
    काई पां चित्त उवाइलें। इये बोलीं तुझें?
    अर्थ: श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनाची ही स्थिती जाणली व मग ते हसून अर्जुनाला म्हणाले, ‘आमच्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का?’




    ओवी १६३
    तंव अर्जुन म्हणे देवो। परचित्तलक्षणांचा रावो।
    भला जाणितला जी भावो। मानसु माझा।
    अर्थ: यावर अर्जुन म्हणाला श्रीकृष्णा, आपण मनकवड्यांचे राजे आहात. आपण माझ्या चित्तातला अभिप्राय चांगलाच ओळखलात।




    ओवी १६४
    म्यां जें कांहीं विवरोनि पुसावें। तें आधींचि जाणितलें देवें।
    तरी बोलिलें तेंचि सांगावें। विवळ करूनि।
    अर्थ: मी जे काही विचार करून तुम्हास विचारावे, ते देवा, आपण आधीच जाणलेत. तरी आपण जे बोललात तेच स्पष्ट करून सांगा।




    ओवी १६५
    एर्‍हवीं तरी अवधारा। जो दाविला तुम्हीं अनुसारा।
    तो पव्हण्याहूनि पाय‌उतारा। सोहपा जैसा।
    अर्थ: सहज विचार करून पाहिले तर देवा, ऐका, तुम्ही जो मार्ग दाखवला, तो पोहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाणे जसे सोपे।




    ओवी १६६
    तैसा सांख्याहूनि प्रांजळा। परी आम्हांसारिखियां अभोळां।
    एथ आहाति परि कांहीं काळा। तो साहों ये वर।
    अर्थ: तसा हा योगमार्ग सांख्यमार्गाहून सोपा आहे. परंतु आमच्यासारख्या दुर्बळांना येथे काही विलंब लागेल, पण तो सहन करता येईल।




    ओवी १६७
    म्हणौनि एक वेळ देवा। तोचि पडताळा घेयावा।
    विस्तरेल तरी सांगावा। साद्यंतुचि।
    अर्थ: म्हणून देवा, एक वेळ त्याचाच अनुवाद करावा, जरी विस्तार झाला तरी हरकत नाही. पण तो योगमार्ग आरंभापासून अखेरपर्यंत सांगाच।




    ओवी १६८
    तंव श्रीकृष्ण म्हणती हो कां। तुज हा मार्गु गमला निका।
    तरी काय जाहलें आईकीजो कां। सुखें बोलों।
    अर्थ: तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे का? तुला हा मार्ग चांगला वाटतो, तर सांगायला आमची काय हरकत आहे?




    ओवी १६९
    अर्जुना तूं परिससी। परिसोनि अनुष्ठिसी।
    तरी आम्हांसीचि वानी कायसी। सांगावयाची?
    अर्थ: अर्जुना तू ऐकतोस व ऐकून त्याप्रमाणे आचरण करतोस असे जर आहे, तर आम्हीच सांगावयास का कमी करू?




    ओवी १७०
    आधींचि चित्त मायेचें। वरी मिष जाहले पढियंतयाचें।
    आतां तें अद्‍भुतपण स्नेहाचें। कवण जाणे।
    अर्थ: अगोदरच आईचे अंत:करण, त्यात आवडतेपणाचे निमित्त झाले, मग त्या ममतेच्या अद्भुततेची कल्पना कोणाला येईल?




    ओवी १७१
    तें म्हणो कारुण्यरसाची वृष्टि। कीं नवया स्नेहाची सृष्टि।
    हें असो नेणिजे दृष्टी। हरीची वानूं।
    अर्थ: ती हरीची कृपादृष्टि करुणरसाचा वर्षाव आहे असे म्हणू! अथवा नव्या स्नेहाची सृष्टि आहे असे म्हणू? हे राहू द्या.




    ओवी १७२
    जे अमृताची वोतली। कीं प्रेमचि पिऊनि मातली।
    म्हणौनि अर्जुनमोहें गुंतली। निघों नेणें।
    अर्थ: ही हरीची दृष्टी (जणू काय) अमृताचीच ओतलेली होती अथवा अर्जुनाविषयीचे प्रेम पिऊन मस्त झाली होती.




    ओवी १७३
    हें बहु जें जें जल्पिजेल। तेथें कथेसि फांकु होईल।
    परि तें स्नेहरूपा न येल। बोलवरी।
    अर्थ: या हरीच्या दृष्टांता संबंधाने जितकी जास्त जास्त बडबड करावी तितकी तितकी कथेची संगती सुटून या वर्णनाचा विस्तार वाढेल.




    ओवी १७४
    म्हणौनि विसुरा काय येणें। तो ईश्वरु कवळावा कवणें।
    जो आपुलें मान नेणें। आपणचि।
    अर्थ: यात आश्चर्य ते काय? कारण जो आपले मोजमाप आपणच जाणत नाही तो ईश्वर कोणी आकलन करावा?




    ओवी १७५
    तरी मागीला ध्वनीआंतु। मज गमला सावियाचि मोहितु।
    जे बलात्कारें असे म्हणतु। परिस बापा।
    अर्थ: तर मागील बोलण्याच्या अभिप्रायावरून मला सहज असे वाटते की देव अर्जुनाच्या प्रेमरूपी मोहात गुंतले आहेत कारण ते अर्जुनाला बलात्काराने अरे बाबा, ऐक, असे म्हणत होते।

    सार्थ ज्ञानेश्वरी

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा:(Sarth Dnyaneshwari...

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चवथा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सहावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सातवा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय आठवा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा

    सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा

    महत्वाचे संग्रह

    पोथी आणि पुराण

    आणखी वाचा

    आरती संग्रह

    आणखी वाचा

    श्लोक संग्रह

    आणखी वाचा

    सर्व स्तोत्र संग्रह

    आणखी वाचा

    सर्व ग्रंथ संग्रह

    आणखी वाचा

    महत्वाचे विडिओ

    आणखी वाचा
    Loading...