मराठी साहित्याचा डिजिटल खजिना.
एकनाथी भागवत अध्याय 1 -ओव्या १0१ ते २००
ओवी १०१:
हे स्तुति कीं निरूपण । ग्रंथपीठ कीं ब्रह्मज्ञान ।
साहित्य कीं समाधान । संज्ञाही जाण कळेना ॥ १०१ ॥
अर्थ:
ही स्तुति म्हणजे काय? ही ग्रंथाची प्रस्तावना की ब्रह्मज्ञान? हे साहित्यशास्त्र की समाधान आहे का? हे सर्व समजत नाही १.
ओवी १०२:
तुझा बोलुचि एकएकु । सोलीव विवेकाचा विवेकु।
तो संतोषासी संतोखू । आत्यंतिकू उपजवी ॥ १०२ ॥
अर्थ:
तू बोलतास तो प्रत्येक शब्द म्हणजे सोलीव विवेकाचा विवेक आहे. तो संतोषालाच अपरिमित संतोष उत्पन्न करतो २.
ओवी १०३:
तुझेनि मुखें जें जें निघे । तें संतहृदयीं साचचि लागे।
मुमुक्षुसारंगांचीं पालिंगें । रुंजी निजांगें करितील ॥ १०३ ॥
अर्थ:
तुझ्या मुखांतून जें जें निघते, ते ते संतांच्या हृदयाला बरोबर पटते. मुमुक्षुरूप भ्रमराचे कळप यावर गुंजारवरच करीत राहतील ३.
ओवी १०४:
ग्रंथारंभु पडला चोख । मुक्त मुमुक्षु इतर लोक।
श्रवणामात्रेंचि देख । निजात्मसुख पावती ॥ १०४ ॥
अर्थ:
ग्रंथाचा आरंभ सुंदर वठल्यामुळें मुक्त, मुमुक्षु, साधक आणि बद्ध लोकही केवळ श्रवणानेच स्वरूपसुखाचा अनुभव घेतील ४.
ओवी १०५:
येणें वचनामृत तुषारें । ग्रंथभूमिका विवेकांकुरें।
अंकुरली एकसरें । फळभारें सफलित ॥ १०५ ॥
अर्थ:
ह्या वचनामृताच्या तुषारानें ग्रंथरूप भूमि विवेकांच्या अंकुरांनी एकसारखी भरून गेली, आणि तीस फळे येऊन ती सुफलित झाली ५.
ओवी १०६:
कीं निर्जीवा जीवु आला । नातरी सिद्धा सिद्धिलाभु जाला।
कीं निजवैभवें आपुला । प्रियो मीनला पतिव्रते ॥ १०६ ॥
अर्थ:
किंवा निर्जीवालाच जीव आला; अथवा सिद्धाला सिद्धीची प्राप्ती झाली; अगर पतिव्रतेला पति आपल्या वैभवासह वर्तमान प्राप्त झाला ६.
ओवी १०७:
तैसेनि हरुषानंदें । जी जी म्हणितलें स्वानंदें।
तुमचेनि पादप्रसादें । करीन विनोदें ग्रंथार्थू ॥ १०७ ॥
अर्थ:
अशा रीतीच्या हर्षभरानें मोठ्या आनंदानें मी म्हटले की महाराज! ठीक आहे. तुमच्या चरणकृपाप्रसादेंकरून ग्रंथाचा अर्थ सहज रीतीनें आनंदानें करीन ७.
ओवी १०८:
श्रीरामप्रतापदृष्टीं । शिळा तरती सागरापोटीं।
कीं वसिष्ठवचनासाठीं । तपे शाटी रविमंडळीं ॥ १०८ ॥
अर्थ:
सेतुबंधनसमयीं श्रीरामचंद्राच्या दृष्टिप्रतापानेच समुद्रावर शिळा तरल्या, किंवा वसिष्ठाच्या आज्ञेवरून सूर्यमंडळाच्या ठिकाणी छाटीच प्रकाशमान झाली ८.
ओवी १०९:
कीं याज्ञवल्कीच्या मंत्राक्षता । शुष्ककाष्ठांस पल्लवता।
कीं धर्में श्वानु सरता। केला सर्वथा स्वर्गलोकीं ॥ १०९ ॥
अर्थ:
किंवा याज्ञवल्क्य ऋषीच्या मंत्राक्षतांनी सुकलेल्या काष्ठालाही उत्तम पल्लव फुटले, किंवा श्वानासही धर्मराजानें स्वर्गवासास पात्र केले ९.
ओवी ११०:
तैसे माझेनि नांवें। ग्रंथ होती सुहावे।
आज्ञाप्रतापगौरवें। गुरुवैभवें सार्थकु ॥ ११० ॥
अर्थ:
अशा रीतीने माझ्या नावावर ग्रंथ सुहावा झाला आहे. गुरुच्या आदेशाने ही कृती सार्थकी लागली आहे १०.
ओवी १११:
घटित एका आणि एकादशें । राशि-नक्षत्र एकचि असे ।
त्या एकामाजीं जैं पूर्ण दिसे । तैं दशदशांशें चढे अधिक ॥ १११ ॥
अर्थ:
एका (एकनाथ) व एकादश यांच्या आद्याक्षरांवरून घटित पाहिले असतां राशि-नक्षत्र एकच असते. पण त्या एकामध्येच जेव्हां पूर्ण दिसते, तेव्हां त्याची किंमत दसपटीनें अधिक चढते.
ओवी ११२:
मागां पुढां एक एक कीजे । त्या नांव एकादशु म्हणिजे।
तरी एका एकपणचि सहजें । आलें निजबोधें ग्रंथार्थें ॥ ११२ ॥
अर्थ:
एकावर एक ठेवला म्हणजे त्याला अकरा म्हणतात. म्हणून एकालाही एकपणानें सहजच ग्रंथ करण्याचे स्फुरण आले आहे.
ओवी ११३:
तेथें देखणेंचि करूनि देखणें । अवघेंचि निर्धारूनि मनें।
त्यावरी एकाजनार्दनें । टीका करणें सार्थक ॥ ११३ ॥
अर्थ:
तेथे देखणे आहे तेच देखणे करून सारेंच मनानें एक समजतो. आणखी त्यावर गुरु जनार्दन एकनाथास टीकाकार बनवून त्याचे सार्थक करीत आहे.
ओवी ११४:
पाहोनि दशमाचा प्रांतु । एकादशाच्या उदयाआंतु।
एकादशावरी जगन्नाथु । ग्रंथार्थु आरंभी ॥ ११४ ॥
अर्थ:
दशमस्कंधांतील भाग पाहून एकादशाच्या प्रारंभापूर्वी एकादशस्कंधावर जगन्नाथच ग्रंथाचा आरंभ करीत आहे.
विश्लेषण:
दशम आणि एकादश या स्कंधांचे महत्त्व दर्शवते. येथे जगन्नाथाचा संदर्भ ग्रंथाची आरंभिक प्रक्रिया दर्शवतो.
ओवी ११५:
म्हणौनि एकादशाची टीका । एकादशीस करी एका।
ते एकपणाचिया सुखा। फळेल देखा एकत्वें ॥ ११५ ॥
अर्थ:
म्हणून एकादश स्कंधावरची ही टीका, एकादशीस एकनाथ करीत आहे. त्यामुळें ती एकपणाच्या सुखाला एकत्वानें पात्र होईल.
ओवी ११६:
आतां वंदूं महाकवी । व्यास वाल्मीक भार्गवी।
जयातें उशना कवी। पुराणगौरवीं बोलिजे ॥ ११६ ॥
अर्थ:
आतां व्यास, वाल्मीकि, भार्गव — ज्याचा पुराणांतरीं ‘उशना’ कवि म्हणून गौरव केला आहे – त्या महाकवींना वंदन करतों.
ओवी ११७:
तिहीं आपुलिये व्युत्पत्ती । वाढवावी माझी मती।
हेचि करीतसें विनंती । ग्रंथ समाप्तीं न्यावया ॥ ११७ ॥
अर्थ:
त्यांनी आपल्या ज्ञानानें माझ्या बुद्धीची वृद्धि करावी, अशी त्यांना ग्रंथ संपूर्ण होण्याकरिता विनंती करतों.
ओवी ११८:
वंदूं आचार्य शंकरू । जो ग्रंथार्थविवेकचतुरू।
सारूनि कर्मठतेचा विचारू। प्रबोधदिनकरू प्रकाशिला ॥ ११८ ॥
अर्थ:
तसेंच ग्रंथाचा अर्थ करण्याविषयी महाचतुर अशा श्रीशंकराचार्यांनाहीं नमस्कार करतो. कारण, त्यांनी कर्मठपणाचा विचार बाजूला सारून ज्ञानसूर्याचा (ज्ञानमार्गाचा) पृथ्वीवर प्रकाश पाडला.
ओवी ११९:
आतां वंदूं श्रीधर। जो भागवतव्याख्याता सधर।
जयाची टीका पाहतां अपार। अर्थ साचार पैं लाभे ॥ ११९ ॥
अर्थ:
आतां भागवतटीकाकार श्रेष्ठ श्रीधर, ज्याच्या टीकेमध्यें अपार अर्थ भरला आहे, त्याला नमस्कार करतों.
ओवी १२०:
इतरही टीकाकार। काव्यकर्ते विवेकचतुर।
त्यांचे चरणीं नमस्कार। ग्रंथा सादर तिहीं होआवें ॥ १२० ॥
अर्थ:
इतरही टीकाकार आणि काव्यकर्त्यांना नमस्कार करून, ग्रंथ सादर करणे याची इच्छा दर्शवली आहे.
ओवी १११:
घटित एका आणि एकादशें । राशि-नक्षत्र एकचि असे ।
त्या एकामाजीं जैं पूर्ण दिसे । तैं दशदशांशें चढे अधिक ॥ १११ ॥
अर्थ:
एका (एकनाथ) व एकादश यांच्या आद्याक्षरांवरून घटित पाहिले असतां राशि-नक्षत्र एकच असते. पण त्या एकामध्येच जेव्हां पूर्ण दिसते, तेव्हां त्याची किंमत दसपटीनें अधिक चढते.
विश्लेषण:
या ओवीत “एक” आणि “एकादश” या दोन्ही संख्यांचे आणि त्यांच्या आद्याक्षरांचे सांकेतिक महत्त्व आहे. एकामध्येच जेव्हा पूर्णत्व प्राप्त होते, तेव्हा त्याची मूल्यवर्धन होते, याचे प्रतीकात्मक वर्णन केले आहे.
ओवी ११२:
मागां पुढां एक एक कीजे । त्या नांव एकादशु म्हणिजे।
तरी एका एकपणचि सहजें । आलें निजबोधें ग्रंथार्थें ॥ ११२ ॥
अर्थ:
एकावर एक ठेवला म्हणजे त्याला अकरा म्हणतात. म्हणून एकालाही एकपणानें सहजच ग्रंथ करण्याचे स्फुरण आले आहे.
विश्लेषण:
या ओवीत “एक” आणि “एकादश” यांचा अर्थ स्पष्ट केला आहे. या प्रक्रियेत ग्रंथ लेखनाची प्रेरणा मिळालेली आहे, जो एकात्मतेचा एक गूढ अनुभव दर्शवतो.
ओवी ११३:
तेथें देखणेंचि करूनि देखणें । अवघेंचि निर्धारूनि मनें।
त्यावरी एकाजनार्दनें । टीका करणें सार्थक ॥ ११३ ॥
अर्थ:
तेथे देखणे आहे तेच देखणे करून सारेंच मनानें एक समजतो. आणखी त्यावर गुरु जनार्दन एकनाथास टीकाकार बनवून त्याचे सार्थक करीत आहे.
विश्लेषण:
गुरूंच्या ज्ञानाने आणि मार्गदर्शनाने टीका करणे यावर भर दिला आहे. एकात्मतेच्या भावनेचा अनुभव घेऊन, गुरु ज्ञानाचा प्रकाश पाडतो.
ओवी ११४:
पाहोनि दशमाचा प्रांतु । एकादशाच्या उदयाआंतु।
एकादशावरी जगन्नाथु । ग्रंथार्थु आरंभी ॥ ११४ ॥
अर्थ:
दशमस्कंधांतील भाग पाहून एकादशाच्या प्रारंभापूर्वी एकादशस्कंधावर जगन्नाथच ग्रंथाचा आरंभ करीत आहे.
विश्लेषण:
दशम आणि एकादश या स्कंधांचे महत्त्व दर्शवते. येथे जगन्नाथाचा संदर्भ ग्रंथाची आरंभिक प्रक्रिया दर्शवतो.
ओवी ११५:
म्हणौनि एकादशाची टीका । एकादशीस करी एका।
ते एकपणाचिया सुखा। फळेल देखा एकत्वें ॥ ११५ ॥
अर्थ:
म्हणून एकादश स्कंधावरची ही टीका, एकादशीस एकनाथ करीत आहे. त्यामुळें ती एकपणाच्या सुखाला एकत्वानें पात्र होईल.
विश्लेषण:
एकादशी या दिनाच्या आध्यात्मिक महत्त्वाचा उल्लेख करतो. एकात्मतेच्या सुखाबद्दलची चर्चा करून, ती एकत्रित होण्याचे प्रतीक आहे.
ओवी ११६:
आतां वंदूं महाकवी । व्यास वाल्मीक भार्गवी।
जयातें उशना कवी। पुराणगौरवीं बोलिजे ॥ ११६ ॥
अर्थ:
आतां व्यास, वाल्मीकि, भार्गव — ज्याचा पुराणांतरीं ‘उशना’ कवि म्हणून गौरव केला आहे – त्या महाकवींना वंदन करतों.
विश्लेषण:
महाकविंना वंदन करणे म्हणजे त्यांच्या ज्ञानाचे आणि काव्याच्या गूढतेचे मान्यताप्राप्त करणे. येथे अध्यात्मिक गुरुंचा आदर दर्शवला आहे.
ओवी ११७:
तिहीं आपुलिये व्युत्पत्ती । वाढवावी माझी मती।
हेचि करीतसें विनंती । ग्रंथ समाप्तीं न्यावया ॥ ११७ ॥
अर्थ:
त्यांनी आपल्या ज्ञानानें माझ्या बुद्धीची वृद्धि करावी, अशी त्यांना ग्रंथ संपूर्ण होण्याकरिता विनंती करतों.
विश्लेषण:
ज्ञानाची वृद्धी आणि बुद्धीला प्रबोधन करणे यावरचा जोरदार ठसा. गुरुच्या कृपेने अंतर्दृष्टी प्राप्त करण्याची महत्त्वता.
ओवी ११८:
वंदूं आचार्य शंकरू । जो ग्रंथार्थविवेकचतुरू।
सारूनि कर्मठतेचा विचारू। प्रबोधदिनकरू प्रकाशिला ॥ ११८ ॥
अर्थ:
तसेंच ग्रंथाचा अर्थ करण्याविषयी महाचतुर अशा श्रीशंकराचार्यांनाहीं नमस्कार करतो. कारण, त्यांनी कर्मठपणाचा विचार बाजूला सारून ज्ञानसूर्याचा (ज्ञानमार्गाचा) पृथ्वीवर प्रकाश पाडला.
विश्लेषण:
शंकराचार्यांवरील आदर आणि त्यांच्या तत्त्वज्ञानातील अद्वितीयतेचा मान. ज्ञानाच्या प्रकाशाने अंधार दूर करणाऱ्या या गुरुंची महत्ता.
ओवी ११९:
आतां वंदूं श्रीधर। जो भागवतव्याख्याता सधर।
जयाची टीका पाहतां अपार। अर्थ साचार पैं लाभे ॥ ११९ ॥
अर्थ:
आतां भागवतटीकाकार श्रेष्ठ श्रीधर, ज्याच्या टीकेमध्यें अपार अर्थ भरला आहे, त्याला नमस्कार करतों.
विश्लेषण:
श्रीधर यांचा उल्लेख आणि त्यांच्या टीकेतील अर्थाची महत्त्वता दर्शवते. ज्ञानाच्या गूढतेची समज वाढवणारा ग्रंथ.
ओवी १२०:
इतरही टीकाकार। काव्यकर्ते विवेकचतुर।
त्यांचे चरणीं नमस्कार। ग्रंथा सादर तिहीं होआवें ॥ १२० ॥
अर्थ:
इतरही टीकाकार आणि काव्यकर्त्यांना नमस्कार करून, ग्रंथ सादर करणे याची इच्छा दर्शवली आहे.
ओवी १२१:वंदूं प्राकृत कवीश्वर । निवृत्तिप्रमुख ज्ञानेश्वर ।
नामदेव चांगदेव वटेश्वर । ज्यांचें भाग्य थोर गुरुकृपा ॥ १२१ ॥
अर्थ:
आता निवृत्तिप्रमुख ज्ञानेश्वर, नामदेव, चांगदेव आणि वटेश्वर यांच्यासारख्या प्राकृत कवींचे वंदन करतो, कारण ज्यांचे भाग्य गुरुच्या कृपेने थोर आहे.
ओवी १२२:
जयांचे ग्रंथ पाहतां । ज्ञान होय प्राकृतां ।
तयांचें चरणी माथा । निजात्मता निजभावें ॥ १२२ ॥
अर्थ:
ज्यांचे ग्रंथ पाहताना प्राकृत लोकांना ज्ञान प्राप्त होते, त्यांच्या चरणांवर एकात्मभावाने आणि अनन्य भक्तीने मस्तक ठेवतो.
ओवी १२३:
संस्कृत ग्रंथकर्ते ते महाकवी । मा प्राकृतीं काय उणीवी ।
नवीं जुनीं म्हणावीं । कैसेनि केवीं सुवर्णसुमनें ॥ १२३ ॥
अर्थ:
संस्कृत ग्रंथकारांना ‘महाकवि’ म्हणून संबोधण्याचे कारण काय? आणि प्राकृत ग्रंथकारांना ‘लघुकवि’ म्हणणे योग्य आहे का? सोन्याच्या फुलांच्या बाबतीतही नवीन व जुने कसे सांगता येईल?
ओवी १२४:
कपिलेचें म्हणावें क्षीर । मा इतरांचें तें काय नीर ।
वर्णस्वादें एकचि मधुर । दिसे साचार सारिखें ॥ १२४ ॥
अर्थ:
कपिलाची गायचे दूध असते, इतर गाईंचे दूध काय पाणी असते का? वास्तविक दोन्ही दूध रंगाने व चवीने सारखेच मधुर असते.
ओवी १२५:
जें पाविजे संस्कृत अर्थें । तेंचि लाभे प्राकृतें ।
तरी न मनावया येथें । विषमचि तें कायी ॥ १२५ ॥
अर्थ:
संस्कृत अर्थानुसार ज्या गोष्टी समजतात, तशाच गोष्टी मराठी भाषेतही समजतात. मग येथे प्राकृत भाषेची मान्यता न मानण्याची अडचण काय आहे?
ओवी १२६:
कां निरंजनीं बसला रावो । तरी तोचि सेवकां पावन ठावो ।
तेथें सेवेसि न वचतां पाहा हो । दंडी रावो निजभृत्यां ॥ १२६ ॥
अर्थ:
जर राजा जंगलात बसला तरी त्याच्या सेवकांच्या सेवेला ती जागा पवित्र असते. तेथे सेवक सेवा न करता गेले तर राजा त्यांना दंड देईल.
ओवी १२७:
कां दुबळी आणि समर्थ । दोहींस रायें घातले हात ।
तरी दोघींसिही तेथ । सहजें होत समसाम्य ॥ १२७ ॥
अर्थ:
गरिबाची मुलगी आणि श्रीमंताची मुलगी, दोघींच्या लग्नात राजाने हात घातला तरी सहजपणे दोघींच्यात समानता निर्माण होते.
ओवी १२८:
देशभाषावैभवें । प्रपंच पदार्थीं पालटलीं नांवें ।
परी रामकृष्णादिनामां नव्हे । भाषावैभवें पालटू ॥ १२८ ॥
अर्थ:
देशभाषेत पदार्थांची नावे बदलतात, परंतु राम-कृष्ण यांचे विशेष नाव काही भाषाभिन्नतेमुळे बदलत नाहीत.
ओवी १२९:
संस्कृत वाणी देवें केली । तरी प्राकृत काय चोरापासोनि जाली ।
असोतु या अभिमानभुली । वृथा बोलीं काय काज ॥ १२९ ॥
अर्थ:
संस्कृत भाषा देवाने केली आणि मराठी भाषा चोरांपासून आली का? हे सर्व अभिमानाचे भ्रम बाजूला ठेवून उगीच वायफळ बोलण्यात काहीही अर्थ नाही.
ओवी १३१:
वंदूं ‘भानुदास’ आतां । जो कां पितामहाचा पिता ।
ज्याचेनि वंश भगवंता । झाला सर्वथा प्रियकर ॥ १३१ ॥
अर्थ:
आता भानुदास यांना वंदन करतो, जो माझ्या पितामहाचा पिता आहे. त्याच्या योगाने आमचा वंश भगवंताला सर्वतोपरी प्रिय झाला आहे.
ओवी १३२:
जेणें बाळपणीं आकळिला भानु । स्वयें जाहला चिद्भानु ।
जिंतोनि मानाभिमानु । भगवत्पावनु स्वयें झाला ॥ १३२ ॥
अर्थ:
ज्याने लहानपणीच सूर्याला स्वाधीन केले व स्वतः चित्सूर्य बनला, तसेच मानाभिमान सोडून भगवंताकडून पावन झाला.
ओवी १३३:
जयाचि पदबंध प्राप्ति । पाहों आली श्रीविठ्ठलमूर्ति ।
कानीं कुंडलें जगज्ज्योति । करितां रातीं देखिला ॥ १३३ ॥
अर्थ:
ज्याची पदबंधप्राप्ती झाल्यावर श्रीविठ्ठलाची मूर्ती पहायला मिळाली, ती देदीप्यमान कुंडलें कानात झळकली आणि रात्री दिसली.
ओवी १३४:
तया भानुदासाचा ‘चक्रपाणि’ । तयाचाही सुत सुलक्षणी ।
तया ‘सूर्य’ नाम ठेवूनि । निजीं निज होऊनि भानुदास ठेला ॥ १३४ ॥
अर्थ:
त्या भानुदासाचा पुत्र चक्रपाणि, त्यालाही सुलक्षण पुत्र झाला. त्याचे नाव ‘सूर्य’ ठेवून भानुदास निवर्तला.
ओवी १३५:
तया सूर्यप्रभाप्रतापकिरणीं । मातें प्रसवली रुक्मिणी ।
म्हणौनि रखुमाई जननी । आम्हांलागूनि साचचि ॥ १३५ ॥
अर्थ:
त्या सूर्याच्या तेजाच्या किरणांनी रुक्मिणी मला प्रसवली, म्हणून ‘रखुमाई’ ही आमची खरोखरीची माता आहे.
ओवी १३६:
हे ग्रंथारंभकाळा । वंदिली पूर्वजमाळा ।
धन्य निजभाग्याचि लीळा । आलों वैष्णवकुळा जन्मोनि ॥ १३६ ॥
अर्थ:
ग्रंथारंभाच्या काळात पूर्वजांच्या मालिकेला वंदन करतो. अशा वैष्णवकुलांत जन्म घेणे हे माझे भाग्य आहे.
ओवी १३७:
ते वैष्णवकुळीं कुळनायक । नारद प्रल्हाद सनकादिक ।
उद्धव अक्रूर श्रीशुक । वसिष्ठादिक निजभक्त ॥ १३७ ॥
अर्थ:
या वैष्णवकुलात नारद, प्रल्हाद, सनकादिक, उद्धव, अक्रूर, श्रीशुक, वसिष्ठ इत्यादी परमेश्वराचे महत्त्वाचे भक्त झाले आहेत.
ओवी १३८:
ते वैष्णव सकळ । ग्रंथार्थीं अवधानशीळ ।
म्हणौनि वैष्णवकुळमाळ । वंदिली सकळ ग्रंथार्थीं ॥ १३८ ॥
अर्थ:
हे सर्व वैष्णव ग्रंथार्थाकडे लक्ष देणारे आहेत. म्हणून मी सर्व वैष्णवकुळांच्या मालिकेला ग्रंथारंभात वंदन करतो.
ओवी १३९:
उपजलों ज्याचिया गोत्रा । नमन त्या विश्वामित्रा ।
जो कां प्रतिसृष्टीचा धात्रा । गायत्रीमंत्रा महत्त्व ॥ १३९ ॥
अर्थ:
आता ज्याच्या गोत्रात मी उत्पन्न झालो, त्या विश्वामित्राला नमस्कार करतो. तो प्रतिसृष्टी करणारा केवळ ब्रह्मदेव असून गायत्रीमंत्राला त्याच्या योगाने महत्त्व प्राप्त झाले आहे.
ओवी १४०:
जो उपनिषद्विवेकी । तो वंदिला याज्ञवल्की ।
जो कविकर्तव्यातें पोखी । कृपापीयूखीं वर्षोनी ॥ १४० ॥
अर्थ:
उपनिषदांचे विवेचन करणारा याज्ञवल्क्य ऋषीला वंदन करतो, जो कृपामृताचा वर्षाव करून कवीच्या कर्तव्याची प्रतिष्ठा वाढवतो.
ओवी १४१:नमन भूतमात्रां अशेखां । तेणें विश्वंभरू जाहला सखा ।
म्हणौनि ग्रंथारंभू देखा । आला नेटका संमता ॥
अर्थ:
आता सर्व जीवांना नमस्कार करतो, कारण त्यांच्या माध्यमातून परमेश्वराशी सख्य झालं आहे. म्हणूनच या ग्रंथारंभाचा उत्तम मार्गाने प्रारंभ झाला आहे.
ओवी १४२:
आतां नमूं दत्तात्रेया । जो कां आचार्यांचा आचार्या ।
तेणें प्रवर्तविलें ग्रंथकार्या । अर्थवावया निजबोधु ॥
अर्थ:
आता दत्तात्रेयाला नमस्कार करतो, जो गुरुंचा गुरु आहे आणि ज्याने ग्रंथलेखनासाठी ज्ञानप्रकाशित करण्याची प्रेरणा दिली.
ओवी १४३:
तो शब्दातें दावितु । अर्थु अर्थें प्रकाशितु ।
मग वक्तेपणाची मातु । स्वयें वदवितु यथार्थ ॥
अर्थ:
तो शब्द ज्ञान देतो, अर्थ समजून सांगतो, आणि मग वक्ता स्वतःच यथार्थ बोलतो.
ओवी १४४:
तो म्हणे श्रीभागवत । तें भगवंताचें हृद्गत ।
त्यासीचि होय प्राप्त । ज्याचें निरंतर चित्त भगवंतीं ॥
अर्थ:
तो सांगतो की श्रीमद् भागवत हे भगवंताचे हृदय आहे. ज्याचे चित्त निरंतर भगवंताकडे असते, त्यालाच हे प्राप्त होते.
ओवी १४५:
तें तें हें ज्ञान कल्पादी । ‘चतुःश्लोक’ पदबंधीं ।
उपदेशिला सद्बुद्धी । निजात्मबोधीं विधाता ॥
अर्थ:
हे ज्ञान कल्पाच्या आधीचे आहे, आणि ‘चतुःश्लोक’ या चार श्लोकांतून ब्रह्मदेवाने आत्मज्ञान प्रदान करण्यासाठी उपदेश दिला आहे.
ओवी १४६:
नवल तयाचा सद्भावो । शब्दमात्रें झाला अनुभवो ।
बाप सद्गुरुकृपा पहा हो । केला निःसंदेहो परमेष्ठी ॥
अर्थ:
त्याचा सद्भाव अत्यंत अद्भुत आहे. कारण, शब्दांच्या माध्यमाने त्याला अनुभव आला. सद्गुरूकृपेला किती महान आहे, हे सांगणे अशक्य आहे!
ओवी १४७:
तो चतुःश्लोकींचा बोधु । गुरुमार्गें आला शुद्धु ।
तेणें उपदेशिला नारदु । अतिप्रबुद्धु भावार्थीं ॥
अर्थ:
तो चतुःश्लोकी उपदेश गुरु परंपरेने शुद्ध पद्धतीने आलाय, ज्याला नारदाने अत्यंत बुद्धिमान मनाने दिला.
ओवी १४८:
तेणें नारदु निवाला । अवघा अर्थमयचि झाला ।
पूर्ण परमानंदें धाला । नाचों लागला निजबोधें ॥
अर्थ:
नारद त्याने पूर्ण अर्थमय बनला आणि परमानंदाने तृप्त होऊन नाचू लागला.
ओवी १४९:
तो ब्रह्मवीणा वाहतु । ब्रह्मपदें गीतीं गातु ।
तेणें ब्रह्मानंदें नाचतु । विचरे डुल्लतु भूतळीं ॥
अर्थ:
तो ब्रह्मवीणा खांद्यावर टाकून, ब्रह्मपद गाताना ब्रह्मानंदात नाचत डुलत भूमंडळावर आला.
ओवी १५०:
तो आला सरस्वती तीरा । तंव देखिलें व्यास ऋषीश्वरा ।
जो संशयाचिया पूरा । अतिदुर्धरामाजीं पडिला ॥
अर्थ:
त्याला सरस्वतीच्या तीरावर व्यास ऋषीश्वरा दिसले, जो संशयाच्या अडथळ्यात अत्यंत दुर्धर झाला होता.
ओवी १५१:वेदार्थ सकळ पुराण । व्यासें केलें निर्माण ।परी तो न पवेंचि आपण । निजसमाधान स्वहिताचें ॥
अर्थ:
व्यासांनी सर्व पुराणे वेदांच्या अर्थानुसार तयार केली; तरी त्यांना स्वतःचं समाधान प्राप्त झाले नाही.
ओवी १५२:
तो संशयसमुद्रा आंतु । पडोनि होता बुडतु ।
तेथें पावला ब्रह्मसुतु । ‘नाभी’ म्हणतु कृपाळू ॥
अर्थ:
त्या संशयाच्या समुद्रात बुडत असतानाच कृपाळू नारद मुनि आले आणि त्यांनी आश्वासन दिलं की "आपण मुळीच भिऊ नका".
ओवी १५३:
तेणें एकांतीं नेऊनि देख । व्यासासि केला एकमुख ।
मग दाविले चार्ही श्लोक । भवमोचक निर्दुष्ट ॥
अर्थ:
त्यांनी व्यासांना एकांतात घेऊन एकमुख केलं, आणि मग चार संसारच्छेदक श्लोक त्यांना दाखविले.
ओवी १५४:
ते सूर्याते न दाखवुनी । गगनातेंही चोरूनी ।
कानातें परते सारूनी । ठेला उपदेशुनी निजबोधु ॥
अर्थ:
त्यांनी सूर्याला न दाखवता, आकाशालाही चोरून, कानापासूनही दूर करून आत्मबोधाचा उपदेश केला.
ओवी १५५:
तें नारदाचें वचन । करीत संशयाचें दहन ।
तंव व्यासासि समाधान । स्वसुखें पूर्ण हों सरलें ॥
अर्थ:
नारदाच्या वचनांनी व्यासांच्या संशयाचे दहन झाले, तेव्हा त्यांच्या मनाला पूर्व स्वसुखाचे समाधान मिळाले.
ओवी १५६:
मग श्रीव्यासें आपण । भागवत दशलक्षण ।
शुकासि उपदेशिलें जाण । निजबोधें पूर्ण सार्थक ॥
अर्थ:
यानंतर श्रीव्यासांनी भागवत दशलक्षण शुकाला उपदेश करून त्यांच्या आत्मबोधाचे पूर्ण सार्थक केले.
ओवी १५७:
तेणें शुकही सुखावला । परमानंदें निवाला ।
मग समाधिस्थ राहिला । निश्चळ ठेला निजशांती ॥
अर्थ:
त्यानंतर शुकालाही आनंद झाला, तो परमानंदात तृप्त होऊन समाधिस्थ राहिला आणि आत्मशांतिमध्ये निश्चळ बसला.
ओवी १५८:
तेथें स्वभावेंचि जाणा । समाधि आली समाधाना ।
मग परीक्षितीचिया ब्रह्मज्ञाना । अवचटें जाणा तो आला ॥
अर्थ:
त्या समाधीत साहजिक समाधान प्राप्त झाले, मग परीक्षिताला ब्रह्मज्ञान सांगण्यासाठी तो अचानक तिथे आला.
ओवी १५९:
पहावया परीक्षितीचा अधिकारु । तंव कलीसि केला तेणें मारू ।
तरी धर्माहूनि दिसे थोरु । अधिकारु पैं याचा ॥
अर्थ:
परीक्षिताच्या अधिकाराचा विचार करता, त्याने कलीला बांधून ठेवले, त्यामुळे त्याचा अधिकार धर्मापेक्षा अधिक थोर दिसतो.
ओवी १६०:
कृष्णु असतां धर्म जियाला । पाठीं कलिभेणें तो पळाला ।
परी हा कलि निग्रहूनि ठेला । धर्माहूनि भला धैर्यें अधिक ॥
अर्थ:
श्रीकृष्णांच्या असताना धर्माला जिवंत राहण्याची शक्ती होती, पण कृष्णांच्या जाण्यानंतर कली पळाला; तरी परीक्षिती कलीलाही नियंत्रित करून राज्य करीत होता, याने त्याची धैर्य अधिक आहे.
ओवी १६१:
अर्जुनवीर्यपरंपरा निर्व्यंग । सुभद्रा मातामहीचें गर्भलिंग ।
तो अधिकाररत्न उपलिंग । ज्यासी रक्षिता श्रीरंग गर्भीं झाला ॥
अर्थ:
तो अर्जुनाच्या वीर्यपरंपरेतून उत्पन्न झाला आहे. तो सुभद्रा आणि तिच्या आईच्या गर्भातील आहे. (सुभद्रेचा पुत्र अभिमन्यु व अभिमन्यूचा पुत्र परीक्षिती.)
ओवी १६२:
गर्भींच असता ज्याच्या भेणें । स्पर्शूं न शके शस्त्र द्रौण्य ।
त्याचा अधिकार पूर्ण । सांगावया कोण समर्थ ॥
अर्थ:
जो गर्भात असताना ज्याच्या भयामुळे अश्वत्थाम्याचे शस्त्र आत शिरू शकले नाही, त्याचा अधिकार पूर्ण सांगण्यास कोण समर्थ आहे?
ओवी १६३:
जेणें रक्षिले गर्भाप्रती । तया परीक्षी सर्वांभूतीं ।
यालागीं नांवें परीक्षिती । अगाध स्थिती नांवाची ॥
अर्थ:
ज्याने गर्भामध्ये आपले संरक्षण केले, तो परमेश्वर प्रत्येक प्राणिमात्रामध्ये आहे, म्हणून त्याला परीक्षिती असे नाव दिले.
ओवी १६४:
तो अभिमन्यूचा परीक्षिती । उपजला पावन करीत क्षिती ।
ज्याचेनि भागवताची ख्याती । घातली त्रिजगतीं परमार्थपव्हे ॥
अर्थ:
तो अभिमन्यूचा पुत्र परीक्षिती पृथ्वीचा उद्धार करण्याकरिता जन्माला आला होता. त्याच्यामुळें त्रिभुवनाला श्रीमद् भागवताची ख्याती प्रसिद्ध झाली.
ओवी १६५:
अंगीं वैराग्यविवेकू । ब्रह्मालागीं त्यक्तोदकू ।
तया देखोनि श्रीशुकू । आत्यंतिकू सुखावला ॥
अर्थ:
ज्या परीक्षितीच्या अंगात वैराग्य आणि विवेक आहे, जो ब्रह्मप्राप्तीसाठी सर्वस्वावर उदक सोडलेला आहे, ते पाहून श्री शुकाला अत्यंत आनंद झाला.
ओवी १६६:
बाप कोपु ब्राह्मणाचा । शापें अधिकारू ब्रह्मज्ञानाचा ।
तयांच्या चरणीं कायावाचा । निजभावा नमस्कारू ॥
अर्थ:
ब्राह्मणांचा राग म्हणजे विचित्र आहे! त्यांनी शापामुळे परीक्षितीला ब्रह्मज्ञानाचा अधिकार दिला. त्यांच्या चरणांना कायावाचांमुळे भक्तिभावाने नमस्कार करतो.
ओवी १६७:
ब्रह्माहूनि ब्राह्मण थोरू । हें मीच काय फार करूं ।
परी हृदयीं अद्यापि श्रीधरु । चरणालंकारू मिरवितु ॥
अर्थ:
ब्रह्माहूनही ब्राह्मण श्रेष्ठ आहेत, हे सांगण्यास काय विशेष आहे! परंतु साक्षात श्रीविष्णु हृदयावर श्रीवत्सलांच्छन मिरवतात.
ओवी १६८:
म्हणोनि ब्रह्माचा देवो ब्राह्मणु । हा सत्यसत्य माझा पणु ।
यालागीं वेदरूपें नारायणु । उदरा येऊनि वाढविला ॥
अर्थ:
ब्राह्मण हा ब्रह्माचाही देव आहे, हा माझा सिद्धांत अगदी सत्य आहे. म्हणूनच नारायण वेदरूपाने ब्राह्मणाच्या गर्भात आले.
ओवी १६९:
म्हणोनि ब्राह्मण भूदेव । हें ब्रह्मींचे निजावेव ।
येथें न भजती ते मंददैव । अति निर्दैव अभाग्य ॥
अर्थ:
ब्राह्मण पृथ्वीवरचे देव आहेत, हे ब्रह्माचे अवयव आहेत. त्यामुळे त्यांना भजत नाहीत ते दुर्दैवी आणि अत्यंत दुर्बुद्धीचे आहेत.
ओवी १७०:
ब्राह्मणप्रतापाचा नवलावो । तिहीं आज्ञाधारकू केला देवो ।
प्रतिमाप्रतिष्ठेसि पहा हो । प्रकटे आविर्भावो मंत्रमात्रें ॥
अर्थ:
ब्राह्मणांच्या प्रतापाचे आश्चर्य! त्यांच्यावर देवाने आज्ञाधारक केले. प्रतिमाप्रतिष्ठेत पहा, मंत्रांद्वारे प्रकट होणारा आविर्भाव.
ओवी १७१:
तंव संत म्हणती काय पहावें । जें स्तवनीं रचिसी भावें ।तेथें प्रमेय काढिसी नित्य नवें । साहित्यलाघवें साचार ॥अर्थ:संत म्हणतात, "तू भक्तीने जे काही स्तवन करतोस, त्यामध्ये नवे नवे साहित्य आणि चातुर्याचे सिद्धांत काढतोस."
ओवी १७२:
गणेशु आणि सरस्वती । बैसविलीं ब्रह्मपंक्ती ।
तैशींच संतस्तवनीं स्तुतीं । ऐक्यवृत्ती वदलासी ॥
अर्थ:
गणेश आणि सरस्वती हे ब्रह्मपंक्तीत बसले आहेत; तसंच, संतांच्या स्तवणात एकात्मता प्रकट केली आहे.
ओवी १७३:
पाठीं कुल आणि कुलदैवता । स्तवनीं वदलासि जे कथा ।
ते ऐकतांचि चित्त चिंता । विसरे सर्वथा श्रवणेंचि ॥
अर्थ:
कुल आणि कुलदैवता यांच्या कथा ऐकताना, त्याच्या श्रवणामुळे चिंतेचा निखालस विसर पडला.
ओवी १७४:
जो सद्भावो संतचरणीं । तोचि भावो ब्राह्मणीं ।
सुखी केले गुरु स्तवनीं । धन्य वाणी पैं तुझी ॥
अर्थ:
जो सद्भाव संतांच्या चरणात आहे, तोच ब्राह्मणांच्या ठिकाणी आहे. तुझ्या गुरुस्तवनाने संतांना संतुष्ट केले, त्यामुळे तुझी वाणी धन्य आहे.
ओवी १७५:
तरी तुझेनि मुखें श्रीजनार्दन । स्वयें वदताहे आपण ।
हे बोलतांचि खूण । कळली संपूर्ण आम्हांसी ॥
अर्थ:
तुझ्या मुखातून तुझा गुरु श्रीजनार्दन स्वतः बोलत आहे. तुझ्या शब्दांचा अर्थ सर्वांपर्यंत स्पष्ट झाला.
ओवी १७६:
चढत प्रमेयाचें भरतें । तें नावेक आवरोनि चित्तें ।
पुढील कथानिरूपणातें । करी निश्चितें आरोहण ॥
अर्थ:
तुला प्रेमाचे भरते आलं आहे, पण त्याला थोडं आवरून पुढील कथा सांगण्यासाठी निश्चय कर.
ओवी १७७:
विसरलों होतों हा भावो । परी भला दिधला आठवो ।
याचिलागीं सद्भावो । तुमचे चरणीं पहाहो ठेविला ॥
अर्थ:
ही भावना मी विसरून गेलो होतो; पण तू मला ती आठवण करून दिलीस. त्यामुळे मी तुमच्या चरणांवर पूर्ण विश्वास ठेवला आहे.
ओवी १७८:
उणें देखाल जें जें जेथें । तें तें करावें पुरतें ।
सज्जनांमाजीं सरतें । करावें मातें ग्रंथार्थसिद्धी ॥
अर्थ:
ज्या ठिकाणी काही कमी आहे असे वाटेल, तिथे ते पूर्ण करावे. ग्रंथार्थ सिद्धी करून सज्जनांमध्ये मान्यता मिळवावी.
ओवी १७९:
ते म्हणती भला रे भला नेटका । बरवी ही आया आली ग्रंथपीठिका ।
आतां संस्कृतावरी टीका । कविपोषका वदें वहिला ॥
अर्थ:
ते म्हणाले, "शाबास! योग्य बोलत आहेस. तर हे कविपोषक! तुझ्या ग्रंथाच्या संदर्भात संस्कृतावर टीका करण्यास सुरुवात कर."
ओवी १८०:
याचि बोलावरी माझा भावो । ठेवूनि पावलों पायांचा ठावो ।
तरी आज्ञेसारिखा प्रस्तावो । करीन पाहा हो कथेचा ॥
अर्थ:
या बोलण्यावर मी माझा भाव ठेऊन, तुमच्या चरणांचे आश्रय घेत, आज्ञेसारखे प्रस्ताव करीन. पाहूया कथा कशी पुढे जातो.
ओवी १८१:तरी नैमिषारण्याआंतु । शौनकादिकांप्रति मातु ।सूत असे सांगतु । गतकथार्थु अन्वयो ॥अर्थ:नैमिषारण्यामध्ये सूत शौनकादिकांना मागील कथासंदर्भ सांगत आहे.
ओवी १८२:
मागें दहावें स्कन्धीं जाण । कथा जाली नवलक्षण ।
आतां मोक्षाचें उपलक्षण । सांगे श्रीकृष्ण एकादशीं ॥
अर्थ:
दहाव्या स्कंधामध्ये श्रीकृष्णाने मोक्षाचे उपलक्षण सांगितले, जो नऊ लक्षणांनी युक्त आहे.
ओवी १८३:
जो चिदाकाशींचा पूर्ण चंद्र । जो योगज्ञाननरेंद्र ।
तो बोलता झाला शुकयोगींद्र । परिसता नरेंद्र परीक्षिती ॥
अर्थ:
चिदाकाशातील पूर्णचंद्र आणि योगज्ञानाचा केवळ मुकुटमणी, शुकयोगींद्र बोलला आणि त्याच्यासमोर राजा परीक्षित बसला.
ओवी १८४:
तंव परीक्षिती म्हणे स्वामी । याचिलागीं त्यक्तोदक मी ।
तेचि कृपा केली तुम्हीं । तरी धन्य आम्ही निजभाग्यें ॥
अर्थ:
परीक्षित राजा म्हणतो, "माझ्या सर्वस्वावर पाणी सोडले आहे. तुम्ही मला हे प्राप्त करून दिले, त्यामुळे मी धन्य आहे."
ओवी १८५:
अगा हे साचार मोक्षकथा । ज्यांसि मोक्षाची अवस्था ।
तिहीं पाव देऊनि मनाचे माथां । रिघावें सर्वथा श्रवणादरीं ॥
अर्थ:
ही मोक्षाची कथा अगाध आहे. ज्यांना मोक्षाची आस्था आहे, त्यांनी मनाच्या मस्तकावर पाय ठेवून अत्यंत आदराने श्रवण करावे.
ओवी १८६:
भीतरी नेऊनियां कान । कानीं द्यावें निजमन ।
अवधाना करूनि सावधान । कथानुसंधान धरावें ॥
अर्थ:
कान अंतर्मुख करून, मन कानी ठेवावे आणि लक्ष द्यावे; कथा अनुसंधान करावे.
ओवी १८७:
बहुतीं अवतारीं अवतरला देवो । परी या अवतारींचा नवलावो ।
देवां न कळे अभिप्रावो । अगम्य पहाहो हरिलीला ॥
अर्थ:
देवानं अनेक युगांमध्ये अनेक अवतार धारण केले, पण श्रीकृष्णाच्या अवतारातला चमत्कार विशेष आहे; हरीची लीला अगम्य आहे.
ओवी १८८:
उपजतांचि मायेवेगळा । वाढिन्नला स्वयें स्वलीळा ।
बाळपणीं मुक्तीचा सोहळा । पूतनादि सकळां निजांगें अर्पी ॥
अर्थ:
जो उपजताच मायेपासून निराळा झाला, तो आपल्या लीलेने वाढला आणि लहानपणीच पूतनासारख्या राक्षसांना मुक्तीचा अनुभव दिला.
ओवी १८९:
मायेसि दाविलें विश्वरूप । गोवळां दाविलें वैकुंठदीप ।
परी गोवळेपणाचें रूप । नेदीच अल्प पालटों ॥
अर्थ:
आईला विश्वरूप दाखविले, गोपाळांना वैकुंठ भेट दिली, तरी गवळेपणाचे स्वरूप थोडक्यातही बदलले नाही.
ओवी १९०:
बाळ बळियांतें मारी । अचाट कृत्यें जगादेखतां करी ।
परी बाळपणाबाहेरी । तिळभरी नव्हेचि ॥
अर्थ:
बाळ बळ्यांना मारून जगात अचाट कृत्ये करतो; परंतु बालपणाबाहेर त्याच्या कृत्यांचा थोडासाही प्रभाव नाही.
ओवी १९१:ब्रह्म आणि चोरी करी । देवो आणि व्यभिचारी ।पुत्र कलत्र आणि ब्रह्मचारी । हेही परी दाखविली ॥अर्थ:श्रीकृष्ण, जो साक्षात परब्रह्म आहे, त्याने चोरी केली, देव असून व्यभिचार केला आणि बायका-मुलांसोबत असताना ब्रह्मचारी म्हणून देखील दाखविला.
ओवी १९२:
अधर्में वाढविला धर्म । अकर्में तारिलें कर्म ।
अनेमें नेमिला नेम । अति निःसीम निर्दुष्ट ॥
अर्थ:
अधर्माने धर्म वाढवला, अकर्माने कर्माचे उद्दीपन केले, अनियमिततेतूनही कठोर नियमांचे पालन केले.
ओवी १९३:
तेणें संगेंचि सोडिला संगू । भोगें वाढविला योगु ।
त्यागेंवीण केला त्यागू । अति अव्यंगु निर्दोष ॥
अर्थ:
त्याने संगामध्ये निःसंगता साधली, भोगांद्वारे योग वाढवला, त्यागाशिवायही एक अव्यंग आणि निर्दोष त्याग केला.
ओवी १९४:
कर्मठां होआवया बोधू । कर्मजाड्याचे तोडिले भेदू ।
भोगामाजीं मोक्षपदू । दाविलें विशदू प्रकट करूनि ॥
अर्थ:
कर्मठ लोकांना बोध होण्यासाठी कर्मजाड्याचे भेद तोडले आणि भोगांमध्येही मोक्षपद असू शकते, हे स्पष्ट केले.
ओवी १९५:
भक्ति भुक्ति मुक्ति । तिन्ही केलीं एके पंक्ती ।
काय वानूं याची ख्याति । खाऊनि माति विश्वरूप दावी ॥
अर्थ:
भक्ति, भुक्ति आणि मुक्ति या तिहींना एकाच पंक्तीत बसवले. याबद्दल काय सांगावे? यानें माती खाऊन विश्वरूप दाखवले.
ओवी १९६:
त्याचिया परमचरित्रा । तुज सांगेन परमपवित्रा ।
परी निजबोधाचा खरा । या अवतारीं पुरा पवाडा केला ॥
अर्थ:
श्रीकृष्णाचे पवित्र चरित्र मी तुला सांगणार आहे. ह्या अवताराने आत्मबोधाचा पुरा विस्तार केला आहे, याबद्दल शंका नाही.
ओवी १९७:
एकादशाच्या तात्पर्यार्थीं । संक्षेपें विस्तरे मुक्ति ।
बोललीसे आद्यंतीं । परमात्मस्थिति निजबोधें ॥
अर्थ:
एकादश स्कंधाच्या तात्पर्यांत मुक्तिचा संक्षेप आणि विस्तार, परमात्मस्थिती या आत्मबोधाने स्पष्ट केला आहे.
ओवी १९८:
तेथें नारदें वसुदेवाप्रती । संवादू निमिजायंती ।
सांगितली कथासंगती । ‘संक्षेपस्थिति’ या नाम ॥
अर्थ:
तिथे नारदाने वसुदेवासोबतच्या संवादातून कथासंगती सांगितली, ज्याला 'संक्षेपस्थिति' असे नाव आहे.
ओवी १९९:
तेचि उद्धवाची परमप्रीति । नाना दृष्टांतें उपपत्ति ।
स्वमुखें बोलिला श्रीपति । ते कथा निश्चितीं ‘सविस्तर’ ॥
अर्थ:
उद्धवावर श्रीकृष्णाच्या प्रेमामुळे अनेक दृष्टांतांनी ज्ञानकथा सांगितली गेली, ज्याला 'विस्तारस्थिति' असे म्हणतात.
ओवी २००:
दशमीं ‘निरोध’ लक्षण । मागां केलें निरूपण ।
जेथें धराभार अधर्मजन । निर्दळी श्रीकृष्ण नानायुक्ति ॥
अर्थ:
दशम स्कंधामध्ये 'निरोध' लक्षणाची चर्चा झाली असून, अधर्म जनांच्या धराभारावर श्रीकृष्णाने अनेक युक्तिवाद केले.